शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पाणीउपसा रोखण्यासाठी प्रशासनाची आडमुठी भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 01:11 IST

काही ठिकाणी पाणी उपसा होत असल्याने आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना असताना पाटबंधारे विभागाकडून महावितरणच्या मदतीने विद्यूत पुरवठा खंडित केला जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तसेच सर्व तलाव, गोदावरी नदी व इतर पाणी पुवठा करणाऱ्या ठिकाणावरुन पाणी उपसा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी पाणी उपसा होत असल्याने आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना असताना पाटबंधारे विभागाकडून महावितरणच्या मदतीने विद्यूत पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना वेळोवेळी वीज खंडित होत असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.गोदापट्टा किंवा जलसाठवण तलाव तसेच इतर मोठ्या प्रकल्पातून पाणी उपसा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरी देखील काही ठिकाणी मोटारी टाकून ऊस व इतर बागायती पिकांना पाणी दिले जात आहे. त्यांच्या मोटारी जप्त करुन कारवाई करण्याऐवजी महावितरणकडून विद्यूत पुरवठा खंडित करुन पाणी उपसा रोखण्याचा फसवा प्रयत्न पाटबंधारे विभागाकडून केला जात आहे. मात्र, याचा फटका सामान्य शेतक-यांना बसत असल्याचे गेवराई, माजलगाव, धारुर व इतर गोदाकाठावरील शेतक-यांकडून सांगण्यात आले. या परिसरात अनेक शेतक-यांच्या वहिरींना व बोअरला थोडेफार पाणी शिल्लक आहे. या पाण्यावर शेतकरी आपल्या जनावरांना पाणी पाजतात, तसेच दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पाणी वापरले जाते. परंतु विद्यूत पुरवठा खंडित केल्यामुळे पाणी उपसा करता येत नाही.गेवराई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या जायकवाडी प्रकल्पातून पाणी सोडले जाते. हे पाणी गोदापात्रातून शहागड बंधाºयात येते. मात्र, या पाण्याचा शेतकरी उपसा करतात अशी भूमिका घेत नगरपालिकेने पाटबंधारे विभाग आणि महावितरण यांच्यावर दबाव वाढविला आहे. पाण्याचा विनापरवाना उपसा होत असेल तर अशा मोटारी जप्त करणे अथवा कारवाई अपेक्षित आहे. संबंधित कार्यालयांकडून महावितरणला हाताशी धरून या परिसरातील वीजपुरवठाच खंडित ठेवण्याची नवी शक्कल लढवली जात आहे. याचा फटका सर्वसामान्य शेतक-यांना बसत आहे. तात्काळ हा वीजपुरवठा खंडित करण्याचा खेळ थांबवा अन्यथा सर्व संबंधित कार्यालयांवर आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील गोदाकाठावरील शेतक-यांनी दिला आहे.मागील ५ दिवसांपासून वीजपुरवठा खंडितगोदाकाठच्या गावांचा वीज पुरवठा मागच्या ४ ते ५ दिवसांपासून सातत्याने बंद करण्यात येत आहे.ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिका-यांना विचारल्यास ‘आम्हाला पाटबंधारे विभागाने पत्र दिले आहे’ असे सांगून अधिकारी मोकळे होतात.वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतक-यांना स्वत:च्या विहिरीतून पाणी काढून जनावरांना पाणी कसे पाजायचे हा प्रश्न पडला आहे.गावात टँकरला दूषित पाणी येते. मग घरी माणसांना पिण्यासाठी पाणी कोठून न्यायचे असे अनेक प्रश्न शेतक-यांसमोर उभा राहिला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प