शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

भोकरदनमध्ये नागरिकांचे पाण्यासाठी ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:16 IST

नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अद्यापही भोकरदन शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. यामुळे पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी बुधवारी नगरपालिकेला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देभीषण पाणीटंचाई : नगपालिकेचा गलथन कारभार, नागरिकांमध्ये नाराजी

भोकरदन : नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अद्यापही भोकरदन शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. यामुळे पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी बुधवारी नगरपालिकेला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन केले.जुई, बानेगाव, धरण कोरडे पडल्यामुळे शहरातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या अकोला देव येथून टँक्करने पाणी आणण्यात येत असले तरी ४० ते ४५ किलोमीटर अंतर आल्यामुळे टँककरच्या पूर्ण फेऱ्या होत नाही. त्यामुळे शहारत पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नगर परिषद पाणीटंचाईचे निवारण करण्यात अपयशी ठरत असून आलेले पाणी नागरिकांना व्यवस्थित वाटप करण्यात येत नाही. अधिकारी व पदाधिकारी लक्ष देत नाही असा आरोप या नागरिकांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुध्दा या नागरिकांनी आंदोलन केले होते. तरी सुध्दा पाणी टंचाईचा प्रश्न मिटला नाही. त्यामुळे नागरिकांनी बुधवारी नगर परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.यावेळी नुजेर शाह, महेबूब भारती, इसरार पठान, फहीम कादरी, जावेद शेख, मुजीब कुरेशी, आसिफ कुरैशी, अलीम शाह, शेख जाहिद, शेरखान, मोहमद शाहरुख शेख शाहरुख, अनीस भारती, रहीम कुरेशी, बिस्मिल्लाह कुरेशी आदींची उपस्थिती होती. यावेळी मुखाधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा करणाºया टँकर बाबत माहिती दिली. व दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू असे सांगितल्यावर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.दोन दिवसांत : पाणीपुरवठा सुरळीतयाविषयी न.पं. मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांनी सांगितले की, दोन्ही धरणे कोरडी पडली आहे. शिवाय चराचे पाणी कमी झाल्यामुळे शहरात पाणी टंचाई वाढली आहे. अकोला देव येथून टँकरच्या फेºया पूर्ण होत नाही. मात्र, वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी व आम्ही खडक पूर्णा धरणातून जाफराबाद पर्यंत पाणी आणले असून दोन दिवसातच शहराला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. असेही सोंडगे यांनी सांगितले.

टॅग्स :Jalanaजालनाwater shortageपाणीटंचाईagitationआंदोलन