शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

बीडमध्ये पोलीस-दिव्यांगांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:14 AM

दिव्यांगांचा तीन टक्के निधी तात्काळ वाटप करावा, या मागणीसाठी गुरूवारी प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमो आंदोलन करण्यात आले. यावेळी निवेदन देण्याच्या कारणावरून पोलीस - आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला तर रस्त्यात थांबलेल्या आंदोलकांना आपण बााजुला थांबण्याची विनंती केल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

ठळक मुद्देआंदोलन चिघळले : पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप

बीड : दिव्यांगांचा तीन टक्के निधी तात्काळ वाटप करावा, या मागणीसाठी गुरूवारी प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमो आंदोलन करण्यात आले. यावेळी निवेदन देण्याच्या कारणावरून पोलीस - आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला तर रस्त्यात थांबलेल्या आंदोलकांना आपण बााजुला थांबण्याची विनंती केल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

जिल्हा व तालुका पातळीवर १८ नोव्हेंबर २०१५ अन्वये समितीची स्थापना करावी, निसमर्थ व्यक्तींच्या विविध प्रवर्गातील चार निसमर्थ सदस्य या समितीत घ्यावेत, दिव्यांगांना देण्यात येणारे मानधन एक हजार रूपये करावे, निराधार, निरश्रीत व दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेंतर्गत सहभागी करून घ्यावे, यासारख्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आगोदर आंदोलकांना रस्त्यातून बाजूला होण्याची विनंती केली. परंतु आंदोलक शांत झाले नाहीत.

रस्त्यातून बाजूला घेण्याच्या कारणावरून पोलीस व आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आंदोलकांनी एकच गोंधळ घातला. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला. तसेच याबाबत संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना निलंबीत करावे, अशी मागणीही आंदोलकांनी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, सहायक पोलीस निरीक्षक सतिष जाधव यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मिळालेल्या माहितीनुसार या आंदोलनाची शिवाजीनगर पोलिसांना माहिती देण्यात आलेली नव्हती. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची ठाण्यात नोंद झालेली नव्हती.

संतप्त आंदोलकांकडून पोलिसांना शिवीगाळपोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलनास बसलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला घेऊन रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. याच वेळी काही आंदोलकांनी संतप्त होत घोषणाबाजी केली.

पोलिसांनी त्यांना शांततेचे आवाहन केले. परंतु त्याचा फायदा झाला नाही. त्यांना बाजूला घेतले असता आपल्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.आंदोलन चिघळत असल्याचे लक्षात येताच काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु इतरांनी विनंती केल्यानंतर त्यांना खाली उतरवले. त्यानंतर मात्र त्यांनी पोलिसांनी शिवीगाळ केल्याचे सूत्रांनी सांगितले.