शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

GST E Way Bill: ट्रक, टेम्पो चालक-मालकांनो! दिवसाला 200 किमींचे अंतर कापावेच लागणार, नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 13:35 IST

GST E Way Bill: ई वे बिल प्रणालीमध्ये केलेला बदल हा 1 जानेवारीपासून लागू झाला आहे. त्यापूर्वी ई वे बिल १०० किलोमीटर प्रतिदिन याप्रमाणे तयार केले जात होते.

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मधील ई वे बिल प्रणालीमध्ये (GST E Way Bill system) मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये आधीचे 100 किमीचे अंतर आता दुपटीने वाढविण्यात आल्याने वाहन चालकांना त्रासदायक ठरणार आहे. कारण त्यापेक्षा जास्त वेळ लागल्यास जुने ई वे बिलाची व्हॅलिडिटी संपणार आहे. यामुळे एकदा का वाहन निघाले आणि 24 तासांत 200 किमीचे अंतर कापले नाही तर मोठा दंड भरावा लागणार आहे. (The validity of e-way bill under Rule 138(10) of the CGST Rules has been amended, according to which the e-way bill will now be valid for 1 day for every 200 km of travel.)

ई वे बिल प्रणालीमध्ये केलेला बदल हा 1 जानेवारीपासून लागू झाला आहे. त्यापूर्वी ई वे बिल १०० किलोमीटर प्रतिदिन याप्रमाणे तयार केले जात होते. त्यानुसार प्रत्येक १०० किलोमीटरला एक दिवस वाढत जात असे, मात्र नव्या नियमात बदलानुसार १०० ऐवजी २०० किलोमीटर प्रतिदिन असे अंतर देण्यात आले आहे. एक हजार किलोमीटरकरिता या नियमानुसार पाच दिवस मिळत असून, त्याचा कालावधी संपला तर ऑनलाइन त्याचा कालावधी वाढवण्यात येत आहे. विशेष म्हणजे या तरतुदीमुळे गैरप्रकारांना आळा बसणार असला तरी यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मात्र अडचणीत आला आहे. 

मालवाहतूक ट्रक किंवा टेम्पोमध्ये एकाच मालकाचा माल असल्यास हे शक्य होणार आहे. मात्र, अनेक दुकानदारांचा माल एकाच टेम्पोत असल्यास तो त्यांच्यापर्यंत पोहोच करणे व तेथून निघणे यासाठी खूप वेळ लागतो. वाहतूक कोंडी, बाजारपेठेत दिवसाची नो एन्ट्री, रात्रीची डिलिव्हरी केली तर दुकान बंद असणे, मालकाला बोलवून आणण्यास वेळ लागणे आदी गोष्टींमुळे 24 तासांत 200 किमीची अट खूपच अडचणीची आहे. याचा फटका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांसह उद्योजकांनाही बसत आहे. तसेच रस्ते खराब असल्याने, वाहतूक कोंडीमुळे 24 तासांत 200 किमीचे अंतर कापणेही अशक्यप्राय आहे. अशात चालकांनी घाई केल्यास अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे ही वेगळीच. 

ई वे बिल कसे काम करते...जीएसटी कायद्यात मालवाहतूकदारांसाठी ‘ई-वे बिल’ ही संकल्पना आहे. त्याअंतर्गत एखाद्या ठिकाणाहून सामान घेऊन माल ट्रक किंवा टेम्पो निघाला की, ते वाहन कुठल्या प्रकारचे, किती सामान, कुठे घेऊन जाणार, याची ऑनलाइन नोंद करावी लागते. त्याआधारे जीएसटी विभागाकडून ‘ई-वे बिल’ दिले जाते. हे बिल घेऊन वाहन चालकाला प्रवास करावा लागतो. हे वाहन जीएसटी विभागाच्या गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी रस्त्यात कोठेही अडवू शकतात. त्यावेळी ई-वे बिल दाखवणे अनिवार्य असते. २४ तासांत वाहन तिकडे पोहोचले नाही तर ई-वे बिल रद्द होते. मग पुन्हा कर परतावाही गेला व दुप्पट दंडाचा ससेमिरा मागे लागतो.

टॅग्स :GSTजीएसटीroad transportरस्ते वाहतूक