शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

गोटा झालेला टायर ताबडतोब काढून टाकणेच गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 18:00 IST

कोणत्याही वाहनाला गोटा झालेला टायर वापरणे हे अतिशय धोकादायक असून ते टायर्स ताबडतोब काढून चांगले नवीन टायर लावणे आवश्यक असते. कारण तसे टायर वापरणे पूर्णपणे असुरक्षित आहे.

ठळक मुद्देसाधारणपणे प्रत्येक टायरला एक आयुष्य असते, विशिष्ट किलोमीटर रनिंग झाले की तो बदलावा लागतोवैयक्तिक कार वापरणारे मात्र त्या मानाने टायर गोटा होण्यापूर्वीच बदलतातटॅक्सी, टुरिस्टच्या गाड्या, टॅकर व रिक्षाचालक बेफिकिर व नको तेथे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करून प्राण धोक्यात घालत असतात

टायरच्या बाबतीत अनेकजण बेफिकिर असतात. वैयक्तिक वापरासाठी कार घेतलेले अनभिज्ञ असल्याने त्यांना फार माहिती नसल्याने अनेकदा टायरचे आयुष्य संपल्यानंतरही तो वापरत असतात तर बराच प्रवास केल्यानंतर टायर गोटा होण्यापूर्वीच ते टायर बदलतातही. मात्र दुचाकी वापरणारे बरेचजण टायर बदलण्याच्या भानगडीतच पडत नाहीत, फार वापर नाही,चलता है, फार लांब जात नाही, जवळपास जाण्यासाठीच वापरतो, असे सांगत टायर बदलून नवीन टायर बसवावा, असे अनेक स्कूटर मालकांना वाटत नाही. किमान पाच वर्ष तरी मी टायर बदलत नाही, असे सांगणारेही काही महाभाग भेटले. कारच्या बाबतीत पाहिले तर टॅक्सी,टुरिस्टसाठी वैयक्तिक नोंदणीच्या एसयूव्ही वापरणारे, रिक्षावाले, मालवाहतूक करणारे,पाण्याचे टॅकर्स यांच्या अनेकांच्या टायर्सची स्थिती फार बिकट असते, तरीही ते भारतीय स्थितीत गाड्या चालवतात. त्यांना पैसे वाचवणे हे महत्त्वाचे वाटते.

साधारणपणे प्रत्येक टायरला एक आयुष्य असते, विशिष्ट किलोमीटर रनिंग झाले की तो बदलावा लागतो. वैयक्तिक कार वापरणारे मात्र त्या मानाने टायर गोटा होण्यापूर्वीच बदलतात. मात्र टॅक्सी, टुरिस्टच्या गाड्या, टॅकर व रिक्षाचालक बेफिकिर व नको तेथे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करून प्राण धोक्यात घालत असतात.

टायरवरील नक्षीकाम व त्याची खोली चांगली असली पाहिजे पण ते नक्षीकामही दिसेनासे झाल्यानंतर टायर वापरणे हे धोकादायक आहे. सुरक्षित नाही. त्यामुळे वाहन स्कीट होऊन उलटणे, रस्त्यावर ग्रीप वा पकड नसणे, ब्रेक नीट न लागणे, टायर अनेकदा पंक्चर होणे, तो जास्त गर होऊन ब्लास्टही होणे असे प्रकार होत असतात. असे टायर रिमोल्ड करण्याच्याही पात्रतेचे नसतात. यासाठीच गोटा झालेले हे टायर पूर्णपणे निकाली काढणेच गरजेचे आहे. खरे म्हणजे अशा वाहनांची तपासणी होऊन त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची गरज आहे.प्रामुख्याने ग्रामीण भागात सर्रास हे टायर वापरले जातात. डंपर, कचर्याच्या गाड्या या अशाच टायरवर चालवायच्या असतात, त्याने खर्च वाचतो, अशी धारणाच अशा वाहनांच्या मालकांनी करून घेतलेली असते. भारतात अजून तरी या प्रकारावर आवश्यक तितके निर्बंध नाहीत, ते घातले जाणे गरजेचे आहे. किमान त्यामुळे दुसऱ्याच्या प्राण व वित्तहानीचे तरी नुकसान होणार नाही.

 

टॅग्स :carकारAutomobileवाहन