शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

बीडमध्ये शौचालय अनुदान लाटणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:16 AM

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयासाठी अनुदान दिले जाते; परंतु शहरातील बहुतांश नागरिकांनी शौचालये न बांधताच पहिला हप्ता उचलल्याचे उघड झाले आहे. पालिकेने सर्व्हेक्षण केले असता ४६ लोक यामध्ये दोषी आढळले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात पोलीस ठाण्यात पत्र दिले. परंतु त्यानंतर यावर कसलीच कारवाई झाली नाही. पालिकेला याचा विसर पडला तर पोलिसांनी याकडे कानाडोळा केला. अनुदान लाटणा-यांना पाठिशी घालत पालिकेकडून गुन्हे दाखल करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.

ठळक मुद्देपोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याचे कारण

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयासाठी अनुदान दिले जाते; परंतु शहरातील बहुतांश नागरिकांनी शौचालये न बांधताच पहिला हप्ता उचलल्याचे उघड झाले आहे. पालिकेने सर्व्हेक्षण केले असता ४६ लोक यामध्ये दोषी आढळले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात पोलीस ठाण्यात पत्र दिले. परंतु त्यानंतर यावर कसलीच कारवाई झाली नाही. पालिकेला याचा विसर पडला तर पोलिसांनी याकडे कानाडोळा केला. अनुदान लाटणा-यांना पाठिशी घालत पालिकेकडून गुन्हे दाखल करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी केंद्र शासनाचे ४, राज्य शासनाचे ८, तर बीड नगरपालिकेतर्फे ५ हजार असे १७ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. बीड शहरामध्ये २४५३ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट होते. ते पूर्ण करण्यासाठी पालिकेने कंबर कसली होती. परंतु काही मर्जीतील लोकांनी पालिकेकडून हप्ता घेतला परंतु शौचालय बांधले नाहीत. त्यानंतर मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी सर्व स्वच्छता निरीक्षकांना सर्व्हेक्षण करून अनुदान लाटणाºयांची यादी मागविली. यामध्ये स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव यांच्याकडे ११ तर सुनील काळकुटे यांच्याकडे ४४ लोक आढळून आले होते. इतर स्वच्छता निरीक्षकांनी मुख्याधिकाºयांच्या सूचनेला केराची टोपली दाखविली होती.

दरम्यान, काळकुटे व जाधव यांनी बीड शहर व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या लोकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले. परंतु पोलिसांनी असा थेट गुन्हा दाखल करता येत नाही, न्यायालयाचे आदेश आणा, असा सल्ला दिला. त्यानंतर पालिकेने यावर कसलीच कारवाई केली नाही. केवळ पत्र देऊन पालिकेने जबाबदारी झटकल्याचे बोलले जात आहे. पालिकेच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळेच अनुदान लाटणारे आजही मोकाट आहेत.या नियमानुसार होतो गुन्हा दाखलज्या लोकांनी पालिकेचे अनुदान लाटले आहे, त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम ११५ व ११७ नुसार पोलीस ठाण्यात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जातो. या नियमाची माहिती असतानाही पालिका पोलिसांना का देत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. केवळ पोलीस सहकार्य करीत नाहीत, असे उत्तर देऊन टोलवाटोलवी केली जात आहे.

फसवणूक करणा-यांवर गुन्हे दाखल केले जातीलशौचालय अनुदान लाटणाºयांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात पत्र दिलेले आहे. आणखी एक वेळेस स्मरणपत्र पाठविले जाईल. शासनाची फसवणूक करणा-यांवर गुन्हे दाखल केले जातील. कोणालाही पाठिशी घालणार नाही.- व्ही. टी. तिडकेस्वच्छता विभाग प्रमुख, न.प.बीड

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानBeedबीडPoliceपोलिसnagaradhyakshaनगराध्यक्ष