शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

सर्व्हिसचा नवा नियम पारदर्शक नाही- एच. एस. प्रणॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 22:02 IST

जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) आणलेल्या सर्व्हिसच्या नवीन नियमांविरुद्ध खेळाडू काही करू शकत नाहीत. त्यांना त्याप्रमाणे खेळावेच लागेल. या निर्णयानुसार अद्याप माझ्या सर्व्हिसमध्ये कोणतीही चूक समोर आलेली नसली, तरी सर्व्हिस फॉल्ट ठरविणे हे प्रत्येक पंचाच्या विचारसरणीवर अवलंबून आहे.

- रोहित नाईकमुंबई : जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) आणलेल्या सर्व्हिसच्या नवीन नियमांविरुद्ध खेळाडू काही करू शकत नाहीत. त्यांना त्याप्रमाणे खेळावेच लागेल. या निर्णयानुसार अद्याप माझ्या सर्व्हिसमध्ये कोणतीही चूक समोर आलेली नसली, तरी सर्व्हिस फॉल्ट ठरविणे हे प्रत्येक पंचाच्या विचारसरणीवर अवलंबून आहे. हा नियम पारदर्शक नसल्याने येत्या काही काळात हा नियम रद्द केला, तर नक्कीच याचा फायदा खेळाडूंना होईल, असे मत भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय याने लोकमतकडे व्यक्त केले.४ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी प्रणॉयने कंबर कसली असून, या निमित्ताने त्याने लोकमतशी विशेष संवाद साधला. जागतिक बॅडमिंटनमध्ये सर्व्हिसच्या बदललेल्या नियमांचा फटका काही दिवसांपूर्वीच भारताचा स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतला बसला होता. यामुळे प्रतिष्ठेच्या आॅल इंग्लंड स्पर्धेतून त्याला अनपेक्षितपणे आपला गाशा गुंडाळावा लागला होता. याविषयी विचारले असता, प्रणॉय म्हणाला की, नवीन नियम अंमलात आणल्यापासून माझ्या सर्व्हिसमध्ये एकदाही दोष आढळला नाही. नव्या नियमानुसार सर्व्हिस चुकीचे ठरविणे हे पूर्णपणे पंचांच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.प्रत्येक पंच या नियमाकडे आपल्या परीने पाहात असल्याने, या नियमात पारदर्शीपणा नाही आणि त्याचा फटका खेळाडूंना बसतो. असे असले, तरी बीडब्ल्यूएफच्या नियमांविरुद्ध आम्ही काहीही करू शकत नाही. आम्हाला नव्या नियमांप्रमाणे तडजोड करून खेळावेच लागते. कदाचित, पुढील २-३ महिन्यांमध्ये हा नियम रद्द करण्यात आला, तर निश्चित याचा खेळाडूंना फायदा होईल.राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीबाबत प्रणॉय म्हणाला की, आॅल इंग्लंड स्पर्धेनंतर राष्ट्रकुलसाठी तयारी करण्यास आम्हाला १० दिवस मिळाले. या कालावाधीमध्ये खेळामध्ये फार काही बदल करता आला नाही, पण तरीही चांगली तयारी झाली आहे. २-३ दिवसांत आम्ही गोल्डकोस्टला जाऊ. एकूणच सध्या आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आता आम्हाला केवळ गोल्ड कोस्ट येथील परिस्थितींशी जुळवून घ्यायचे आहे.नुकताच झालेल्या आॅल इंग्लंड स्पर्धेत प्रणॉयने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली होती.याविषयी तो म्हणाला की, यंदाच्या आॅल इंग्लंड स्पर्धेत माझी कामगिरी चांगली झाली. या स्पर्धेतील अनुभवाचा खूप फायदा होईल. पहिले सामने जिंकणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. यामुळे मला माझा खेळ आणखी उंचावता आला. एकूणच या स्पर्धेमुळे आत्मविश्वास खूप उंचावला असून, राष्ट्रकुल आणि त्यानंतर आशियाई स्पर्धेत याचा नक्कीच फायदा होईल.---------------------------भारतीय संघ कागदावर खूप मजबूत दिसत आहे. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, के. श्रीकांत यांच्यासह दुहेरीतही भारतीय चांगले खेळत आहेत. सांघिक गटामध्ये भारताला पदक जिंकण्याची खूप चांगली संधी आहे. सांघिक गटात भारत सुवर्ण जिंकेल, अशी आशा आहे.- एच. एस. प्रणॉय

टॅग्स :BadmintonBadminton