शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

गोटा झालेला टायर ताबडतोब काढून टाकणेच गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 18:00 IST

कोणत्याही वाहनाला गोटा झालेला टायर वापरणे हे अतिशय धोकादायक असून ते टायर्स ताबडतोब काढून चांगले नवीन टायर लावणे आवश्यक असते. कारण तसे टायर वापरणे पूर्णपणे असुरक्षित आहे.

ठळक मुद्देसाधारणपणे प्रत्येक टायरला एक आयुष्य असते, विशिष्ट किलोमीटर रनिंग झाले की तो बदलावा लागतोवैयक्तिक कार वापरणारे मात्र त्या मानाने टायर गोटा होण्यापूर्वीच बदलतातटॅक्सी, टुरिस्टच्या गाड्या, टॅकर व रिक्षाचालक बेफिकिर व नको तेथे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करून प्राण धोक्यात घालत असतात

टायरच्या बाबतीत अनेकजण बेफिकिर असतात. वैयक्तिक वापरासाठी कार घेतलेले अनभिज्ञ असल्याने त्यांना फार माहिती नसल्याने अनेकदा टायरचे आयुष्य संपल्यानंतरही तो वापरत असतात तर बराच प्रवास केल्यानंतर टायर गोटा होण्यापूर्वीच ते टायर बदलतातही. मात्र दुचाकी वापरणारे बरेचजण टायर बदलण्याच्या भानगडीतच पडत नाहीत, फार वापर नाही,चलता है, फार लांब जात नाही, जवळपास जाण्यासाठीच वापरतो, असे सांगत टायर बदलून नवीन टायर बसवावा, असे अनेक स्कूटर मालकांना वाटत नाही. किमान पाच वर्ष तरी मी टायर बदलत नाही, असे सांगणारेही काही महाभाग भेटले. कारच्या बाबतीत पाहिले तर टॅक्सी,टुरिस्टसाठी वैयक्तिक नोंदणीच्या एसयूव्ही वापरणारे, रिक्षावाले, मालवाहतूक करणारे,पाण्याचे टॅकर्स यांच्या अनेकांच्या टायर्सची स्थिती फार बिकट असते, तरीही ते भारतीय स्थितीत गाड्या चालवतात. त्यांना पैसे वाचवणे हे महत्त्वाचे वाटते.

साधारणपणे प्रत्येक टायरला एक आयुष्य असते, विशिष्ट किलोमीटर रनिंग झाले की तो बदलावा लागतो. वैयक्तिक कार वापरणारे मात्र त्या मानाने टायर गोटा होण्यापूर्वीच बदलतात. मात्र टॅक्सी, टुरिस्टच्या गाड्या, टॅकर व रिक्षाचालक बेफिकिर व नको तेथे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करून प्राण धोक्यात घालत असतात.

टायरवरील नक्षीकाम व त्याची खोली चांगली असली पाहिजे पण ते नक्षीकामही दिसेनासे झाल्यानंतर टायर वापरणे हे धोकादायक आहे. सुरक्षित नाही. त्यामुळे वाहन स्कीट होऊन उलटणे, रस्त्यावर ग्रीप वा पकड नसणे, ब्रेक नीट न लागणे, टायर अनेकदा पंक्चर होणे, तो जास्त गर होऊन ब्लास्टही होणे असे प्रकार होत असतात. असे टायर रिमोल्ड करण्याच्याही पात्रतेचे नसतात. यासाठीच गोटा झालेले हे टायर पूर्णपणे निकाली काढणेच गरजेचे आहे. खरे म्हणजे अशा वाहनांची तपासणी होऊन त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची गरज आहे.प्रामुख्याने ग्रामीण भागात सर्रास हे टायर वापरले जातात. डंपर, कचर्याच्या गाड्या या अशाच टायरवर चालवायच्या असतात, त्याने खर्च वाचतो, अशी धारणाच अशा वाहनांच्या मालकांनी करून घेतलेली असते. भारतात अजून तरी या प्रकारावर आवश्यक तितके निर्बंध नाहीत, ते घातले जाणे गरजेचे आहे. किमान त्यामुळे दुसऱ्याच्या प्राण व वित्तहानीचे तरी नुकसान होणार नाही.

 

टॅग्स :carकारAutomobileवाहन