शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

बीडमध्ये ५ वर्षांत अडीचशे मुलांवर हृदय शस्त्रक्रिया; राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 12:59 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी, शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये पाच वर्षांत तब्बल अडीचशे मुलांवर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, तर अपेंडिक्स, हॉर्निया, किडनीसह इतर २००६ शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या.

ठळक मुद्दे२००८ पासून महाराष्ट्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत वर्षातून दोन वेळा अंगणवाडीची, तर एक वेळेस शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये पाच वर्षांत तब्बल अडीचशे मुलांवर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहेतर इतर २००६ शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या.

बीड : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी, शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये पाच वर्षांत तब्बल अडीचशे मुलांवर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, तर अपेंडिक्स, हॉर्निया, किडनीसह इतर २००६ शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या.

विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहून शरीरयष्टी सुदृढ राहावी, तसेच त्यांना आरोग्यदायी जीवन जगता यावे यासाठी २००८ पासून महाराष्ट्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. २०१३ साली याचे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम असे नामांतर झाले. या कार्यक्रमांतर्गत वर्षातून दोन वेळा अंगणवाडीची, तर एक वेळेस शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. पाच वर्षांत जिल्ह्यातील शाळांमधील ६-१८ वर्षे वयोगटातील ३ लाख ९७ हजार १४ एवढ्या विद्यार्थ्यांपैकी २ लाख ९१ हजार ४२० एवढ्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी १२ हजार ३२५ विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्यात आले.

यामध्ये ७७१८ मुले, तर ४६०७ मुलींचा समावेश आहे. इतर मुलांमध्ये गंभीर आजार न आढळल्याने त्यांची केवळ तपासणी करण्यात आली, तर अंगणवाडीतील ०-६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची पहिल्या सत्रात २ लाख ७५ हजार ७४३ पैकी २ लाख ३२ हजार १९३ विद्यार्थ्यांची तपासणी केली. १० हजार ७६४ विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्यात आले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक (बाह्य) डॉ. सतीश हरिदास, डॉ. संजय पाटील सह इतरांचे मार्गदर्शन लाभ आहे. पर्यवेक्षक आर.के. तांगडे या अभियानाचा दैनंदिन आढावा घेतात.

३९ पथके कार्यरतया अभियानासाठी जिल्ह्यात ३९ पथके कार्यरत असून, एका पथकात महिला व पुरुष असे दोन डॉक्टर, एक फार्मासिस्ट व एक नर्स यांचा समावेश आहे. अंगणवाडी, शाळेत जाऊन ते तपासणी करतात

५४१ विद्यार्थ्यांना हृदयविकाराचा त्रासराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पाच वर्षांत ५४१ मुलांना हृदयविकार असल्याचे निष्पन्न झाले. पैकी २५१ मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली, तर ५० विद्यार्थ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी राजीव गांधी योजनेअंतर्गत प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे कार्यक्रम पर्यवेक्षक आर.के. तांगडे यांनी सांगितले.

पालकांनीही पुढे यावेअनेक वेळा आपल्याला पाल्याला वेगवेगळे आजार झालेले असताना ते भीतीपोटी बालकावर औषधोपचार व शस्त्रक्रिया करण्यास पुढे येत नसल्याचेही या अभियानातून समोर आले आहे. या अभियानात सर्व आजारांवर मोफत औषधोपचार करून शस्त्रक्रिया केल्या जातात. यासाठी सर्व पालकांनी पुढे येत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आम्ही सोबत आहोत अंगणवाडी, शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. गंभीर आजार असल्याचे समजताच त्यावर तात्काळ उपचारासाठी पावले उचलली जातात. पालकांनी जागरूक राहून पाल्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. आम्ही सोबत आहोत.- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड.

टॅग्स :Healthआरोग्यSchoolशाळाStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकार