शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

Asian Games 2018: हॉकीत ‘खुशी थोडी, जादा गम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 21:23 IST

पुरूष संघाकडून निराशा, महिला चमकल्या पण सुवर्ण हुकले

जकार्ता

- ललित झांबरे

आशियाडमध्ये हॉकीतभारताची कामगिरी ‘थोडी खुशी, जादा गम’ अशीच राहिली. आनंद एवढाच की महिलाहॉकी संघ तब्बल २० वर्षानंतर अंतिम फेरीत पोहचला आणि आपण रौप्यपदक जिंकले. मात्र, ही एक बाब सोडली तर निराशाच निराशा! 

गतवेळच्या विजेत्या पुरूष संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती, मात्र साखळी फेरीत गोलांची बरसात केल्यावर नेमक्या महत्वाच्या उपांत्य सामन्यात हा संघ ढेपाळला आणि मलेशियाकडून त्यांना पेनल्टी शूटआऊटमध्ये ७-६ असा पराभव पत्करावा लागला. या आशियाडमधील सात सामन्यांतला भारताचा हा एकमेव पराभव, पण त्याने आपल्याला थेट कास्यपदकावर समाधान मानायला भाग पाडले. आशियाडच्या इतिहासात ३ सुवर्ण आणि ९ रौप्यपदकांची कमाई केलेल्या भारतीय संघ १९८६ व २०१० नंतर तिसºयांदा कांस्यपदकावर मर्यादीत राहिला. यामुळे आॅलिम्पिकसाठी थेट पात्रता मिळविण्याचीही संधी आपण गमावली. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २-१ अशी मात देत आपण कांस्यपदक जिंकले हाच काय तो दिलासा!

पुरूषांप्रमाणेच आपल्या महिला संघानेही साखळीत गोलांची बरसात केली, मात्र अंतिम सामन्यातील जपानकडून २-१ अशा पराभवाने त्यांनीसुद्धा ऑलिम्पिकसाठी थेट पात्रतेची संधी गमावली. पण अंतिम सामन्यात महिला संघाने जपानला दिलेली झुंज कौतुकास्पद होती. २५ व्या मिनिटाला १-१ बरोबरी केल्यानंतर पुन्हा ४४ व्या मिनिटाला माघारल्यानंतर चौथ्या आणि अंतिम क्वार्टरमध्ये त्यांनी बरोबरी साधण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण जपानी संघाने चेंडूवरचा ताबा काही सुटू दिला नाही. त्यामुळे राणी रामपालच्या संघाला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.

आपल्या पुरूष संघाची सुरूवात तर भन्नाट झाली. साखळी सामन्यांमध्ये इंडोनेशियाचा १७-०, हाँगकाँगचा विक्रमी २६-०, सुवर्ण विजेता ठरलेल्या जपानचाही ८-० आणि श्रीलंकेचा २०-० असा धुव्वा उडवत त्यांनी सर्वच प्रतिस्पर्ध्याच्या छातेत धडकी भरवली. केवळ कोरियाकडूनच त्यांना साखळीत संघर्ष झाला. पण पाचही साखळी सामने जिंकताना ७६ गोलांच्या बरसातीच्या या कामगिरीवर एका सामन्यातील खराब खेळाने पाणी फेरले. 

उपांत्य सामन्यात उशिराने मलेशियाला गोल करण्याचीसंधी देत त्यांनी पायावर धोंडा पाडून घेतला. कारण या गोलाने लढत २-२ अशी बरोबरीवर आणली आणि शूट आऊटच्या लॉटरीमध्ये ६-७ अशी विजयाने आपली साथ सोडली. गतविजेते सुवर्ण व रौप्यपदकाच्या स्पर्धेतून क्षणात बाद झाले. 

या सामन्यातील भारतीय संघाच्या खेळाने सर्वांनाच निराश केले. साखळी सामन्यांतील सहज धडाकेबाज विजयांनी आलेल्या अतिआत्मविश्वासाने घात केला. या सामन्यात भारताच्या खेळात नियोजनबद्ध डावपेचांचा पूर्णपणे अभाव दिसला. 

मलेशियाने त्यांची शैली असलेल्या जोरदार प्रति आक्रमणाचे तंत्र वापरून या सामन्यातील आपले दोन्ही गोल केले तर भारताने आपले भारतीय शैलीचे तंत्र बदलण्याचे धाडस दाखवले नाही. आपण चेंडू ताब्यात राखण्यात आणि समांतर पासेस देण्यात व्यस्त राहिलो आणि कितीतरी चुका केल्या, त्याची किंमत आपल्याला चुकवावी लागली, असे या पराभवाचे विश्लेषण करण्यात आले आहे. 

 त्यावर हॉकी इंडिया व भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पदाधिकाºयांनी स्पष्ट नाराजी व्यक्त करत प्रशिक्षक  हरेंद्र सिंग व त्यांच्या स्टाफला आता कामगिरी करून दाखविण्याची आगामी विश्वचषक ही शेवटचीे संधी असल्याचा इशारा दिला आहे. त्यात कामगिरी चांगली न झाल्यास प्रशिक्षकासह अनेकांना घरी जावे लागेल असा इशाराच देण्यात आला आहे. याचवेळी पुरूष संघातील खेळाडूंचे खेळापेक्षा सोशल मिडीया व इतर बाबींकडेच अधिक लक्ष असल्याचे आणि संघाला शिस्तीची गरज असल्याचे मत हॉकी इंडियाच्या पदाधिकाºयांनी मांडले आहे. महिला हॉकी संघ, अ‍ॅथलीट, बॅडमिंटनपटू, नेमबाजाप्रमाणे पुरूष हॉक़ी संघाचे लक्ष पूर्णपणे आपल्या ध्येयावर केंद्रीत नव्हते असे निरिक्षण त्यांनी नोंदवले आहे.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाHockeyहॉकीIndiaभारतWomenमहिला