शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

केंद्र सरकारने जाहीर केले नवीन EV धोरण, Tesla चा भारतात येण्याचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 15:49 IST

Tesla in India: केंद्र सरकारने आपले बहुप्रतिक्षित EV धोरण जाहीर केले आहे.

New EV Policy: केंद्र सरकारने शुक्रवारी(15 मार्च) नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण (EV Policy) जाहीर केले. या धोरणाकडे Tesla सह जगभरातील आघाडीच्या EV वाहन उत्पादक कंपन्यांचे लक्ष होते. नवीन EV धोरणावर परकीय गुंतवणूक भारतात आणण्यावर सर्वाधिक भर दिला गेला आहे. याशिवाय, EV तंत्रज्ञान उत्पादनात भारताला अग्रेसर बनवण्याचाही प्रयत्न केला जाईल. 

आयात करात सवलत मिळेलनवीन धोरणानुसार, परदेशी कंपन्यांना भारतात किमान 4,150 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल, तर कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. या नवीन धोरणांतर्गत करात मोठी सूटही दिली जाणार आहे. एखाद्या कंपनीने भारतात 500 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आणि 3 वर्षांच्या आत देशात उत्पादन प्रकल्प सुरू केला, तर त्या कंपनीला आयात करात (Custom Duty) सवलत दिली जाईल. मात्र, उत्पादकांना एका वर्षात जास्तीत जास्त 8,000 इलेक्ट्रिक कार भारतात आयात करण्याची परवानगी असेल. 

अनेक कंपन्या भारतात येतीलसरकारने अधिकृत निवेदनात म्हटले की, आघाडीची ईव्ही उत्पादक टेस्लासह जगातील मोठ्या कंपन्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. नवीन धोरण देशातील ईव्ही इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी काम करेल. याशिवाय EV सेगमेंटचे प्रगत तंत्रज्ञानही भारतात आणले जाईल. 

मेड इन इंडिया पार्ट्स वापरावे लागतीलनवीन EV धोरणानुसार, कंपन्यांना 3 वर्षांत भारतात बनवलेले सुमारे 25 टक्के भाग आणि 5 वर्षांत भारतात बनवलेले किमान 50 टक्के भाग वापरावे लागतील. जर एखाद्या कंपनीने भारतात आपला प्लांट स्थापन केला, तर तिला भारतात $35,000 किंवा त्याहून अधिक किमतीच्या कार असेंबलिंगवर 15 टक्के सीमाशुल्क भरावे लागेल. ही सुविधा 5 वर्षांसाठी उपलब्ध असेल. जगभरातील आघाडीच्या ईव्ही कंपन्यांना भारतात आणण्यासाठी हे नवीन धोरण आणण्यात आले आहे.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरCentral Governmentकेंद्र सरकारElectric Carइलेक्ट्रिक कारAutomobile Industryवाहन उद्योगbusinessव्यवसाय