शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

दुष्काळमुक्तीसाठी ५ मिनिटांत जमा झाला २५ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. दुष्काळाच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढावे हा आपला धर्म आहे. भारतीय जैन संघटनेने शेतकºयांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केल्यानंतर संघटनेच्या पदाधिका-यांनी दातृत्वाची भूमिका घेत मदतीचा हात दिला. केवळ पाच मिनिटात २५ लाख रुपये दुष्काळी ...

ठळक मुद्देसामाजिक संस्थांच्या पुढाकाराने महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू- शांतीलाल मुथ्था

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. दुष्काळाच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढावे हा आपला धर्म आहे. भारतीय जैन संघटनेने शेतकºयांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केल्यानंतर संघटनेच्या पदाधिका-यांनी दातृत्वाची भूमिका घेत मदतीचा हात दिला. केवळ पाच मिनिटात २५ लाख रुपये दुष्काळी कामासाठी जमा झाल्याचे जाहीर करण्यात आले. ग्रामस्थांनी डिझेलसाठी ६० हजार रुपये जमविल्यास जैन संघटनेच्या स्थानिक पदाधिका-तर्फे २० हजार रुपये प्रत्येक गावासाठी देण्याचा निर्धारही जाहीर करण्यात आला.

जिल्ह्यातील केज, धारूर, अंबेजोगाई, परळी तालुक्यांमधील तहसीलदार, कृषी अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी, बीजेएसचे कार्यकर्ते, तालुका प्रतिनिधींच्या उपस्थितीत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी सभा झाली.श्रमदानाचा टप्पा पूर्ण केलेल्या गावांना भारतीय जैन संघटनेने मोफत जेसीबी,पोकलेन पुरवून दुष्काळ मुक्तीच्या अभियानात सक्रिय सहभाग घेतला आहे. वॉटरकप स्पर्धेत सहभागी गावांतील ग्रामस्थांचा श्रमदानाचा वेग वाढविणे, श्रमदान करणाºया गावांना डिझेल पुरविण्याची प्रक्रिया सोपी करणे, लोकवर्गणीतून डिझेल भरण्याची व्यवस्था करणे या मुख्य मुद्द्यांवर सभेत चर्चा झाली.

या वेळी आ. प्रा. संगीता ठोबरे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, प्राचार्य डॉ. आय. बी. खडकभावी, तहसीलदार शरद झाडके, सामाजिक कार्यकर्ते अक्षय मुंदडा, पंचायत समिती उपसभापती तानाजी देशमुख, विजय वाकेकर, विजयराज बंब, संतोष कुंकुलोळ, नगरसेवक मिलिंद बाबजे, बीडीओ दत्ता गिरी, किशोर बंब, पानी फाउंडेशनचे संतोष सिंनगारे, प्रसाद चिक्षे, ज्ञानप्रबोधिनीचे पदाधिकारी व्यासपीठावर होते.

श्रमदान करणाºया गावांना शासनातर्फे दिला जाणारा निधी तात्काळ उपलब्ध करुन द्यावा, अशी सूचना आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी प्रशासनास केली. भारतीय जैन संघटना व इतर सामाजिक संघटनांमुळेच गावे टंचाईमुक्त झाली आहेत, अशा शब्दात दुष्काळाविरुद्ध लढणाºया सामाजिक संस्थांचा आ. प्रा. ठोंबरे यांनी गौरव केला. आतापर्यंतचे काम उत्कृष्ट असून पहिला पुरस्कार अंबाजोगाईला मिळावा, यासाठी संघटीतपणे प्रयत्न करू, असे आवाहन त्यांनी केले. उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी म्हणाले, श्रमदान करणाºया गावांमध्ये जेसीबीला लागणाºया डिझेलसाठी शासनातर्फे आर्थिक तरतूद केली आहे. तो ग्रामपंचायतींना वर्ग केला जाणार आहे.

राजकिशोर मोदी , अक्षय मुंदडा , संतोष सिंनगारे, किशोर पगारिया यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक धनराज सोळंकी यांनी केले. रतीलाल कुंकुलोळ, निलेश मुथ्था, जैन श्रावक संघ अंबेजोगाइचे अध्यक्ष प्रेमचंद बडेरा, गौतमचंद सोळंकी, प्रकाश मुथ्था, प्रेमचंदजी मुथ्था, शांतीलाल सेठिया, प्रकाश सोळंकी, विजय मुथ्था, सुनील मुथ्था, ललित मुथ्था, अमित रांदड, इंदर लोढा, संतोष कुंकलोळ, नागेश औताडे, सतीश मोरे, नानासाहेब गाठाळ, मिलिंद बाबजे, मनोज लखेरा, संजय सुराणा, गणेश उमनवार आदी उपस्थित होते.

पाण्यासाठी युद्धाची वाट नको, दुष्काळाशी युध्द कराभूकंप, दुष्काळ, मुलींची घटती संख्या यामुळे बीड जिल्ह्याचे चित्र खूप भयानक निर्माण झाले आहे. नकारात्मक परिस्थितीतून जिल्ह्याला बाहेर काढणे एक आव्हान आहे. सलग १० वर्षे काम केल्यास समस्यांवर मात करण्यात यश मिळते.आमीर खान यांनी पाणीप्रश्न हाती घेतला तेंव्हा दुष्काळाची समस्या सुटेल अशी प्रत्येकाची भावना झाली आहे. भविष्यात महाराष्ट्रासाठी नक्कीच चांगले दिवस येतील. पाण्यासाठी युद्ध होईल यासाठी वाट बघत बसण्यापेक्षा दुष्काळाविरुद्ध युद्ध पुकारले तर सर्व समस्या सुटतील असे शांतीलाल मुथ्था यावेळी म्हणाले.

टॅग्स :Beedबीडdroughtदुष्काळFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा