शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

मारुतीने 'फाईव्ह स्टार' कार बनवून दाखवाव्यात; टाटा अल्ट्रॉझच्या लाँचिंगवेळी ओपन चॅलेंज

By हेमंत बावकर | Updated: January 25, 2020 08:54 IST

भारतात सुरक्षेपेक्षा कार किती देते याकडे पाहिले जाते. यामुळे कंपन्यांनी सुरक्षा न पाहता हलक्या वजनाच्या कार बाजारात आणायला सुरूवात केली.

ठळक मुद्दे केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून नवीन सुरक्षा नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रवाशांची सुरक्षा महत्वाची मानण्यात आली आहे.

- हेमंत बावकरमुंबई : केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून नवीन सुरक्षा नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रवाशांची सुरक्षा महत्वाची मानण्यात आली आहे. टाटा मोटर्सने यावर दोन कार फाईव्ह स्टार ग्लोबल एनकॅप सुरक्षा रेटिंग मिळालेल्या बाजारात आणण्याच मान मिळविला आहे. मात्र, मारुती सुझुकीला हे काही जमलेले नाही. टाटाने नुकत्याच लाँच केलेल्या अल्ट्रॉझलाही फाईव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे. यावरून मारुतीला मोठे चॅलेंज देण्यात आले आहे. 

भारतात सुरक्षेपेक्षा कार किती देते याकडे पाहिले जाते. यामुळे कंपन्यांनी सुरक्षा न पाहता हलक्या वजनाच्या कार बाजारात आणायला सुरूवात केली. यासाठी पातळ पत्रा, बॉडी कमी क्षमतेची, कमी गुणवत्तेचे फायबर अशा अनेक क्लुप्त्या वापरण्यात आल्या. यामुळे याचा थेट परिणाम प्रवाशांच्या सुरक्षेवर झाला आहे. एखादी कार समोरून येणाऱ्या वाहनाचाही आघात सहन करू शकत नाही. यामुळे काही अपघातांना कारमध्ये बसलेले अख्खेच्या अख्खे कुटुंबच ठार झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. 

यामुळे सरकारने रस्ते अपघात आणि मृत्यू कमी करण्यासाठी दुचाकी आणि कार कंपन्यांना नियमावली लागू केली आहे. एबीएस, पॅसेंजर एअरबॅग, रिअर कॅमेरा अशा सुरक्षेच्या काही अटी घालण्यात आल्या आहेत. मात्र, ग्लोबल एनकॅप ही संस्था जागतिक स्तरावर वाहनांची सुरक्षा तपासते. यासाठी वेगवेगळ्या प्रकारे या वाहनांचे अपघात घडविले जातात. यामध्ये सेन्सर बसविलेले असतात. मानसांच्या जागी पुतळे असतात. त्यांच्यावर काय परिणाम होतो हे पाहिले जाते. यासाठी ठराविक वेगही असतो. यामध्ये टाटा अव्वल ठरली आहे. मात्र, देशातील आघाडीची कंपनी मारुती यामध्ये सपशेल अपयशी ठरली आहे. काही दिवसांपूर्वी महिंद्राची एक्सयुव्ही 300 हीनेही फाईव्ह स्टार रेटिंग मिळविले आहेत. 

रश लेन या ऑटो पोर्टलने दिलेल्या महितीनुसार मारुतीची एकच कार सर्वाधिक सुरक्षा देणाऱ्या कारच्या यादीमध्ये आहे. ती म्हणजे ब्रिझा. ब्रिझाला फोर स्टार रेटिंग आहे. तर टाटाच्या पाच, महिंद्राच्या दोन, फोक्सवॅगन 1 आणि टोयोटा 1 अशा कार आहेत. सर्वाधिक सुरक्षित असल्याचा दावा करणारी फोर्डही यामध्ये दिसत नाही. 

टाटा अल्ट्रॉझला लाँचिंगवेळी 5 स्टार रेटिंगचे सर्टिफिकीट देण्यात आले. यावेळी ग्लोबल एनकॅपचे कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष डिव्हिड वार्ड यांनी थेट मारुतीच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच या कंपन्यांनी टाटा आणि महिंद्राचा आदर्श घ्यावा आणि सुरक्षित कार बनवाव्यात असा सल्ला दिला. तसेच मारुतीसाठी हे चॅलेंज असेल, असेही ते म्हणाले. एकीकडे मारुतीला फटकारताना त्यांनी फोक्सवॅगन आणि टोयोटालाही कानपिचक्या दिल्या. या जागतिक दर्जाच्या कार कंपन्यांकडे फाईव्ह स्टार सुरक्षेच्या कार भारतीय बाजारात नसाव्यात याबद्दल खेद व्यक्त केला. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीTataटाटाMahindraमहिंद्राMarutiमारुतीroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातFordफोर्ड