शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
2
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
3
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
4
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
5
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
6
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
7
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
8
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
9
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
10
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
11
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
12
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
13
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
14
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
15
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
16
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
17
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
18
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
19
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
20
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
Daily Top 2Weekly Top 5

"रॅगिंग झाले, शाळेत अवहेलना नशिबी आली", रतन टाटांनी सांगितले ते का शांत राहिले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 15:45 IST

Ratan Tata Birthday: घर फुटले की त्याचा सर्वात जास्त त्रास मुलांना होतो. तसाच प्रकार टाटांच्याबाबतीत घडला. मात्र, टाटांना त्यांच्या आजीने दोन शब्दांचा कानमंत्र दिला होता, यामुळे आजही टाटा एवढे शांत वागतात. या कानमंत्राने टाटा यांचे आयुष्यच बदलून गेले. 

रतन टाटा आज देशाच्या सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. त्यांना टाटा हे नाव जरूर मिळाले परंतू तिथपर्यंत पोहोचण्यासाठी टाटांना खूप त्रास सहन करावा लागला. लहानपणीच कौटुंबिक समस्यांनी टाटांना ग्रासले होते. तेव्हा त्यांची आजी त्यांचा आधार बनली होती. 1948 मध्ये टाटा 10 वर्षांचे असतानाचा त्यांचे आईवडील वेगळे झाले. रतनजी यांची विधवा आजी नवजीबाई यांनी त्यांना दत्तक घेतले. आजीनेच रतन टाटा आणि त्यांच्या भावाला लहानाचे मोठे केले. कारण टाटा यांच्या आईने दुसरे लग्न केले होते. याचा त्रास टाटांना त्यांच्या शालेय जिवनातही भोगावा लागला.

 घर फुटले की त्याचा सर्वात जास्त त्रास मुलांना होतो. तसाच प्रकार टाटांच्याबाबतीत घडला. मात्र, टाटांना त्यांच्या आजीने दोन शब्दांचा कानमंत्र दिला होता, यामुळे आजही टाटा एवढे शांत वागतात. या कानमंत्राने टाटा यांचे आयुष्यच बदलून गेले. 

'ह्यूमंस ऑफ बॉम्‍बे' शी बोलसताना टाटा यांनीच याबाबत सांगितले आहे. ''तसे तर माझे लहानपण खुशीत गेले. मात्र, जसजसे मी आणि माझा भाऊ मोठे होत गेलो आम्हाला रॅगिंग आणि वैयक्तीक संकटांचा सामना करावा लागला होता. आमच्या आईवडिलांनी घटस्फोट घेतला. ही गोष्ट आजच्यासारखी तेव्हा सामान्य नव्हती. मात्र, आम्हाला आमच्या आजीने सांभाळले. जेव्हा माझ्या आईचे दुसरे लग्न झाले तेव्हा शाळेतील मुलांनी आमच्याबाबत बरेच उलट सुलट बोलायला सुरुवात केली होती. मात्र, आजीने आम्हाला यावर कोणतीही किंमत मोजून मर्यादा ठेव असा सल्ला दिला होता. ती गोष्ट आजही माझ्यासोबत आहे, असे टाटा यांनी सांगितले. 

आयुष्यभर आजीची शिकवण कामी आली...टाटांनी पुढे सांगितले, आजीच्या या गोष्टीवरून आम्ही अशा टोमण्यांकडे दुर्लक्ष केले ज्यावरून आम्ही कदाचित हाणामाऱ्या केल्या असत्या. मला आजही आठवतेय दुसऱ्या विश्वयुद्धानंतर आजी मला आणि माझ्या भावाला घेऊन उन्ह्याळाच्या सुटीत लंडनला घेऊन गेली होती. तिथेही मी जिवनमुल्य शिकलो. आजी सांगायची 'असे बोलू नका', 'या गोष्टीवर शांत रहा' आणि तेव्हापासूनच आमच्या मनात सर्वात वर मर्यादा ही गोष्ट घर करून गेली. ती आजही तशीच आहे. 

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाTataटाटा