शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
5
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
6
कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
7
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
8
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
9
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
10
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
11
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
12
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
13
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
14
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
16
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
17
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
18
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
19
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
20
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल

चेहऱ्यावरील डाग लगेच दूर करण्यासाठी नारळाचं पाणी फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 12:33 IST

नारळाचं पाणी हे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र याने केवळ आरोग्यच नाही तर आपलं सौंदर्य वाढवण्यासाठीही मदत मिळते.

(Image Credit : makeupandbeauty.com)

नारळाचं पाणी हे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र याने केवळ आरोग्यच नाही तर आपलं सौंदर्य वाढवण्यासाठीही मदत मिळते. नारळाच्या पाण्यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. याने त्वचेला वेगवेगळे फायदे होतात. चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स दूर करण्यासाठी नारळाचं पाणी फार फायदेशीर ठरतं. तसेच त्वचा मुलायम होण्यासही मदत होते. 

चेहरा उजळवण्यासाठी फायदेशीर

(Image Credit : makeupandbeauty.com)

नारळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावर एक तजेलदारपणा येतो. नारळाल्या पाण्यात अँटी-ऑक्सिडेंट्स आणि मिनरल्स असतात. जे त्वचेच्या मुळात जाऊन त्वचेला पोषण देतात. तसेच नारळाच्या पाण्याक व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम, मॅग्नीज, पोटॅशिअम, सोडियम आणि कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे याने त्वचेची चांगल्याप्रकारे टोनिंग केली जाते. आणि नैसर्गिक रंग मिळतो. 

डाग होतात दूर

(Image Credit : www.adorebeauty.com.au)

नारळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत मिळते. त्यामुळे आठवड्यातून कमीत कमी २ ते ३ वेळा नारळाचं पाणी चेहऱ्यावर १० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर नारळाच्या पाण्याने चेहऱ्याची मसाज करा. नंतर साध्या पाण्याचे चेहरा स्वच्छ करा. याने त्वचेवरील डाग तर दूर होतीलच सोबतच त्वचेवरील सुरकुत्या दूर होतील. 

पिंपल्सची समस्या होईल दूर

(Image Credit : www.medicalnewstoday.com)

हार्मोन्समधीस बदल आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे पिंपल्स येतात. तेलकट त्वचा असणाऱ्यांना ही पिंपल्सची समस्या अधिक होते. अशात नारळाच्या पाण्याचा वापर तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर चेहरा नारळाच्या पाण्याने स्वच्छ करावा. याने हळूहळू पिंपल्स दूर होतील आणि चेहऱ्यावर डागही राहणार नाहीत. 

टॅनिंगची समस्या करा दूर

(Image Credit : beautyhealthtips.in)

हिवाळ्यात असो वा उन्हाळ्यात जास्त उन्हामुळे त्वचेवर टॅनिंगची समस्या होते. टॅनिंग आणि सूर्यकिरणांमुळे त्वचेला होणारी समस्याही दूर करण्यासाठी नारळाचं पाणी फायदेशीर ठरतं. जर जास्त वेळ उन्हात राहिल्याने त्वचा काळपट पडली असेल किंवा त्वचेची जळजळ होत असेल कापसाच्या मदतीने नारळाचं पाणी त्वचेवर लावा. दररोज दिवसातून दोनदा नारळाचं पाणी त्वचेवर लावल्याने त्वचा स्वच्छ होईल.  

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स