शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बीड रेल्वे धावली! ५० वर्षांच्या स्वप्नपूर्तीमागे तरुणांचा मोठा संघर्ष, 'या' आंदोलनांची दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 15:21 IST

बीडच्या आकाशवाणी केंद्रावर ३१ जानेवारी रोजी २००७ रोजी झालेले आंदोलन ठरले निर्णायक

बीड : अनेक वर्षांपासून बीडकरांचेरेल्वेचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. १७ सप्टेंबर रोजी बीडमधून रेल्वे धावणार असून, या ऐतिहासिक क्षणामागे स्थानिक नागरिक, तरुणांचा मोठा संघर्ष दडलेला आहे. विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीच्या अथक प्रयत्नांमुळे हा रेल्वे प्रश्न राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर पोहोचला आणि त्यातूनच हा मार्ग मोकळा झाला.

मागील ५० वर्षांपासून बीडमध्ये रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रलंबित होती. रेल्वे काम वेगाने करावे, निधी द्यावा या मागणीसाठी तरुणांनी एकत्र येऊन विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीची स्थापना केली. या समितीने मोर्चे, उपोषणे आणि निदर्शने अशा अनेक मार्गांनी आंदोलने केली. यापैकी सर्वात महत्त्वाचं आंदोलन बीडच्या आकाशवाणी केंद्रावर ३१ जानेवारी रोजी २००७ रोजी झाले होते. या आंदोलनात युवक क्रांती दल, एआयएसएफ, एसएफआय, संभाजी ब्रिगेड, छावा यांसारख्या अनेक संघटनांचे तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यावेळी आकाशवाणी केंद्रावर तोडफोड झाली आणि पोलिसांनी लाठीचार्ज करत १७ युवकांना ताब्यात घेतले होते. या घटनेमुळे बीडच्या रेल्वे प्रश्नाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले. रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष जयप्रकाश आघाव, सचिव संगमेश्वर आंधळकर, उपाध्यक्ष अंबादास आगे, स्व. अमोल गलधर, सुशीला मोराळे, पंडित तुपे, शैलेश जाधव, संजय सावंत, ज्योतीराम हुरकुडे, पंकज चव्हाण, गणेश उगले, गंगाधर काळकुटे, अशोक तावरे, वैभव काकडे आणि इतर अनेक तरुणांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी तत्कालीन खासदार जयसिंगराव गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले. मुंबईच्या आझाद मैदानावर तीन दिवस आमरण उपोषण केले आणि विविध ठिकाणी मोर्चे काढले.

आंदोलनामुळे घेतला निर्णयआकाशवाणी केंद्रावरील आंदोलन संदर्भाने तत्कालीन पालकमंत्री स्व. विमल मुंदडा यांच्या पुढाकाराने मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर कृती समितीची बैठक झाली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी बीड रेल्वे प्रकल्पासाठी ५० टक्के खर्च राज्य सरकार देईल, असे लेखी पत्र दिले. या पत्रामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात करार झाला आणि रेल्वे कामाला वेग आला. सामाजिक कार्यकर्ते संगमेश्वर आंधळकर यांनी सांगितले की, आज बीडमध्ये रेल्वे सुरू होण्यामागे या विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीचा संघर्ष आणि तरुणांचे मोठे योगदान आहे.

अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गएकूण लांबी : २६१.२५ किलोमीटरभूसंपादन : १८२२.१६८ हेक्टरप्रकल्पाची किंमत : ४८०५.१७ कोटी रुपये (केंद्र आणि राज्य सरकारचा प्रत्येकी २४०२.५९ कोटी रुपये हिस्सा)पुलांची संख्या : १३० (रेल्वेखालील), ६५ (रेल्वेवरील), ६५ (मोठे पूल), ३०२ (छोटे पूल)

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह इतर मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये बीड स्थानकावरुन रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावे बीडकरांनी रेल्वेत बसून स्वप्नपूर्तीचा अनुभव घेतला.

टॅग्स :Beedबीडrailwayरेल्वेMarathwadaमराठवाडाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारPankaja Mundeपंकजा मुंडे