शहरं
Join us  
Trending Stories
1
ZP Election 2026: मोठी बातमी! १२ जिल्हा परिषद, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आज घोषणा होणार? थोड्याच वेळात आयोगाची पत्रकार परिषद 
2
“बाळासाहेबांचे स्वप्न साकार करूया”; मनसेच्या निष्ठावंताची पत्रातून मतदारांना भावनिक साद
3
लोकलच्या गर्दीने घेतला आणखी एक बळी; नाहूर स्थानकाजवळ धावत्या ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू
4
३२ वर्षीय तरुण बनणार टाटा ग्रुपचे पॉवर सेंटर? विश्वस्तांच्या वादात नोएल टाटांची पकड मजबूत
5
तुमचा पोर्टफोलिओ बनवा 'पॉवरफुल'! सिमेंट, ऊर्जा आणि विमा क्षेत्रातील हे शेअर्स देणार बंपर परतावा
6
पाकिस्तानचा 'डेंजरस' प्लॅन! भारताने ज्या विमानाला धूळ चारली, तेच आता 'या' देशाला विकणार?
7
अमेरिकेची मोठी कारवाई! वर्षभरात एक लाखांहून अधिक व्हिसा रद्द; भारतीय विद्यार्थी, व्यावसायिकांच्या अडचणी वाढणार?
8
मुंबईत उद्धवसेना अन् मनसेला किती जागा मिळणार?; भाजपाच्या बड्या नेत्याने थेट आकडाच सांगितला
9
विराट रोहितला म्हणाला- तो बघ माझा ड्युप्लिकेट बसलाय...; 'छोटा चिकू'ने सांगितली आठवण (VIDEO)
10
नवऱ्यासाठी सोडली मोठ्या पगाराची नोकरी, त्यानेच केला विश्वासघात; गर्लफ्रेंडसोबत पकडलं रंगेहाथ
11
गुगलला माहितीये तुमचं प्रत्येक सिक्रेट; खासगी आयुष्य जपायचं असेल, तर आजच बदला 'या' ३ सेटिंग्स
12
"मला हवं, ते करेन...!" ट्रम्प यांच्या निर्णयावरून चीन भडकला, AI व्हिडिओ जारी करत उडवली खिल्ली
13
Makar Sankranti 2026: चिनी मांजा वापरणाऱ्यांची आता खैर नाही! ५ वर्षांच्या तुरुंगवासासह दंडाची तरतूद
14
महिलांना ३ हजार, मेट्रो-रो-रो सेवा, ५० वर्षांची पाण्याची सोय; हितेंद्र ठाकूरांचा जाहीरनामा
15
वचन लाल डोळा दाखवण्याचे होते...: काँग्रेस! गलवान संघर्षानंतर काय बदलले? चिनी कम्युनिस्ट पक्षाचे शिष्टमंडळ भाजप मुख्यालयात; संकेत काय?
16
सकाळी उठल्या उठल्या चहा लागतोच, उपाशी पोटी पिण्याची सवय बदला; आरोग्यासाठी ठरेल घातक
17
चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी दिली भाजपाच्या मुख्यालयाला भेट, ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा
18
America Iran Tariff: अमेरिकेचा इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांना इशारा, २५ टक्के अतिरिक्त टॅरिफची घोषणा; भारतावर होणार 'हा' परिणाम
19
सैराट! प्रेमाला विरोध, पोटच्या लेकीचं कुंकू पुसलं; घरात घुसून जावयावर झाडल्या गोळ्या, परिसर हादरला
20
७६८ पट सबस्क्राईब झालेला 'हा' IPO; पण बाजारात एन्ट्री घेताच लोअर सर्किट, ₹८४ वर आला शेअर
Daily Top 2Weekly Top 5

गोटा झालेला टायर ताबडतोब काढून टाकणेच गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 18:00 IST

कोणत्याही वाहनाला गोटा झालेला टायर वापरणे हे अतिशय धोकादायक असून ते टायर्स ताबडतोब काढून चांगले नवीन टायर लावणे आवश्यक असते. कारण तसे टायर वापरणे पूर्णपणे असुरक्षित आहे.

