शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

वाहन क्षेत्रात मंदी नाही; व्यापारी संघटना CAIT चा कंपन्यांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 16:22 IST

भारतात मंदीची सुरुवात वाहन कंपन्यांपासून सुरू झाली होती. जीडीपी घसरण झाल्यानंतर झालेल्या टीकेवरून अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ओला-उबरच्या माथी मंदीचे खापर फोडले होते.

नवी दिल्ली : भारतात मंदीची सुरुवात वाहन कंपन्यांपासून सुरू झाली होती. जीडीपी घसरण झाल्यानंतर झालेल्या टीकेवरून अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ओला-उबरच्या माथी मंदीचे खापर फोडले होते. तर गडकरीनी थोडी कळ सोसा, हे ही दिवस जातील, असा सबुरीचा सल्ला दिला होता. मात्र, देशातील व्यापारी संघटना CAIT ने वाह निर्मिती कंपन्यांवरच गंभीर आरोप केला आहे. 

मारुती, टाटासारख्या मोठ्या कंपन्यांना मागणी घटल्यामुळे कंपन्या काही दिवसांसाठी बंद ठेवाव्या लागत आहेत. तसेच यामुळे कामगार कपातही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. मात्र, सीएआयटीने या कंपन्यांवरच मोठा आरोप केला असून केवळ सरकारकडून पॅकेड पदरात पाडण्यासाठीच या कंपन्या रडत असल्याचे म्हटले आहे. 

जगभरात मंदीचे वातावरण आहे. जीएसटी, दुष्काळ, मजुरी आणि रोखीच्या कमतरतेमुळे वाहनांच्या विक्रीमध्ये सुस्ती आली आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) चे सचिव प्रविण खंडेलवाल यांनी सांगितले की, देशातील वाहन उद्योगामध्ये मंदी नाही. ते केवळ पॅकेज मिळविण्यासाठी असे करत आहेत. नुकत्याच लाँच झालेल्या कारना मोठा प्रतिसाद मिळत आहे. या बुकिंग पाहिल्यास कोणत्या क्षेत्रात मंदी आल्याचे वाटत नाही. 

याचसोबत त्यांनी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांद्वारा फेस्टिव्हल सेलवर तातडीने बंदी आणण्याची मागणी केली आहे. य़ा कंपन्या एफडीआयच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. सरकारने कारवाई न केल्यास आम्ही न्यायालयाची पायरी चढू. या कंपन्यांना केवळ बी2बी व्यवसाय करण्याची परवानगी आहे. मात्र, ते मोठ्या जाहिराती अभियानामध्ये सहभागी होतात. या कंपन्या व्यापार करत नसून मुल्यांकनाचा व्यवहार करत आहेत. त्यांनी मागील 5 वर्षांतील टॉप 10 व्हेंडर्सची माहिती दिली पाहिजे. भारतात व्याजदर जास्त असून या कंपन्यांना परदेशातून कमी व्याजाने कर्ज मिळत असल्याचा आरोप केला आहे.

टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योगNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNitin Gadkariनितीन गडकरी