शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

बीड जिल्ह्यात उज्ज्वला योजनेचे ७४ टक्के लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 12:45 AM

सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंपाकासाठी लाकडे जाळू नये तर एलपीजीचा वापर करावा यासाठी राबविलेल्या प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ५७ हजार ग्राहकांना लाभ देण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री उज्वला योजना : जिल्ह्यात १ लाख ५७ हजार लाभार्थी, ग्रामीण भागात दिल्या जाणार सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंपाकासाठी लाकडे जाळू नये तर एलपीजीचा वापर करावा यासाठी राबविलेल्या प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ५७ हजार ग्राहकांना लाभ देण्यात आला आहे. हिंदुस्तान पेट्रोलियमचे विक्री अधिकारी केतन कर्णिक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी योजनेतील बदल व ग्राहकांच्या सुलभ सुविधेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेविषयी माहिती दिली.कर्णिक म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना उज्वला योजनेमुळे मोठ्या प्रमाणात गॅस कनेक्श्न घेता आले आहेत. त्यामुळे महिला स्वयंपाकासाठी लाकूड जाळण्याऐवजी गॅसचा वापर करु लागल्या आहेत. १ मे २०१६ पासून ही योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून बीड जिल्ह्यात जवळपास ७४ टक्के नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, गॅस वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना सुलभ सुविधा देण्यासाठी कंपनीच्या वतीने उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे ते म्हणाले.अनेक नागरिकांना १४ किलो सिंलेंडरची किंमत परवडणारी नसते. त्यामुळे त्यांच्यासाठी ५ किलोचे सिलेंडर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच ग्रामीण भागात बहुतांश शेतक री किंवा मजूर वर्ग आहे, त्यांच्या सुविधेसाठी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस ते घरी असताना गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात यापुर्वी ३१ गॅस एजन्सी कार्यरत होत्या. आता शिरुर व पाटोदा येथेही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गॅस वापराबाबत ग्रामीण भागात अजूनही गैरसमज आहेत, ते दूर करण्यासाठी जनजागृती मोहीम देखील राबवली जात आहे. तसेच ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी किंवा अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे कर्णीक यांनी यावेळी सांगीतले.मार्गदर्शन सेवा : अपघात टाळण्यासाठी मोफत सुविधागॅस वापराबाबत सुरुवातीलाच महिलांना व घरातील इतर सदस्यांना माहिती दिली जाते.गॅस अपघात टाळण्यासाठी रेग्यूलेटर बंद ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर देखील गॅसचा वास आला तर तत्काळ नागिरकांनी १९०६ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा, त्यानंतर नजिकच्या एजन्सीवरील कामगार भेट देऊन दुरुस्ती करतील.नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व धूरामुळे होणाऱ्या आजारापासून दूर रहावे असे आवाहन केतन कर्णिक यांनी केले.

टॅग्स :BeedबीडSocialसामाजिक