शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस; छोटी धरणे भरल्याने दिलासा, नदी-नाल्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 17:57 IST

दोन दिवस झालेल्या पावसाने जिल्ह्यातील छोटी धरणे भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पिकांनाही जीवदान मिळाले आहे. 

बीड : मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. मराठवाड्यात सर्वाधिक पावसाची बीड जिल्ह्यात नोंद झाली आहे. जिल्ह्यात ७५ मिमी पाऊस झाला असून अनेक नद्यांना पूर आला आहे. दोन दिवस झालेल्या पावसाने जिल्ह्यातील छोटी धरणे भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पिकांनाही जीवदान मिळाले आहे. बीड जिल्हा तालुका निहाय पाऊस(mm) : पाटोदा-67, आष्टी-105, धारूर-29.7, केज-37, माजलगाव-56, अंबेजोगाई-105, शिरूर कासार-70, परळी-27 वडवणी-72

माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील कुंडलिका नदीला पुर आला आहे.  तर आंबेसावळी नदी देखील खळखळून वाहत आहे. बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर आला असून दगडी पुलावरून पाणी वाहत आहे. जिल्ह्यातील सर्वच नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मध्यरात्री झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी ऊसासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक नदीपात्र यंदा सफाई केलीच नसल्याने अनेक गावांना पुराचा तडाखा बसण्याची मोठी शक्यता आहे.

धारूर तालूक्यातील सर्व धरणे भरली दोन दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावाने तालुक्यातील घागरवडा, आरणवाडी, कुंडलीका आणि धारूर साठवण तलाव काठोकाठ भरली आहेत.  तसेच तालुक्यातील नदीनाले ओसंडून वाहत आहेत. या पावसाचा पिकांना फायदाच होणार असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. 

नागापूर धरण भरल्याने परळीकरांना दिलासा परळी शहर व परिसरात सोमवारी रात्रीपासून पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीन सहित सर्व पिकांना जीवनदान मिळाले आहे. वाण धरण तुडुंब भरून वाहू लागले आहे. वाण  नदीला पूर आला आहे. पावसामुळे  नुकसान काही झाले नसून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. तालुक्यातील नागापूर धरण भरल्याने परळीकरांची पाणी समस्या दूर झाली आहे.

माजलगाव धरणाचा पाणीसाठी ५० टक्क्यांवर माजलगाव धरण परिसरात मागील 24 तासात 50 मी.मी.पावसाची नोंद झाली. मंगळवारी पहाटे धरण परिसरात जोरदार पाऊस झाला.यामुळे धरणात चांगल्याच पाण्याची वाढ झाली. चोवीस तासापूर्वी धरणात 35 टक्के पाणी साठा होतो तो मंगळवारी दुपारी 50 टक्के झाला होता.यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

आष्टीतील मच्छिंद्र गड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊससकाळपासून पाऊस सुरू असल्याने जोरदार पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत.मच्छिंद्र गड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला असून मंदिराकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असून रस्ते ही वाहून गेली आहेत.नदी काठच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उडीद,बाजरी,मुग,सोयाबीन या पिकांची काढणी सुरू असून भिजून मोठे नुकसान झाल्याने या पिकांचे पंचनामे करुन तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

गेवराईत गोदावरी-सिंधफनाच्या पाणी पातळीत वाढगेवराई तालुक्यात सोमवारी दिवसभर रिमझिम पावसानंतर मंगळवारी पहाटे जोरदार पावसाने हजेरी लावली. यातच हिरडपुरी उच्च पातळी बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. पावसाचे सातत्य आणि मोठा विसर्ग यामुळे गोदावरी नदी पात्राची पाणी पातळी वाढली आहे. तसेच सिंधफना नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 

ऊर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले वडवणी तालुक्यात तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाने सोन्नाखोटा येथील उर्ध्व  कुंडलिका मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. यामुळे 100% पाणी साठा आरक्षित ठेवून प्रकल्पाचे पाच दरवाजे मंगळवारी पहाटेच्या सुमारास 90 सेमीने उघडण्यात आले. प्रकल्पातून नदीपाञात 12857 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या निम्न भागातील कुंडलिका नदीकाठी असणाऱ्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा  देण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार प्रकाश सिरसेवाड यांनी दिली आहे. 

 

टॅग्स :RainपाऊसBeedबीडMarathwadaमराठवाडा