शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
3
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
4
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
5
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
6
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
7
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
8
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
9
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
10
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
11
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
12
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
13
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
14
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
16
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
17
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
18
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
19
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
20
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
Daily Top 2Weekly Top 5

पाणीउपसा रोखण्यासाठी प्रशासनाची आडमुठी भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 01:11 IST

काही ठिकाणी पाणी उपसा होत असल्याने आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना असताना पाटबंधारे विभागाकडून महावितरणच्या मदतीने विद्यूत पुरवठा खंडित केला जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तसेच सर्व तलाव, गोदावरी नदी व इतर पाणी पुवठा करणाऱ्या ठिकाणावरुन पाणी उपसा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी पाणी उपसा होत असल्याने आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना असताना पाटबंधारे विभागाकडून महावितरणच्या मदतीने विद्यूत पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना वेळोवेळी वीज खंडित होत असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.गोदापट्टा किंवा जलसाठवण तलाव तसेच इतर मोठ्या प्रकल्पातून पाणी उपसा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरी देखील काही ठिकाणी मोटारी टाकून ऊस व इतर बागायती पिकांना पाणी दिले जात आहे. त्यांच्या मोटारी जप्त करुन कारवाई करण्याऐवजी महावितरणकडून विद्यूत पुरवठा खंडित करुन पाणी उपसा रोखण्याचा फसवा प्रयत्न पाटबंधारे विभागाकडून केला जात आहे. मात्र, याचा फटका सामान्य शेतक-यांना बसत असल्याचे गेवराई, माजलगाव, धारुर व इतर गोदाकाठावरील शेतक-यांकडून सांगण्यात आले. या परिसरात अनेक शेतक-यांच्या वहिरींना व बोअरला थोडेफार पाणी शिल्लक आहे. या पाण्यावर शेतकरी आपल्या जनावरांना पाणी पाजतात, तसेच दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पाणी वापरले जाते. परंतु विद्यूत पुरवठा खंडित केल्यामुळे पाणी उपसा करता येत नाही.गेवराई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या जायकवाडी प्रकल्पातून पाणी सोडले जाते. हे पाणी गोदापात्रातून शहागड बंधाºयात येते. मात्र, या पाण्याचा शेतकरी उपसा करतात अशी भूमिका घेत नगरपालिकेने पाटबंधारे विभाग आणि महावितरण यांच्यावर दबाव वाढविला आहे. पाण्याचा विनापरवाना उपसा होत असेल तर अशा मोटारी जप्त करणे अथवा कारवाई अपेक्षित आहे. संबंधित कार्यालयांकडून महावितरणला हाताशी धरून या परिसरातील वीजपुरवठाच खंडित ठेवण्याची नवी शक्कल लढवली जात आहे. याचा फटका सर्वसामान्य शेतक-यांना बसत आहे. तात्काळ हा वीजपुरवठा खंडित करण्याचा खेळ थांबवा अन्यथा सर्व संबंधित कार्यालयांवर आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील गोदाकाठावरील शेतक-यांनी दिला आहे.मागील ५ दिवसांपासून वीजपुरवठा खंडितगोदाकाठच्या गावांचा वीज पुरवठा मागच्या ४ ते ५ दिवसांपासून सातत्याने बंद करण्यात येत आहे.ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिका-यांना विचारल्यास ‘आम्हाला पाटबंधारे विभागाने पत्र दिले आहे’ असे सांगून अधिकारी मोकळे होतात.वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतक-यांना स्वत:च्या विहिरीतून पाणी काढून जनावरांना पाणी कसे पाजायचे हा प्रश्न पडला आहे.गावात टँकरला दूषित पाणी येते. मग घरी माणसांना पिण्यासाठी पाणी कोठून न्यायचे असे अनेक प्रश्न शेतक-यांसमोर उभा राहिला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प