शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

लोकांनी हायवेवरून बैलगाड्या चालवाव्या का?; खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 12:01 IST

देशभरात खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देदेशभरात जवळपास सर्वच राज्यांमध्ये रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनिय आहे.प्रवासादरम्य़ान ते खड्ड्यांनी एवढे त्रस्त झाले की येताना ट्रेनचा प्रवास पसंत केला आणि त्यांची कार गयामध्येच सोडून परत आले.एनएचएआयने या रस्त्याबद्दल जे सांगितले ते प्रत्यक्ष परिस्थितीपासून शेकडो मैल दूर आहे.

देशभरात जवळपास सर्वच राज्यांमध्ये रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनिय आहे. रस्ते अपघातात मोठी वाढ झाली आहे. यासाठी हे खड्डेमय रस्तेही जबाबदार असल्याचे अपघातातील कारणांवरून लक्षात येते. यावर पटना उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच फटकारले आहे. हायवेवरही खड्डयांचे साम्राज्य झाले आहे, आता लोकांनी त्यावरून बैलगाड्या चालवायच्या का? असा सवाल केला आहे. 

पटना ते गया या राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. यावर याचिका दाखल केली असून यावर मुख्य न्यायाधीश संजय करोल आणि एस कुमार यांच्या बेंचने सुनावणी घेतली. 18 डिसेंबर 2019 ला करोल गयाला गेले होते. यावेळी प्रवासादरम्य़ान ते खड्ड्यांनी एवढे त्रस्त झाले की येताना ट्रेनचा प्रवास पसंत केला आणि त्यांची कार गयामध्येच सोडून परत आले. यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी भर न्यायालयातच प्रवासाचा अनुभव सांगितला. गयाला गेल्यानंतर पुन्हा पटनाला कारने परतण्य़ाची आपली हिंमत झाली नाही असे सांगत नाराजी व्यक्त केली होती. तसेच एनएचएआयने या रस्त्याबद्दल जे सांगितले ते प्रत्यक्ष परिस्थितीपासून शेकडो मैल दूर आहे. तेव्हापासून या विषयावर सुनावणी होत आहे. 

ग्लोबल एनकॅपकडे एकही कार पाठवणार नाही; सुरक्षा चाचण्यांपासून मारुतीनं काढला पळ

नव्या बॉन्डपटात Land Rover द्वारे चित्तथरारक स्टंट; पाहा 'ती' आहे तरी कोण...

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ज्या कंपनीला टेंडर दिले होते त्या कंपनीचे दिवाळे निघाले आहे. 127 किमीच्या लांबच्या या रस्त्याची निविदा 2015 मध्ये निघाली होती. तेव्हा 1232 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, ही निविदा मिळालेली कंपनी दिवाळखोरीत निघाली. यानंतर ऑक्टोबर 2018 पासून काम पूर्ण बंद झाले आहे. यामुळे हा रस्ता तीन टप्प्यांत विभागून नव्य़ाने निविदा मागविण्यात आल्या आहेत. आता याचा खर्च 1795 कोटींवर गेला आहे.

टॅग्स :highwayमहामार्गHigh Courtउच्च न्यायालयPotholeखड्डेBiharबिहार