शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

निवडणुकांनंतर राष्ट्रवादी पुन्हा भाजपाला पाठिंबा देईल, आंबेडकरांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 13:21 IST

देशाची अर्थव्यवस्था बिघडवली, देशात बेरोजगारी वाढली, तरीही लोकं म्हणतात याला पर्याय नाही.

बीड - वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास ठेऊ नका. कारण, निवडणुकांपूर्वी ते धर्मनिरपेक्ष असतात. पण, निवडणुका झाल्यानंतर ते धर्मनिरपेक्ष नसतात. कदाचित, निवडणुका झाल्यानंतर ते भाजपला पाठिंबा देतील, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवांरांनी राज्यातील निवडणूक निकालांवेळी घेतलेल्या भूमिकेची आठवण करुन दिली. 

देशाची अर्थव्यवस्था बिघडवली, देशात बेरोजगारी वाढली, तरीही लोकं म्हणतात याला पर्याय नाही. पण, मोदीला बदलायचं असेल तर मोदींच्या विरोधातील पक्षाला आपण निवडूण दिलं पाहिजे. माझ्या मुस्लीम बांधवांनो राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणुकांपूर्वी धर्मनिरपेक्ष पार्टी असते. तर, निवडणुकांनंतर सेक्युलर पक्षांसोबत आपली तडजोड करतात. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार बनलं नसतं, जर राष्ट्रवादीनं भाजपाला पाठिंबा जाहीर केला नसता. निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीला प्रश्न विचारा की, का तुम्ही भाजपाला पाठिंबा दिला होता. जर, तुम्ही चुकून माखून राष्ट्रवादीला मतदान केलं, तर निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपावासी होईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी बीडमधील उमेदवाराच्या सभेवेळी बोलताना म्हटले. एकीकडे आड तर दुसरीकडे विहिर अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपण तिसरा पर्याय म्हणून बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराला स्विकारले पाहिजे, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले आहे. 

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी आणि अमित शहांविरुद्धची भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला तर झाला, असेही राज यांनी म्हटले. मात्र, निवडणुकांनंतर राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिला तर मनसेच्या भूमिकेचं काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर, प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचा रोखही राज यांच्याच दिशेने होता की काय, अशी चर्चा रंगत आहे.  

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा