शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

सिग्नलला थांबताना योग्य अंतर राखून वाहन थांबवणे हे सर्वांच्याच सुरक्षिततेसाठी आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 09:30 IST

सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगपूर्वी असलेल्या पांढ-या आडव्या रेषेआधी वाहन थांबवणे व हिरवा सिग्नल लागल्यानंतर मगच पुढे जाणे गरजेचे आहे. हा नियम आहेच पण त्यापेक्षाही सूज्ञ नागरीकाचेही लक्षण आहे.

वाहतूक सिग्नलला योग्यवेळी थांबणे हे सर्वात महत्त्वाचे असते. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये सिग्नल यंत्रणा खूप ब-यापैकी प्रभावी आहेत. त्यांचा उपयोग खरे म्हणजे प्रत्येका वाहनचालकाने नीट केला आणि वाहतूक, पार्किंगचे विविध नियम किमान 70 टक्के जरी पाळले तरी प्रचंड वाढलेल्या वाहनांच्या संख्येमध्येही वाहतूक कोंडीची समस्या नाही म्हटली तरी ब-याच प्रमाणात कमी होऊ शकेल. सिग्नल यंत्रणा, त्याद्वारे दिले जाणारे संकेत हे म्हणूनच अतिशय मोलाचे असतात. तसेच सिग्नलचा अर्थ नेमका समजून त्यानुसार सिग्नलपूर्वी असलेल्या दोन आडव्या पांढ-या रेषांपूर्वी तुम्ही तुमचे वाहन थांबवणे गरजेचे आहे. या रेषा झेब्रा क्रॉसिंगच्या आधी असतात. त्याआधी वाहन थांबवणे गरजेचे आहेच, कारण त्यामुळे पादचारीही योग्य पद्धतीने रस्ता ओलांडू शकतील. सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत म्हणून मुंबईत आज या रेषांचे पालन गेल्या काही महिन्यांपासून अनेकजण करू लागले आहेत. सीसीटीव्हीमुळे अयोग्य पद्धतीने सिग्नलला उभ्या असणा-या वाहनांवर कारवाई होते, पोलीस नियंत्रण त्यावर आहे, त्यामुळे हे होत आहे. हा कदाचित काहींना समज तर काहींना गैरसमजही वाटू शकला तरी वस्तुस्थिती मात्र काही सुधार झाल्यासारखी आहे हे कमी नाही.

सिग्नलला वाहन थांबवताना तुम्हा पुढे सरळ जायचे आहे की डाव्या वा उजव्या बाजूला वळायचे आहे की यू टर्न घ्यायचा आहे, हे देखील चालकाने लक्षात घेतले पाहिजेच. त्यानुसार वाहन योग्य रांगेत ठेवमे, यू टर्न नसेल तर तेथे यू टर्न घेऊ नये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिग्नल कधी हिरवा होणार आहे त्याचा अंदाज असला किंवा डिजिटल सेकंद दिसतात, त्या दर्शकानुसार आधीच पुढे वाहन सरकवण्याचा प्रकारही टाळला गेला पाहिजे. मुळात सिग्नलचा वापर अतिशय शिस्तबद्धपणे करायला हवा. तो पाळायला हवा. त्यावर नियंत्रण ठेवणारी पोलीस यंत्रणा तशी प्रभावी नाही. त्यांची संख्या कमी असेल किंवा ती त्यामुळे निष्प्रभ वाटत असेल तरी मुळात सिग्नलचा मान राखायला हवा. तो अनेकदा राखला जात नाही, हे जरी थांबले तरी वाहन चालकाला ड्रायव्हिंग सेन्स, मानसिक स्थिरताही नीटपणे येऊ शकेल. उतावळेपणाला आळा घालणारा हा सिग्नल खरे म्हणजे प्रत्येकाला मानसिक स्थिर राहायला सागणारा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

सिग्नलबाबत मोठ्या रस्त्यावर, महामार्गावर, लेव्हल क्रॉसिंगवर विशेष जाणीवपूर्वक लक्ष देऊन अनुसरणे गरजेचे आहे. अनेकदा मोठ्या रस्त्यांवर वाहनाचा वेग कमी करायचाच नाही, सिग्नल उडवायचा या विचारातून सिग्नल उडवला जातो, अशावेळी आडव्या जाणाऱ्या व सिग्नल पाळून तेथे थांबलेल्या अन्य वाहनालाही धडक बसू शकते. वाहन चालवताना केवळ स्वतःच्या वाहनाचा वा स्वतःचा विचार करून योग्य नाही. अन्य वाहनचालक हे तुमच्या बेदरकार व नियम उल्लंघन करण्याच्या प्रकारामुळे धास्तावू शकतात, दुचाकीसारखी छोटी वाहने थांबलेली असली, तर त्यांच्या बाजूने जागा आहे म्हणून सिग्नल लाल असतानाही तो उडवून जाणे यामुळे दुचाकीस्वाराला धक्काही बसू शकतो, त्याचा तोलही जाऊ शकतो, हे मोठ्या वाहनांच्या चालकांनी गांभीर्याने लक्षात घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे दुचाकी चालकांनीही सिग्नल उडवून वाहनांमधील गॅपमधून जाण्याचा व सिग्नल न जुमानण्याचा प्रकार होत असतो. अशावेळी अन्य वाहनांनाही दुचाकीची धडक बसू शकते व दुचाकीस्वारालाही त्यामुळे इजा होऊ शकते, त्याचप्रमाणे सिग्नलला थांबलेल्या अन्य दुचाकींनाही तुमचा धक्का लागू शकतो. एखादा पादचारी रस्ता ओलांडण्यासाठी आलेला असताना त्यालाही तुमच्या बेदरकारीचा फटका बसू शकतो. यामुळेच सिग्नलला योग्य अंतरापूर्वी वाहन थांबवण्याची दक्षता घेणे, योग्य रांगेत राहाणे ही गरजेची, सुरक्षिततेची व चांगल्या नागरीकाची खूण आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. 

टॅग्स :Automobileवाहनfour wheelerफोर व्हीलरtwo wheelerटू व्हीलरroad safetyरस्ते सुरक्षा