शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

टायरमध्ये योग्य हवा हा मोटारीच्या सुरक्षिततेचा महत्त्वाचा घटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 10:05 PM

टायरमध्ये हवा कमीही नको व जास्तही नको. टायरमधील योग्य हवा हाच त्यावरचा उपाय आहे व तो कायम अंमलात आणला गेला पाहिजे.

मुंबई - मोटारीचा एकमेव भाग जो रस्त्याला स्पर्श करतो तो म्हणजे टायर. या टायरशिवाय मोटार कुचकामीच म्हणावी लागेल, हे टायरचे महत्त्व लक्षात घेतले तर टायरची निगा, दक्षता व सर्वात महत्त्वाची म्हणजे टायरमधील हवा अचूक वा योग्य असणे गरजेचे किती आहे, ते लक्षात यावे. साधारण कारचे वजन १००० किलोपेक्षा जास्त असते व त्यात प्रवासी, त्यांचे सामान यांचे वजन वेगळेच. बस, ट्रक आदी अवजड वाहनांचे वजनही प्रचंड असते. या सर्व घटकांचा भार पेलणे हे सोपे काम नाही. असा हा भारवाही टायर व त्या टायरचा खरा प्राण म्हणजे त्यातील हवा. ही योग्य नसली म्हणजे कितीतरी दुष्परिणाम होतात, अपघातही होऊ शकतो, मायलेज कमी होऊ शकते, मध्येच प्रवासांत खंडही पडू शकतो. यासाठीच डायरमध्ये योग्य हवा व हवेचा दाब असणे हे अतिशय गरजेचे आहे.

प्रत्येक कार, ट्रक वा बस यांचे त्यांच्या कंपन्यांनी भारमान लक्षात घेऊन टायरमध्ये हवा कशी व किती भराल ते माहिती पुस्तकात दिलेले असते. त्याचा तक्ता कारच्या पुढील दरवाजानजीक स्टिकरद्वारे लावलेला असतो. असे असूनही अनेकजण आपल्याला पाहिजे तशी हवा भरीत असतात. कारमध्ये हवा भरताना सकाळच्या वेळी विशेष करून प्रवासाला निघण्यापूर्वी थोडी कमी हवा भरा कारण नंतर ती हवा गरम होऊन प्रसरण पावते व त्यामुळे टायरमध्ये हवेचा दाब जास्त निर्माण होऊ शकतो. त्यातून होणारा त्रास वचवा. यासाठी हवा योग्य त्या प्रमाणात भरा. जास्त किंवा कमी भरू नका. लांबच्या प्रवासात कडक उन्हामधून जात असावल तर दोन-तीन तासांनी हवा तपासा. त्यासाठी विविध प्रकारचे गेज (हवामापक) बाजारात मिळतात. ते नेहमी जवळ ठेवा.य अनेकदा पंपावर असलेल्या गेजमध्ये फरक असू शकतो, दोषही असू शकतो. त्यामुळे शक्यतो स्वतःकडे एक हवामापक नक्की ठेवा.

ठळक मुद्देहवा कमी भरली तरी फरक पडतो व जास्त भरली तरी फरक पडतो.

- हवा कमी भरल्यास...ओल्या रस्त्यावर ब्रेक प्रत्यक्षात अंमल करण्यास काहीसा जास्त वेळ घेतो.कमी रस्ता सोडून कार सरकू शकते.ओव्हरस्टीअरिंग वा अंडरस्टिअरींग म्हणजे नियंत्रणावर फरक पडतो.सस्पेंशनच्या काही भागांवर ताण पडतो.कारची हालचाल करताना त्रास पार्किंग करताना कठीण जाते.टायरचे आयुष्य कमी होते.

- हवा जास्त भरल्यासग्रीप कमी होते. कारण हवा जास्त असेल तर जमिनीला त्याच्या कमी भागाचा स्पर्श होतो.गाडी टणाणण उडल्यासारखी चालतेड्रायव्हिंग कम्पर्ट कमी होतो.टायरचा आवाज जास्त येतोटायरच्या मध्यभागावर दाब जास्त येतो.खड्डे व खडकाळ रस्त्यावरून जाताना टायरचे नुकसान अधिक होऊ शकते.यामुळेच टायरमधील हवेची काळजी करायला हवी. मग तुम्ही नाय-ट्रोजन भरा किंवा सर्वसाधारण हवा भरा

- योग्य हवा भरण्यासाठी काय कराल?कारच्या माहिहतीपुस्तकामधील सूचना अंलात आणातुमच्या भागातील हवा उष्ण असल्यास टायरची हवाही वाढते, त्यामुळे हवा तपासादर दोन आठवड्याने सर्व टायरमधील हवा तपासा व योग्य हवा ठेवा.लांबच्या प्रवासाला निघताना सुरुवातीला कोल्ड प्रेशर ठेवा, नंतर हवा पुन्हा तपासून भरा वा कमी करा.थंडी, पावसाळा यामध्येही दुर्लक्ष करू नकाउन्हाळ्यात हवेचा दाब वाढून टायर फुटू शकतो, तेव्हा योग्य हवा कायम आहे की नाही ते पाहा.टायरची स्थितीही कशी आहे त्याचा अंदाज घ्या 

टॅग्स :Automobileवाहनcarकार