शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

भोकरदनमध्ये नागरिकांचे पाण्यासाठी ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:16 IST

नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अद्यापही भोकरदन शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. यामुळे पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी बुधवारी नगरपालिकेला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देभीषण पाणीटंचाई : नगपालिकेचा गलथन कारभार, नागरिकांमध्ये नाराजी

भोकरदन : नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अद्यापही भोकरदन शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. यामुळे पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी बुधवारी नगरपालिकेला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन केले.जुई, बानेगाव, धरण कोरडे पडल्यामुळे शहरातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या अकोला देव येथून टँक्करने पाणी आणण्यात येत असले तरी ४० ते ४५ किलोमीटर अंतर आल्यामुळे टँककरच्या पूर्ण फेऱ्या होत नाही. त्यामुळे शहारत पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नगर परिषद पाणीटंचाईचे निवारण करण्यात अपयशी ठरत असून आलेले पाणी नागरिकांना व्यवस्थित वाटप करण्यात येत नाही. अधिकारी व पदाधिकारी लक्ष देत नाही असा आरोप या नागरिकांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुध्दा या नागरिकांनी आंदोलन केले होते. तरी सुध्दा पाणी टंचाईचा प्रश्न मिटला नाही. त्यामुळे नागरिकांनी बुधवारी नगर परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.यावेळी नुजेर शाह, महेबूब भारती, इसरार पठान, फहीम कादरी, जावेद शेख, मुजीब कुरेशी, आसिफ कुरैशी, अलीम शाह, शेख जाहिद, शेरखान, मोहमद शाहरुख शेख शाहरुख, अनीस भारती, रहीम कुरेशी, बिस्मिल्लाह कुरेशी आदींची उपस्थिती होती. यावेळी मुखाधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा करणाºया टँकर बाबत माहिती दिली. व दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू असे सांगितल्यावर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.दोन दिवसांत : पाणीपुरवठा सुरळीतयाविषयी न.पं. मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांनी सांगितले की, दोन्ही धरणे कोरडी पडली आहे. शिवाय चराचे पाणी कमी झाल्यामुळे शहरात पाणी टंचाई वाढली आहे. अकोला देव येथून टँकरच्या फेºया पूर्ण होत नाही. मात्र, वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी व आम्ही खडक पूर्णा धरणातून जाफराबाद पर्यंत पाणी आणले असून दोन दिवसातच शहराला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. असेही सोंडगे यांनी सांगितले.

टॅग्स :Jalanaजालनाwater shortageपाणीटंचाईagitationआंदोलन