शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

वाहन क्षेत्रात मंदी नाही; व्यापारी संघटना CAIT चा कंपन्यांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 16:22 IST

भारतात मंदीची सुरुवात वाहन कंपन्यांपासून सुरू झाली होती. जीडीपी घसरण झाल्यानंतर झालेल्या टीकेवरून अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ओला-उबरच्या माथी मंदीचे खापर फोडले होते.

नवी दिल्ली : भारतात मंदीची सुरुवात वाहन कंपन्यांपासून सुरू झाली होती. जीडीपी घसरण झाल्यानंतर झालेल्या टीकेवरून अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ओला-उबरच्या माथी मंदीचे खापर फोडले होते. तर गडकरीनी थोडी कळ सोसा, हे ही दिवस जातील, असा सबुरीचा सल्ला दिला होता. मात्र, देशातील व्यापारी संघटना CAIT ने वाह निर्मिती कंपन्यांवरच गंभीर आरोप केला आहे. 

मारुती, टाटासारख्या मोठ्या कंपन्यांना मागणी घटल्यामुळे कंपन्या काही दिवसांसाठी बंद ठेवाव्या लागत आहेत. तसेच यामुळे कामगार कपातही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. मात्र, सीएआयटीने या कंपन्यांवरच मोठा आरोप केला असून केवळ सरकारकडून पॅकेड पदरात पाडण्यासाठीच या कंपन्या रडत असल्याचे म्हटले आहे. 

जगभरात मंदीचे वातावरण आहे. जीएसटी, दुष्काळ, मजुरी आणि रोखीच्या कमतरतेमुळे वाहनांच्या विक्रीमध्ये सुस्ती आली आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) चे सचिव प्रविण खंडेलवाल यांनी सांगितले की, देशातील वाहन उद्योगामध्ये मंदी नाही. ते केवळ पॅकेज मिळविण्यासाठी असे करत आहेत. नुकत्याच लाँच झालेल्या कारना मोठा प्रतिसाद मिळत आहे. या बुकिंग पाहिल्यास कोणत्या क्षेत्रात मंदी आल्याचे वाटत नाही. 

याचसोबत त्यांनी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांद्वारा फेस्टिव्हल सेलवर तातडीने बंदी आणण्याची मागणी केली आहे. य़ा कंपन्या एफडीआयच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. सरकारने कारवाई न केल्यास आम्ही न्यायालयाची पायरी चढू. या कंपन्यांना केवळ बी2बी व्यवसाय करण्याची परवानगी आहे. मात्र, ते मोठ्या जाहिराती अभियानामध्ये सहभागी होतात. या कंपन्या व्यापार करत नसून मुल्यांकनाचा व्यवहार करत आहेत. त्यांनी मागील 5 वर्षांतील टॉप 10 व्हेंडर्सची माहिती दिली पाहिजे. भारतात व्याजदर जास्त असून या कंपन्यांना परदेशातून कमी व्याजाने कर्ज मिळत असल्याचा आरोप केला आहे.

टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योगNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNitin Gadkariनितीन गडकरी