शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

ऐन पावसाळ््यात सुरु होणार ६५० टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:40 AM

जुलै महिन्याचे १२ दिवस उलटून देखील मोठा पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. जिल्हा प्रशासनाने पुन्हा टँकर सुरु करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत.

ठळक मुद्देपावसाची प्रतीक्षा; पाणीपुरवठा करणारे सर्व प्रकल्प कोरडेठाक

बीड : जुलै महिन्याचे १२ दिवस उलटून देखील मोठा पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. जिल्हा प्रशासनाने पुन्हा टँकर सुरु करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ऐन पावसाळ््यात पाणीपुरवठा करण्यासाठी ६५० टँकर सुरु होणार आहेत.एप्रिल ते जून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पिण्याचा प्रश्न गंभीर होता. त्यांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी ९०० पेक्षा अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. दरम्यान दुष्काळी कालावधी संपल्यामुळे व जून महिन्याच्या शेवटी तरी मोठा पाऊस पडेल ही अपेक्षा असल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद केला होता. मात्र, जुलै महिन्याची १३ तारीख आली तरी देखील मोठा पाऊस न झाल्यामुळे, पुन्हा ग्रामीण भागातून टँकरची मागणी होऊ लागली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सर्व तालुक्यांमधून टँकरची आवश्यकतेनुसार मागणीचे प्रस्तवा मागवले होते. त्यानूसार सर्व तालुक्यांनी पुन्हा एकदा जवळपास ६५० टँकरची मागणी केली आहे. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे भर पावसाळ््यात ६५० टँकर सुरु होणार आहेत. तसेच जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे सर्व छोटी- मोठी धरणे देखील कोरडी पडली आहेत. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना कायम आहे.भविष्यकाळाची घोर चिंताजिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे छोटे-मोठे १४४ प्रकल्प कोरडेठाक आहेत. माजलगाव धरणात गोदापात्रातून पाणी येण्याची शक्यता आहे. मात्र, इतर ठिकाणी नद्या कोरड्या असल्यामुळे मोठा पाऊस पडेपर्यंत प्रकल्प कोरडेठाक राहणार आहेत. मोठा पाऊस पडला नाही तर पुढील काळात पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई