शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळमुक्तीसाठी ५ मिनिटांत जमा झाला २५ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. दुष्काळाच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढावे हा आपला धर्म आहे. भारतीय जैन संघटनेने शेतकºयांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केल्यानंतर संघटनेच्या पदाधिका-यांनी दातृत्वाची भूमिका घेत मदतीचा हात दिला. केवळ पाच मिनिटात २५ लाख रुपये दुष्काळी ...

ठळक मुद्देसामाजिक संस्थांच्या पुढाकाराने महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू- शांतीलाल मुथ्था

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. दुष्काळाच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढावे हा आपला धर्म आहे. भारतीय जैन संघटनेने शेतकºयांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केल्यानंतर संघटनेच्या पदाधिका-यांनी दातृत्वाची भूमिका घेत मदतीचा हात दिला. केवळ पाच मिनिटात २५ लाख रुपये दुष्काळी कामासाठी जमा झाल्याचे जाहीर करण्यात आले. ग्रामस्थांनी डिझेलसाठी ६० हजार रुपये जमविल्यास जैन संघटनेच्या स्थानिक पदाधिका-तर्फे २० हजार रुपये प्रत्येक गावासाठी देण्याचा निर्धारही जाहीर करण्यात आला.

जिल्ह्यातील केज, धारूर, अंबेजोगाई, परळी तालुक्यांमधील तहसीलदार, कृषी अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी, बीजेएसचे कार्यकर्ते, तालुका प्रतिनिधींच्या उपस्थितीत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी सभा झाली.श्रमदानाचा टप्पा पूर्ण केलेल्या गावांना भारतीय जैन संघटनेने मोफत जेसीबी,पोकलेन पुरवून दुष्काळ मुक्तीच्या अभियानात सक्रिय सहभाग घेतला आहे. वॉटरकप स्पर्धेत सहभागी गावांतील ग्रामस्थांचा श्रमदानाचा वेग वाढविणे, श्रमदान करणाºया गावांना डिझेल पुरविण्याची प्रक्रिया सोपी करणे, लोकवर्गणीतून डिझेल भरण्याची व्यवस्था करणे या मुख्य मुद्द्यांवर सभेत चर्चा झाली.

या वेळी आ. प्रा. संगीता ठोबरे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, प्राचार्य डॉ. आय. बी. खडकभावी, तहसीलदार शरद झाडके, सामाजिक कार्यकर्ते अक्षय मुंदडा, पंचायत समिती उपसभापती तानाजी देशमुख, विजय वाकेकर, विजयराज बंब, संतोष कुंकुलोळ, नगरसेवक मिलिंद बाबजे, बीडीओ दत्ता गिरी, किशोर बंब, पानी फाउंडेशनचे संतोष सिंनगारे, प्रसाद चिक्षे, ज्ञानप्रबोधिनीचे पदाधिकारी व्यासपीठावर होते.

श्रमदान करणाºया गावांना शासनातर्फे दिला जाणारा निधी तात्काळ उपलब्ध करुन द्यावा, अशी सूचना आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी प्रशासनास केली. भारतीय जैन संघटना व इतर सामाजिक संघटनांमुळेच गावे टंचाईमुक्त झाली आहेत, अशा शब्दात दुष्काळाविरुद्ध लढणाºया सामाजिक संस्थांचा आ. प्रा. ठोंबरे यांनी गौरव केला. आतापर्यंतचे काम उत्कृष्ट असून पहिला पुरस्कार अंबाजोगाईला मिळावा, यासाठी संघटीतपणे प्रयत्न करू, असे आवाहन त्यांनी केले. उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी म्हणाले, श्रमदान करणाºया गावांमध्ये जेसीबीला लागणाºया डिझेलसाठी शासनातर्फे आर्थिक तरतूद केली आहे. तो ग्रामपंचायतींना वर्ग केला जाणार आहे.

राजकिशोर मोदी , अक्षय मुंदडा , संतोष सिंनगारे, किशोर पगारिया यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक धनराज सोळंकी यांनी केले. रतीलाल कुंकुलोळ, निलेश मुथ्था, जैन श्रावक संघ अंबेजोगाइचे अध्यक्ष प्रेमचंद बडेरा, गौतमचंद सोळंकी, प्रकाश मुथ्था, प्रेमचंदजी मुथ्था, शांतीलाल सेठिया, प्रकाश सोळंकी, विजय मुथ्था, सुनील मुथ्था, ललित मुथ्था, अमित रांदड, इंदर लोढा, संतोष कुंकलोळ, नागेश औताडे, सतीश मोरे, नानासाहेब गाठाळ, मिलिंद बाबजे, मनोज लखेरा, संजय सुराणा, गणेश उमनवार आदी उपस्थित होते.

पाण्यासाठी युद्धाची वाट नको, दुष्काळाशी युध्द कराभूकंप, दुष्काळ, मुलींची घटती संख्या यामुळे बीड जिल्ह्याचे चित्र खूप भयानक निर्माण झाले आहे. नकारात्मक परिस्थितीतून जिल्ह्याला बाहेर काढणे एक आव्हान आहे. सलग १० वर्षे काम केल्यास समस्यांवर मात करण्यात यश मिळते.आमीर खान यांनी पाणीप्रश्न हाती घेतला तेंव्हा दुष्काळाची समस्या सुटेल अशी प्रत्येकाची भावना झाली आहे. भविष्यात महाराष्ट्रासाठी नक्कीच चांगले दिवस येतील. पाण्यासाठी युद्ध होईल यासाठी वाट बघत बसण्यापेक्षा दुष्काळाविरुद्ध युद्ध पुकारले तर सर्व समस्या सुटतील असे शांतीलाल मुथ्था यावेळी म्हणाले.

टॅग्स :Beedबीडdroughtदुष्काळFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा