शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

यंदा वाहन विक्री झाली २२ टक्क्यांनी कमी; १० वर्षांतील नीचांक, दिवाळी गेली वाईट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 08:58 IST

वाहन क्षेत्रासाठी हा १० वर्षांतील सर्वाधिक वाईट हंगाम राहिला.

नवी दिल्ली: यंदा सणासुदीच्या हंगामात वाहनविक्रीत तब्बल २२ टक्क्यांची घसरण झाली असून विक्रीत १० वर्षांतील नीचांक झाला आहे. भारतात नवरात्र ते दिवाळी या काळास सणासुदीचा हंगाम समजले जाते. या काळात देशभर जोरदार खरेदी होते. वाहन क्षेत्रासाठी तर हा पर्वणीचा काळ असतो. यंदा मात्र बाजारात निराशाजनक चित्र पाहायला मिळाले.

वाहन क्षेत्रासाठी हा १० वर्षांतील सर्वाधिक वाईट हंगाम राहिला. नवरात्र ते दिवाळी या ३० दिवसांच्या काळात प्रवासी वाहनांची विक्री एक तृतीयांशने घटली आहे. गेल्या वर्षी ४ लाख ५५ हजार प्रवासी वाहने विकली गेली असताना यंदा केवळ ३ लाख वाहनांची विक्री झाली. सरकारच्या वाहन पोर्टलनुसार, यंदा वाहन उत्पादकांनी २,३८,७७६ वाहनांची विक्री केली.

गेल्या वर्षी ३,०५,९१६ वाहनांची विक्री झाली होती. याचाच अर्थ यंदा विक्री २२ टक्क्यांनी घटली आहे. दुचाकी वाहनांच्या विक्रीत ११ टक्के, तर ट्रॅक्टर विक्रीत १३ टक्के घसरण झाली आहे. उत्तरप्रदेशात वाहन विक्रीत ३.५ टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये ६ ते ९ टक्क्यांची घसरण झाली आहे.

बिहार, दिल्ली, गुजरात, पंजाब, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांत वाहन विक्री १५ ते २२ टक्क्यांनी घसरली आहे.  सूत्रांनी सांगितले की, वाहन पोर्टल देशातील ८५ टक्के विभागीय परिवहन कार्यालयातील वाहन नोंदणीवर आधारित डाटा तयार करते. हा डाटा ७ ते १५ दिवसांनी उशिरा येतो. दिवाळीतील संपूर्ण आकडेवारी येण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. 

टॅग्स :Automobileवाहन