शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

Motor Vehicle Act: वाढलेल्या दंडाला-शिक्षेला विरोध आहे?; मग हे आकडे पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 12:41 IST

भारतात वाहन कायद्याचा वापर याआधी वसुलीसाठीच करण्यात येत होता. बऱ्याचदा वाहतुकीचे नियमन करण्यापेक्षा वळणावर, आडोशाला चौकाच्या पुढे थांबून वाहन चालकांना त्रास दिला जात होता.

नवी दिल्ली : मोटार वाहन कायदा लागू होताच दीड, दोन लाखांच्या पावत्या फाटू लागल्या आहेत. यामुळे वाहनचालकांची पुरती भंबेरी उडाली आहे. अव्वाच्या सव्वा दंड आकारल्याने नाराजी व्यक्त होत असतानाच जर परिणामांचा विचार केल्यास ही दंडाची रक्कम काहीच नसल्याचे दिसून येईल. सरकारचे उद्दीष्ट लोकांचे प्राण वाचविण्याचे असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यानी आधीच स्पष्ट केले आहे. 

भारतात वाहन कायद्याचा वापर याआधी वसुलीसाठीच करण्यात येत होता. बऱ्याचदा वाहतुकीचे नियमन करण्यापेक्षा वळणावर, आडोशाला चौकाच्या पुढे थांबून वाहन चालकांना त्रास दिला जात होता. यामुळे दंड कमी असूनही काही चिरिमिरी दिली की सुटता येत होते. यामुळे लोकांमध्ये कायद्याची धास्ती राहिलेली नव्हती. भारतात 2017 मध्ये 70 टक्के अपघात हे अती वेगामुळे झालेले आहेत. तर याच वर्षी 8 हजार लोकांचा मृत्यू हा केवळ चालक मद्यधुंद किंवा मोबाईलवर बोलत असताना झाला आहे. 

आता नव्या नियमांमुळे नियमांचे उल्लंघन केल्यास दंड दहा पटींनी वाढला आहे. वेग आणि मोबाईलचा वापरावर दंड आकारणे हे राज्याच्या अखत्यारित येते. काही राज्यांनी हा दंड कमीही केला आहे. यामुळे यावर चर्चा झडू लागल्या आहेत. दुसरीकडे लोकांमध्ये भीती दिसत असून केवळ दंड झालेल्यांकडूनच विरोध होताना दिसत आहे. अन्य वाहनचालकांनी पीयूसी, हेल्मेट, इन्शुरन्साठी धाव घेतली आहे. देशातील अपघाती मृत्यूंचे आकडे पाहता हजारोंचा दंड कमी वाटू लागत आहे. रस्ते अपघातात जवळच्यांना गमावलेल्या परिवारांकडून या निर्णयाचे स्वागत होऊ लागले आहे. 

दंडातून वसूल केलेली रक्कम ही वाहन चालकांना शिस्त लावण्यासोबत रस्ते अपघातात पिडीतांसाठी वापरण्यात येणार आहे. गेल्या वर्षी सरकारने दुचाकी वाहनांना पाच वर्षांचा इन्शुरन्स खरेदी करण्याचे बंधन घातले होते. राष्ट्रीय महामार्गांवर दर 100 किमीवर एक ट्रॉमा सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर अपघातांच्या मुळावर घाव घालताना चालकांनाच शिस्त लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

काहीशे मधला दंड हजारांमध्ये लागल्याने त्याची भीतीही वाढली आहे. इन्सुरन्स, पीयुसी, वाहनांचे इंडिकेटर आदी नीट करण्यासाठी वाहनचालक सरसावले आहेत. हेल्मेट घेण्यासाठीही दुकानांवर गर्दी वाढली आहे. तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करू लागले आहेत. भारतात अपघातांचे प्रमाण मोठे आहे. वर्षाला जवळपास 5 लाखांच्या आसपास अपघात होतात. यामुळे जागतिक स्तरावरही नाचक्की होते. जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू आणि तीन लाख लोक अपंग होत आहेत. ही संख्या पाहता वाहतुकीच्या नियमांचा दंडांची रक्कम खूपच कमी आहे.  

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNitin Gadkariनितीन गडकरीtraffic policeवाहतूक पोलीसAccidentअपघात