सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरात उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशनेदिल्ली आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांनाही मागे टाकले आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरात दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
सध्या उत्तर प्रदेशात ४.१४ लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहने धावत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने २०२२ मध्ये एक नवीन ईव्ही धोरण राबवले, ज्याचा उद्देश इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे, चार्जिंग सुविधा वाढवणे आणि उत्तर प्रदेशला ईव्ही हब बनवणे हा होता. सरकार त्यात यशस्वी होताना दिसत आहे. दिल्लीत १.८३ लाख इलेक्ट्रिक वाहने आहेत आणि महाराष्ट्रात १.७९ लाख इलेक्ट्रिक वाहनांची नोंद करण्यात आली.
उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये ई-रिक्षा खूप लोकप्रिय आहेत आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यात त्या मोठी भूमिका बजावत आहेत. अयोध्या, काशी, मथुरा, प्रयागराज, गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, कानपूर आणि लखनऊ सारख्या मोठ्या शहरांमध्ये ई-रिक्षा खूप लोकप्रिय आहेत. उत्तर प्रदेशातील इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीत ई-रिक्षांचा वाटा ८५ टक्के आहे.