शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अंजली दमानियांच्या अडचणी वाढणार?; कारवाईची मागणी करत पोलीस ठाण्यासमोरच मांडला ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 21:57 IST

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये येऊन आंदोलन केले होतेे. 

बीड : धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा आणि वाल्मीक कराडच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. माध्यमांना बोलताना त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याचा आरोप करत काही लोकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उठणार नाही, असे म्हणत बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या समोरच ठिय्या मांडण्यात आला. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. याच अनुषंगाने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये येऊन आंदोलन केले. 

मंत्री धनंजय मुंडे यांचा राजिनामा मागण्यासह वाल्मीक कराडसह इतर फरार आरोपींच्या अटकेची त्यांनी मागणी केली होती. या दरम्यान त्यांनी काही प्रतिक्रिया दिल्या होत्या. याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. 

यात त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप करत बीड तालुक्यातील वंजारवाडी येथील केशव तांदळे यांच्यासह अनेक गावांमधील १५ ते २० कार्यकर्ते शुक्रवारी सायंकाळी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गेले. दमानिया यांच्याविरोधात त्यांच्यावर कठोर कारवाई करून मिडीयावर बोलण्यास बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली.

दमानिया त्यांच्याशी दोन वेळा संपर्क केला, परंतू त्यांनी फोन न घेतल्याने बाजू समजली नाही. 'अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया असलेला व्हिडीओ यु ट्यूबवर पाहिला. त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे विधान केले आहे. त्यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी आगोदर बीड ग्रामीण आणि नंतर पोलिस अधीक्षक कार्यालयात आलो आहोत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे', असे वंजारवाडी येथील आंदोलनकर्ते केशव तांदळे यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीanjali damaniaअंजली दमानियाPoliceपोलिस