शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

पावसाने ओढ दिल्यामुळे वनराई वाचवण्याचे वन विभागापुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 12:31 AM

राज्य शासनाचे यंदा १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी बीड जिल्ह्यात ३३ लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहे. राज्यात सर्वात जास्त वृक्ष लगवड करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बीडने तिसरा क्रमांक पटकावला आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे लावलेली झाडे वाचवण्याचे आव्हान वनविभागापुढे उभे राहिले आहे.

ठळक मुद्देवन विभागाचे आवाहन : विविध सामाजिक संघटनांनी घ्यावा पुढाकार

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्य शासनाचे यंदा १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी बीड जिल्ह्यात ३३ लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहे. राज्यात सर्वात जास्त वृक्ष लगवड करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बीडने तिसरा क्रमांक पटकावला आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे लावलेली झाडे वाचवण्याचे आव्हान वनविभागापुढे उभे राहिले आहे.जुलै महिन्यातील पावसाच्या आधारावर दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जादा वृक्षांची लागवड वनविभागाच्या वतीने करण्यात आली आहे. मागील तीनही वर्षांत बीड जिल्ह्याने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सहज पूर्ण केले आहे. जून, जुलै महिन्यातील झालेल्या पावसानंतर जिल्हाभरातील डोंगररांगांवर झाडे लावण्याची मोहीम राबवली होती.उद्दिष्टपूर्तीसाठी वनविभागासह शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेतल्याने ते पूर्ण झाले. या वृक्ष लागवडीमुळे बोडख्या डोंगररांना हिरवा शालू घातल्याचे स्वरुप आले होते. वनविभागाने पोषक वातावरण व मृदेची प्रत पाहूनच विविध झाडांची लागवड केली होती. यामुळे झाडांची मुळे लवकरात लवकर जमिनीत रुजली. मात्र, पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्यावाचून झाडे जळण्याचे प्रमाण वाढले आहे. विविध माध्यमातून झाडे ठिकवण्यासाठी वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न होत आहेत.वन विभागाच्या उपाययोजनारोपांची लागवड केल्यानंतर जवळपास ४५ दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रोपे सुकू लागली आहेत. अनेक ठिकाणी पाणी साठवण्यासाठी वन विभागाच्या वतीने पाणवठे तायर केले होेते. त्यामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्यावर तुषर सिंचन, सौरपंपाचा वापर करुन पाणी देण्याचे काम सुरु आहे. जिथे याची सोय नाही त्या ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणी दिले जात आहे, रोपांजवळ ओलावा टिकून राहण्यासाठी मातीचा भर देण्याचे काम सुरु आहे.

टॅग्स :Beedबीडforest departmentवनविभाग