शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

खरिपासाठी येणार ५९ हजार क्विंटल बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 20:24 IST

आगामी हंगामात साधारण ७ लाख ५४ हजार ८०० हेक्टरवर खरीप पिकांची लागवड होणार असून, त्यासाठी कृषी विभागाने ५९ हजार ७६३ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. 

ठळक मुद्दे समाधानकारक पावसामुळे व जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे जिल्हा पाणीदार झाला आहे.यावर्षी ५ हजार ९४१ क्विंटल म्हणजेच १३ लाख २० हजार २२२ पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. 

- प्रभात बुडूख

बीड : जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे व जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे जिल्हा पाणीदार झाला आहे. त्यामुळे पिके देखील जोमात आली होती. आगामी हंगामात साधारण ७ लाख ५४ हजार ८०० हेक्टरवर खरीप पिकांची लागवड होणार असून, त्यासाठी कृषी विभागाने ५९ हजार ७६३ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. 

गतवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे नगदी पीक असणारे कापूस पिकाचे क्षेत्र ३ लाख २९  हजार ३०० हेक्टर इतके होते. मात्र, कापसावर आलेल्या बोंडअळीच्या संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यावर्षी कापूस लागवडीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. खरीप हंगामासाठी कापुस बियाणांचे यावर्षी ५ हजार ९४१ क्विंटल म्हणजेच १३ लाख २० हजार २२२ पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. 

सोयाबीन पिकाची लागवड देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. यासाठी महाबीजकडून ३० हजार क्ंिवटल तर खाजगी कंपनीकडून १३ हजार ६९९ क्विंटल असे एकूण ४३ हजार ६९९ क्विंटल सोयाबीन बियाणांची मागणी केली आहे. यामध्ये इतर खरीप पिकांचे देखील बियाणे मागवण्यात आले आहे. त्यासोबतच तूर, मूग, उडीद, मका, ज्वारी, सूर्यफूल, भुईमूग, तीळ, बाजरी या पिकांचे बियाणे देखील मागवण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी कोणती खते घ्यावीत, बियाणे घेताना कोणती काळजी घ्यावी, यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांनी बियाणे व खत खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

काही पिकांवर पडलेल्या रोगांमुळे पीक नष्ट होते. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे घेतलेल्या  बियाणांची पावती पीक निघेपर्यंत जपून ठेवावी. जेणेकरून त्याच्याच विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी मदत होईल. तसेच किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री होत असेल तर कृषी विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन देखील कृषी विभागाने केले आहे.  

खते - बियाणे खरेदी करताना....खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर खते व बियाणांमघ्ये शेतकऱ्यांची फसगत होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.त्याच सोबत खरेदीची पावती, खरोदी केलेल्या बियाणे किंवा खत पाकिटाचे सील, टॅग, लॉट नंबर तपासून घ्यावे. तसेच ही पावती पीक कापणीपर्यंत  जपून ठेवावी. तसेच एक्सपायरी डेट पाहूनच बियाणे व खतांची खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

अशी आहे मागणीयावर्षी २६०,७५८ मे.टन खताची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. यामध्ये युरिया ५२ हजार ५५१ मे.ट, डीएसपी १८ हजार ५६० मे.ट, एमओपी ३ हजार २४३ मे.ट, व इतर संयुक्त व मिश्र खतांचा समावेश आहे.

खात्री करून खरेदी करावी शेतकऱ्यांनी बियाणांमधील भेसळीपासून वाचण्यासाठी बियाणांची पाकिटे व खताची गोणी सीलबंद असल्याची खात्री करावी. तसेच अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करून पावती घ्यावी. जेणेकरून फसवणूक होणार नाही. - डी. बी. बिटके, कृषी विकास अधिकारी, जि.प.बीड 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र