‘स्वच्छता दर्पण’साठी जिल्ह्यातील १३६४ गावे सज्ज; राष्ट्रीय स्तरावर गुणांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 10:57 PM2019-07-21T22:57:53+5:302019-07-21T23:01:08+5:30

‘स्वच्छता दर्पण’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी १३६४ गावे सज्ज झाली आहेत.

1364 villages ready for cleanliness mirror; National level accreditation | ‘स्वच्छता दर्पण’साठी जिल्ह्यातील १३६४ गावे सज्ज; राष्ट्रीय स्तरावर गुणांकन

‘स्वच्छता दर्पण’साठी जिल्ह्यातील १३६४ गावे सज्ज; राष्ट्रीय स्तरावर गुणांकन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ‘स्वच्छता दर्पण’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी १३६४ गावे सज्ज झाली आहेत. गावातील सर्व कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छग्रहींच्या मदतीने जनजागृती, स्वच्छाग्रहींना प्रशिक्षण व घनकचरा सांडपाण्याचे व्यवस्थापन करणेहे उपक्र म प्रामुख्याने तपासण्यात येणार असून शाश्वत स्वच्छतेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून जनजागृती करण्यावर जिल्ह्याचे गुणांकन होणार आहे.
राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता दर्पण ही गुणांकन स्पर्धा असून ३० जुलैपर्यंत सर्वांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे, शौचालयाचा वापर शाश्वत स्वच्छतेसाठी स्वच्छाग्रही यांची निवड प्रशिक्षण व स्वच्छाग्रह सक्रिय करणे या बाबी या स्पर्धेसाठी महत्त्वाच्या असून सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबबत गावात जनजागृती करण्यासाठी रंगरंगोटी करण्याचे काम अंतीम टप्प्यात आहे.
‘हागणदारी मुक्त गावात आपले स्वागत’ अशा आशयाचे स्वागत फलक व लहान मुलांच्या शौचाचे व्यवस्थापन, शौचालयाचा वापर, शौचालय सर्वांसाठी तसेच घनकचरा व्यवस्थापन हे ४ महत्वाचे चित्रसंदेश गावात रंगवणे गरजेचे आहे. केंद्र शासनाने दिलेला नमुना आकार रंगसंगती प्रमाणे एक स्वागत फलक व चार भिंती रंगवावे. आॅफ अ‍ॅपच्या मदतीने फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. या आधारेच गुणांकन करण्यात येणार आहे. यासाठी २० गुण आहेत. कामासाठी व स्वागत फलक तयार करण्यासाठी १३६४ गावांना निधी उपलब्ध करु न दिला जात आहे.
ग्रामसेवक व सरपंच तसेच गावातील पाच महिलांच्या स्वाक्षरीने रंग कामाचा अहवाल पंचायत समितीस दाखल होताच संबंधित ग्रामपंचायतींच्या खात्यावर रंगकामाचा निधी वितरित करण्यात येणार आहे. यासाठी जिओ टॅगींग महत्वाची आहे. रंग काम पूर्ण करून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर फोटो अपलोड करावयाचा आहे. ग्रामसेवक, सरपंच व देखरेख समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन आपले गाव व ग्रामपंचायत राष्ट्रीय स्तरावर गुणांकनात अव्वल आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
स्वच्छता दर्पण या स्पर्धेचा कालावधी ३० जुलैपर्यंतचा आहे त्यामुळे गावनिहाय कोणत्या बाबी गुणांकन करण्यास साहाय्यभूत होणार आहेत याचा विचार करून काम पूर्ण करून घ्यावे असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे यांनी केले आहे.
जिल्हयातील सहभागी गावे
बीड - २२९, अंबाजोगाई - १०६, गेवराई - २००, माजलगाव - १२६, धारुर - ६७, केज - १२२, पाटोदा - ९७, परळी - १०७, शिरुर - ९१, वडवणी - ४४, आष्टी - १७५

Web Title: 1364 villages ready for cleanliness mirror; National level accreditation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.