शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

७ लाख नागरिकांचा पाणीप्रश्न ऐरणीवर; मांजरा धरणात केवळ ५ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 19:30 IST

अंबाजोगाई, लातूर, केज, धारूर, कळंबसह आसपासच्या खेड्यापाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी पुरेसा साठा झालेला नाही.

ठळक मुद्दे पाणीपुरवठा करणाऱ्या पर्यायी योजनांही कमकुवत ठरू लागल्या आहेत पाणीपुरवठा करणाऱ्या पर्यायी योजनांही कमकुवत ठरू लागल्याने

अंबाजोगाई (बीड) : अंबाजोगाई, लातूर, केज, धारूर, कळंबसह आसपासच्या खेड्यापाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी पुरेसा साठा झालेला नाही. परिणामी आगामी काळात सात लाख नागरिकांची तहान भागवायची कशी? हा मोठा प्रश्न प्रशासनाला भेडसावत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पर्यायी योजनांही कमकुवत ठरू लागल्याने आगामी काळात पाऊस न पडल्यास पाणीप्रश्न तीव्रतेने भेडसावणार आहे.  

अंबाजोगाई व परिसरात जूनच्या प्रारंभीपासूनच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे पेरण्या झाल्या मात्र, पाणीसाठा वाढला जाईल, असा एकही पाऊस जून व जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत झालेला नाही. आष्टी, पाटोदा, मांजरसुंबा या परिसरात मुसळधार पाऊस झाला तरच मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात मुबलक प्रमाणात वाढ होते. मात्र, गत वर्षी मोठा पाऊस झाल्याने धरण भरले होते. शेतकऱ्यांना देण्यात आलेले पाणी व धरणावर अवलंबून असेल्या पाणीपुरवठा योजना यामुळे पाणीसाठा १०० वरुन ५ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. ९५ टक्के पाण्याचा वापर वर्षभरात झाला. आतापर्यंत झालेल्या पावसाळ्यात एकही मोठा पाऊस न झाल्याने जमिनीवरुन पाणी अद्यापतरी वाहिले नाही. परिणामी मांजरा धरणातील पाणीसाठा अद्यापही वाढलेला नाही. 

अंबाजोगाई शहराच्या पाणीपुरवठ्याची मोठी भिस्त मांजरा धरणावरच आहे. साठा संपत आल्याने धरणातून पाणीपुरवठा कधी ठप्प होईल याची अंबाजोगाईकरांना धास्ती आहे. शहरासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून काळवटी साठवण तलावाचा आधार आहे. मात्र, अत्यल्प पावसामुळे या धरणात केवळ ६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध असलेले पाणी कसेबसे तीन ते चार महिने शहरवासियांना देता येईल. दरम्यान, दोन महिन्यांचा पावसाळा लोटला तरी एकदाही मोठा पाऊस न झाल्याने परिसरातील सर्वच जलस्त्रोत निकामी झाले आहेत. ग्रामीण भागातही परिस्थिती पावसाअभावी दयनीय बनल्याचे दिसून येत आहे. आता उरलेल्या नक्षत्रांत किंवा परतीचा  मोठा पाऊस न झाल्यास अंबाजोगाईकरांना पाणीप्रश्न तीव्रतेने भेडसावणार आहे.

धरणात केवळ ५.६७ द.ल.घ.मी. पाणीसाठामांजरा धरणात सध्या ५.६७ द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध असून, पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवला आहे.धरणात पाणीसाठा अत्यल्प राहिल्याने शेती अथवा इतर बाबींना पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे, अशी माहिती मांजरा धरणाचे उपअभियंता महेंद्र जोशी यांनी ‘लोकमत’ला दिली.

मांजराच्या भोवतालचे प्रकल्पही कोरडेठाकमांजरा धरणामध्ये पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी डोकेवाडा, अप्परमांजरा, वाघेबाभूळगाव, महासांगवी हे प्रकल्प भरणे गरजेचे असते. हे प्रकल्प तुडुंब भरल्यानंतरच  पाण्याचा प्रवाह मांजरा धरणात येतो.अद्यापपर्यंत अत्यल्प झालेल्या पावसामुळे हे प्रकल्पच भरले नाहीत. परिणामी धरणाकडे येणारा पाण्याचा प्रवाह अद्यापतरी सुरू झाला नाही. हे प्रकल्प भरल्यानंतर धरणातील पाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणWaterपाणीAmbajogaiअंबाजोगाई