शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कौतुकास्पद! आईने मंगळसूत्र गहाण ठेवून शिकवले; शेतकऱ्याच्या तिन्ही मुली झाल्या महाराष्ट्र पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 12:35 IST

बीड जिल्ह्यात राहणाऱ्या एका गरीब ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या तिन्ही मुलींनी यशस्वी भरारी घेऊन आदर्श निर्माण केला आहे.

बीड: बीड जिल्ह्यात राहणाऱ्या एका गरीब ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या तिन्ही मुलींनी यशस्वी भरारी घेऊन आदर्श निर्माण केला आहे. शेतकरी मारूती जाधव यांच्या तीन मुली महाराष्ट्रपोलिसांत भर्ती झाल्या आहेत. आपल्या मुलींची गरूडझेप पाहून मारूती जाधव यांनी आनंद व्यक्त केला. माझ्या मुलींनी जिल्ह्याचे नाव रोशन केल्याचा अभिमान असून त्यांच्या या यशाचा अभिमान वाटतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, बीडमधील परळीतील सेलू तांडा गावात राहणाऱ्या मारुती जाधव यांनी ऊसतोड कामगार म्हणून काम सुरू केले होते. काही काळ ऊसतोड कामगार म्हणून काम करून त्यांनी घर चालवले. गावात त्यांच्याकडे स्वत:ची जमीन किंवा कोणतीही मोठी मालमत्ता नव्हती. मात्र, तीन मुली आणि दोन मुले असा मोठा परिवार त्यांचा आहे. अशा परिस्थितीत मोठं कुटुंब चालवण्यासाठी त्यांना दिवसरात्र मेहनत करावी लागली.

गरीब शेतकऱ्याच्या मुली पोलिसात भर्ती घरची परिस्थिती हलाखीची असताना देखील मारूती जाधव यांनी आपल्या पाचही मुलांच्या शिक्षणात कोणताही हलगर्जीपणा केला नाही. त्यांनी त्यांच्या परिस्थितीनुसार मुलांना शिक्षण दिले. खरं तर त्यांनी आपल्या पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून मुलींचे शिक्षण पूर्ण केले. मारूती जाधव यांची मोठी मुलगी सोनाली कोरोना काळात पोलिसात भर्ती झाली होती. तर दुसरी मुलगी शक्ती आणि तिची लहान बहीण लक्ष्मी अलीकडेच महाराष्ट्र पोलीस झाली आहे. एकाच कुटुंबातील तीन मुली पोलिसात भर्ती होण्याचे परळीतील हे पहिलेच उदाहरण आहे. 

टॅग्स :BeedबीडInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसWomenमहिलाFarmerशेतकरी