शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लोकांनी हायवेवरून बैलगाड्या चालवाव्या का?; खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 12:01 IST

देशभरात खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देदेशभरात जवळपास सर्वच राज्यांमध्ये रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनिय आहे.प्रवासादरम्य़ान ते खड्ड्यांनी एवढे त्रस्त झाले की येताना ट्रेनचा प्रवास पसंत केला आणि त्यांची कार गयामध्येच सोडून परत आले.एनएचएआयने या रस्त्याबद्दल जे सांगितले ते प्रत्यक्ष परिस्थितीपासून शेकडो मैल दूर आहे.

देशभरात जवळपास सर्वच राज्यांमध्ये रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनिय आहे. रस्ते अपघातात मोठी वाढ झाली आहे. यासाठी हे खड्डेमय रस्तेही जबाबदार असल्याचे अपघातातील कारणांवरून लक्षात येते. यावर पटना उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच फटकारले आहे. हायवेवरही खड्डयांचे साम्राज्य झाले आहे, आता लोकांनी त्यावरून बैलगाड्या चालवायच्या का? असा सवाल केला आहे. 

पटना ते गया या राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. यावर याचिका दाखल केली असून यावर मुख्य न्यायाधीश संजय करोल आणि एस कुमार यांच्या बेंचने सुनावणी घेतली. 18 डिसेंबर 2019 ला करोल गयाला गेले होते. यावेळी प्रवासादरम्य़ान ते खड्ड्यांनी एवढे त्रस्त झाले की येताना ट्रेनचा प्रवास पसंत केला आणि त्यांची कार गयामध्येच सोडून परत आले. यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी भर न्यायालयातच प्रवासाचा अनुभव सांगितला. गयाला गेल्यानंतर पुन्हा पटनाला कारने परतण्य़ाची आपली हिंमत झाली नाही असे सांगत नाराजी व्यक्त केली होती. तसेच एनएचएआयने या रस्त्याबद्दल जे सांगितले ते प्रत्यक्ष परिस्थितीपासून शेकडो मैल दूर आहे. तेव्हापासून या विषयावर सुनावणी होत आहे. 

ग्लोबल एनकॅपकडे एकही कार पाठवणार नाही; सुरक्षा चाचण्यांपासून मारुतीनं काढला पळ

नव्या बॉन्डपटात Land Rover द्वारे चित्तथरारक स्टंट; पाहा 'ती' आहे तरी कोण...

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ज्या कंपनीला टेंडर दिले होते त्या कंपनीचे दिवाळे निघाले आहे. 127 किमीच्या लांबच्या या रस्त्याची निविदा 2015 मध्ये निघाली होती. तेव्हा 1232 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, ही निविदा मिळालेली कंपनी दिवाळखोरीत निघाली. यानंतर ऑक्टोबर 2018 पासून काम पूर्ण बंद झाले आहे. यामुळे हा रस्ता तीन टप्प्यांत विभागून नव्य़ाने निविदा मागविण्यात आल्या आहेत. आता याचा खर्च 1795 कोटींवर गेला आहे.

टॅग्स :highwayमहामार्गHigh Courtउच्च न्यायालयPotholeखड्डेBiharबिहार