ठळक मुद्देसाधारणपणे प्रत्येक टायरला एक आयुष्य असते, विशिष्ट किलोमीटर रनिंग झाले की तो बदलावा लागतोवैयक्तिक कार वापरणारे मात्र त्या मानाने टायर गोटा होण्यापूर्वीच बदलतातटॅक्सी, टुरिस्टच्या गाड्या, टॅकर व रिक्षाचालक बेफिकिर व नको तेथे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करून प्राण धोक्यात घालत असतात

टायरच्या बाबतीत अनेकजण बेफिकिर असतात. वैयक्तिक वापरासाठी कार घेतलेले अनभिज्ञ असल्याने त्यांना फार माहिती नसल्याने अनेकदा टायरचे आयुष्य संपल्यानंतरही तो वापरत असतात तर बराच प्रवास केल्यानंतर टायर गोटा होण्यापूर्वीच ते टायर बदलतातही. मात्र दुचाकी वापरणारे बरेचजण टायर बदलण्याच्या भानगडीतच पडत नाहीत, फार वापर नाही,चलता है, फार लांब जात नाही, जवळपास जाण्यासाठीच वापरतो, असे सांगत टायर बदलून नवीन टायर बसवावा, असे अनेक स्कूटर मालकांना वाटत नाही. किमान पाच वर्ष तरी मी टायर बदलत नाही, असे सांगणारेही काही महाभाग भेटले. कारच्या बाबतीत पाहिले तर टॅक्सी,टुरिस्टसाठी वैयक्तिक नोंदणीच्या एसयूव्ही वापरणारे, रिक्षावाले, मालवाहतूक करणारे,पाण्याचे टॅकर्स यांच्या अनेकांच्या टायर्सची स्थिती फार बिकट असते, तरीही ते भारतीय स्थितीत गाड्या चालवतात. त्यांना पैसे वाचवणे हे महत्त्वाचे वाटते.

साधारणपणे प्रत्येक टायरला एक आयुष्य असते, विशिष्ट किलोमीटर रनिंग झाले की तो बदलावा लागतो. वैयक्तिक कार वापरणारे मात्र त्या मानाने टायर गोटा होण्यापूर्वीच बदलतात. मात्र टॅक्सी, टुरिस्टच्या गाड्या, टॅकर व रिक्षाचालक बेफिकिर व नको तेथे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करून प्राण धोक्यात घालत असतात.

टायरवरील नक्षीकाम व त्याची खोली चांगली असली पाहिजे पण ते नक्षीकामही दिसेनासे झाल्यानंतर टायर वापरणे हे धोकादायक आहे. सुरक्षित नाही. त्यामुळे वाहन स्कीट होऊन उलटणे, रस्त्यावर ग्रीप वा पकड नसणे, ब्रेक नीट न लागणे, टायर अनेकदा पंक्चर होणे, तो जास्त गर होऊन ब्लास्टही होणे असे प्रकार होत असतात. असे टायर रिमोल्ड करण्याच्याही पात्रतेचे नसतात. यासाठीच गोटा झालेले हे टायर पूर्णपणे निकाली काढणेच गरजेचे आहे. खरे म्हणजे अशा वाहनांची तपासणी होऊन त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची गरज आहे.प्रामुख्याने ग्रामीण भागात सर्रास हे टायर वापरले जातात. डंपर, कचर्याच्या गाड्या या अशाच टायरवर चालवायच्या असतात, त्याने खर्च वाचतो, अशी धारणाच अशा वाहनांच्या मालकांनी करून घेतलेली असते. भारतात अजून तरी या प्रकारावर आवश्यक तितके निर्बंध नाहीत, ते घातले जाणे गरजेचे आहे. किमान त्यामुळे दुसऱ्याच्या प्राण व वित्तहानीचे तरी नुकसान होणार नाही.

 

टॅग्स :carकारAutomobileवाहन