शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खरिपासाठी येणार ५९ हजार क्विंटल बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 20:24 IST

आगामी हंगामात साधारण ७ लाख ५४ हजार ८०० हेक्टरवर खरीप पिकांची लागवड होणार असून, त्यासाठी कृषी विभागाने ५९ हजार ७६३ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. 

ठळक मुद्दे समाधानकारक पावसामुळे व जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे जिल्हा पाणीदार झाला आहे.यावर्षी ५ हजार ९४१ क्विंटल म्हणजेच १३ लाख २० हजार २२२ पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. 

- प्रभात बुडूख

बीड : जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे व जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे जिल्हा पाणीदार झाला आहे. त्यामुळे पिके देखील जोमात आली होती. आगामी हंगामात साधारण ७ लाख ५४ हजार ८०० हेक्टरवर खरीप पिकांची लागवड होणार असून, त्यासाठी कृषी विभागाने ५९ हजार ७६३ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. 

गतवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे नगदी पीक असणारे कापूस पिकाचे क्षेत्र ३ लाख २९  हजार ३०० हेक्टर इतके होते. मात्र, कापसावर आलेल्या बोंडअळीच्या संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यावर्षी कापूस लागवडीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. खरीप हंगामासाठी कापुस बियाणांचे यावर्षी ५ हजार ९४१ क्विंटल म्हणजेच १३ लाख २० हजार २२२ पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. 

सोयाबीन पिकाची लागवड देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. यासाठी महाबीजकडून ३० हजार क्ंिवटल तर खाजगी कंपनीकडून १३ हजार ६९९ क्विंटल असे एकूण ४३ हजार ६९९ क्विंटल सोयाबीन बियाणांची मागणी केली आहे. यामध्ये इतर खरीप पिकांचे देखील बियाणे मागवण्यात आले आहे. त्यासोबतच तूर, मूग, उडीद, मका, ज्वारी, सूर्यफूल, भुईमूग, तीळ, बाजरी या पिकांचे बियाणे देखील मागवण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी कोणती खते घ्यावीत, बियाणे घेताना कोणती काळजी घ्यावी, यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांनी बियाणे व खत खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

काही पिकांवर पडलेल्या रोगांमुळे पीक नष्ट होते. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे घेतलेल्या  बियाणांची पावती पीक निघेपर्यंत जपून ठेवावी. जेणेकरून त्याच्याच विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी मदत होईल. तसेच किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री होत असेल तर कृषी विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन देखील कृषी विभागाने केले आहे.  

खते - बियाणे खरेदी करताना....खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर खते व बियाणांमघ्ये शेतकऱ्यांची फसगत होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.त्याच सोबत खरेदीची पावती, खरोदी केलेल्या बियाणे किंवा खत पाकिटाचे सील, टॅग, लॉट नंबर तपासून घ्यावे. तसेच ही पावती पीक कापणीपर्यंत  जपून ठेवावी. तसेच एक्सपायरी डेट पाहूनच बियाणे व खतांची खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

अशी आहे मागणीयावर्षी २६०,७५८ मे.टन खताची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. यामध्ये युरिया ५२ हजार ५५१ मे.ट, डीएसपी १८ हजार ५६० मे.ट, एमओपी ३ हजार २४३ मे.ट, व इतर संयुक्त व मिश्र खतांचा समावेश आहे.

खात्री करून खरेदी करावी शेतकऱ्यांनी बियाणांमधील भेसळीपासून वाचण्यासाठी बियाणांची पाकिटे व खताची गोणी सीलबंद असल्याची खात्री करावी. तसेच अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करून पावती घ्यावी. जेणेकरून फसवणूक होणार नाही. - डी. बी. बिटके, कृषी विकास अधिकारी, जि.प.बीड 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र