शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

एअर फिल्टर वेळच्यावेळीच बदलणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 10:27 IST

कारमधील एअर फिल्टर छोटा घटक असला तरी अतिशय गरजेचा व महत्त्वाचा घटक आहे. तो वेळीच तपासणे व योग्यवेळी बदलणे महत्त्वाचे असते. अन्यथा त्यामुळे भवितव्यात नको त्या दुरुस्तीची कटकटही मागे लागू शकते.

ठळक मुद्देकारच्या इंजिनामध्ये हवा जाते तेव्हा त्याबरोबर धुळीचे कण व अन्य सूक्ष्म कचराही जात असतो. तो रोखण्यासाठी एअर फिल्टर हे महत्त्वाचे पण अत्यावश्यक साधन लावले जाते.एअर फिल्टर ही काही कायम राहाणारी वस्तू नाही, ती कालानुसार, तसेच तुम्ही ज्या भागात वाहन चालवीत असता, तेथील वातावरणानुसार धुळीचे वा मातीचे प्रमाण लक्षात घेऊन बदलावी लागणारी ही सामग्री आहे

कारच्या इंजिनामध्ये हवा जाते तेव्हा त्याबरोबर धुळीचे कण व अन्य सूक्ष्म कचराही जात असतो. तो रोखण्यासाठी एअर फिल्टर हे महत्त्वाचे पण अत्यावश्यक साधन लावले जाते. कापड, कागद किंवा गॉझ याचा वापर या फिल्टरसाठी केला जातो. एअर फिल्टर हा कचरा इंजिनामध्ये जाण्यापासून रोखतो. अर्थात पूर्णपणे काही हा कचरा एअर फिल्टरमुळे रोखला जातो असेही नाही. मात्र याची कारच्या कार्बोरेटरमधून जाणाºया हवेमध्ये असलेल्या धुळीकणांना रोखण्यासाठी अतिशय गरज असते. इंधनामधून ही हवा इंजिनाप्रत जाण्यासाठी गरजेची असते. त्यामुळे हवा त्यादृष्टीने तेथे खेचली जात असते. अशावेळी हवेमधून विविध प्रकारचे घटक सूक्ष्म व काहीशा जाड स्वरूपातही इंधनात जाू शकतात, ते रोखले जाणे गरजेचे असते. त्यमुळे सुमारे ९९ टक्के धुळीकण या एअर फिल्टरमुळे रोखले जातात.

एअर फिल्टर ही काही कायम राहाणारी वस्तू नाही, ती कालानुसार, तसेच तुम्ही ज्या भागात वाहन चालवीत असता, तेथील वातावरणानुसार धुळीचे वा मातीचे प्रमाण लक्षात घेऊन बदलावी लागणारी ही सामग्री आहे. मात्र किती वारंवार ती बदलावी लागते, ते त्या वातावरणावरही अवलंबून आहे, जेथे तुमचे वाहन वा कार सातत्याने वापरात आहे. रवाहनांच्या देखभालीच्या वेळापत्रकामध्ये कार निर्मात्या कंपन्यांकडूनही एअर फिल्टर बदलण्याबाबत काहीशी मतभिन्नता दिसते. मात्र साधारणपणे ३० ते ४५ हजार किलोमीटर अंतर कापल्यानंतर हे फिल्टर बदलणे गरजेचे आहे. एअर फिल्टिर जसा जसा अधिक कचरा जमा करीत राहील तो जर स्वच्छ केला गेला नाही, किंवा तो एअर फिल्टर बदलला गेला नाही, तर त्यामुळे इंधनामध्ये हवा जाण्याचे प्रमाणही कमी होईल. इंजिनामध्ये ही हवा पोहोचणेही कमी होईस. त्यामुळे तुमच्या वाहनाच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. खराब झालेला एअर फिल्टर जास्त वापरणे त्यामुळेच अयोग्य आहे. अनेकदा एअर फिल्टर कधी बदलावा ते समजत नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी कार गॅरेजला नेल्यानंतरमेकॅनिकला दाखवली की मग आपण त्याला विचारतो की विचारीत नाही, त्यावर तो फिल्टर बदलला जातो किंवा जातही नाही. आपले लक्ष या गोष्टीवर असणेही गरजेचे आहे.ठळक मुद्देसाधारणपणे खराब एअर फिल्टरमुळे काय होते व काय अुभव येतो ते लक्षात घ्यावे.तुमच्या मायलेजवर परिणाम होतोइंजिनाचा आवाज काहीसा वेगळा वाटतोइंजिनसंबंधातील सर्व्हिस लाइट पेटतो व तुम्हाला सूचित करतोहॉर्सपॉवर कमी वाटतेकाहीवेळा मफलरमधून काळा धूर सोडला जातो.पेट्रोलचा वास येतो.कारचा वापर तुम्ही जास्त करीत नसला तर एअर फिल्टरचे आयुष्य साहजिकच जास्त असेल हे लक्षात घ्या. कार जितकी वापराल व ती ज्या वातावरणात वापराल तेथे तेथे कारमध्ये खेचल्या जाणाºया हवेमधून एअर पिळ्टरवर कचरा, धुळीकण जमा होणारच आहेत. ते किती प्रमाणात जमा होतात, त्याबाबत खराब धुलूग्रस्त हवामान, रस्ते हे घटकही कारणीभूत असतात. त्यामुळे चांगल्या रस्त्यांवर कार चालवली जात असेल. स्वच्छ वातावरणात कार चालवली जात असेल, तर एअर फिल्टरचे आयुष्य साहजिक जास्त असणार आहे. अर्थात एअर फिल्टर ही कायम पुरणारी वस्तू नाही. ती बदलणे व योग्यवेळी बदलणे नेहमी गरजेचे आहे. त्यामुळे एअर फिल्टरकडे साधारण दर तीन ते ५ हजार किलोमीटर झाल्यावर सर्व्हिसिंगच्यावेळी लक्ष ठेवा, मेकॅनिककडेही त्याबाबत विचारणा करा. इंधनामध्ये स्वच्छ आॅक्सिजन मिश्रित होणे गरजेचे आहे व त्याचे काम हा फिल्टर करत असतो. त्यामुळे इंजिनामध्ये होणारे या इंधनाचे ज्वलन सुयोग्य होते. तसेच इंजिनामध्ये या हवेद्वारे काही कचरा जाणे व तो सतत जात राहाणे यामुळे इंजिनाचेही नुकसान कालांतराने होऊ शकते. तेव्हा होणाºया संभाव्य अनावश्यक दुरुस्तीऐवजी एअर फिल्टर, आॅइल फिल्टर, योग्यवेळी तेल बदलणे या बाबींवर प्रत्येक कारचालक व मालकाने लक्ष ठेवले पाहिजे. तुमच्या कारचे आयुष्य व आरोग्य यावर्वलंबून असते, हे लक्षात घेतले पाहिजे. 

टॅग्स :Automobileवाहन