विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:23 IST2021-07-01T04:23:26+5:302021-07-01T04:23:26+5:30
गेवराई शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संयुक्त कारवाई करतानाचे हे छायाचित्र. - गेवराई : विनामास्क, उशिरा ...

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
गेवराई शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संयुक्त कारवाई करतानाचे हे छायाचित्र.
-
गेवराई : विनामास्क, उशिरा दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाया थंडावल्या, या मथळ्याखाली बुधवारच्या ‘लोकमत’ अंकात वृत्त प्रकाशित होताच याची दखल घेत येथील महसूल, पोलीस, नगरपरिषदेच्यावतीने संयुक्त कारवाई सुरू केली. शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर बुधवारी सकाळी दहा वाजता कारवाई करण्यात आली. यावेळी ॲन्टिजन चाचण्या देखील करण्यात आल्या.
तालुक्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण निघाल्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी झाली आहे. तसेच व्यापारी पेठा देखील खुल्या झाल्याने मोठी गर्दी वाढत आहे. व्यापारी पेठेतील दुकानांना सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र शहरातील अनेक दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू राहतात व रस्त्यावर नागरिक विनामास्क फिरत आहेत. यावर कोणत्याच विभागाकडून कसलीच कारवाई होताना दिसत नव्हती.
या विषयाची बातमी प्रकाशित होताच येथील उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, तहसीलदार सचिन खाडे, पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार, मुख्याधिकारी उमेश ढाकणे, भागवत येवले, नाना कटारनवरे, तलाठी माणिक पांढरे, बाळासाहेब पखाले, नामदेव खेडकर, राजेश राठोड, विठ्ठल सुतार, राम सौंदरमल, गिरी, प्रफुल शहाणे यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विनामास्क फिरणाऱ्या ४५ जणांकडून १६ हजार ३०० रुपये दंड आकारण्यात आला. रस्त्यावर फिरणाऱ्या ७५ नागरिकांची ॲन्टिजन चाचणी करण्यात आली.
===Photopath===
300621\20210630_104304_14.jpg~300621\20210630_102137_14.jpg