शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

युवकांनी सोशल मीडियापेक्षा आपली कला वृद्धिंगत करावी - सुनील केदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2022 11:26 AM

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव स्पर्धेचे आयोजन येथील ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले, त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

ठळक मुद्देयुवा महोत्सवचे थाटात उद्घाटन

अमरावती : युवा देश म्हणून भारताची जगात ओळख आहे. मानवी संसाधने आपल्या देशात अधिक आहेत. युवकांचा आय.क्यू. जुन्या पिढीपेक्षा अधिक आहे, असे असताना आमचे युवक सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करीत असून, त्यावर मर्यादा घालून आपल्यातील कला वृद्धिंगत कराव्यात, असे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी शुक्रवारी येथे केले.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव स्पर्धेचे आयोजन येथील ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले, त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. भारताचा विकास नवीन पिढीच्या खांद्यावर आहे. तंत्रज्ञानाने भारतात क्रांती केली असून, त्याचा जास्तीत जास्त वापर आपल्या देशात होत आहे. विद्यापीठ स्तरावर टेक्नॉलॉजीचा कसा वापर करायचा, याचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातील, असे केदार म्हणाले.

कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी विद्यापीठातून दरवर्षी एक लाख विद्यार्थ्याांपैकी ४० हजार विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात आणि ६० हजार विद्यार्थ्यांना पदवी मिळत नाही. ६० हजारांचा आकडा कमी होण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टम (सी.बी.सी.एस.) पद्धत महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक डॉ. राजीव बोरकर यांनी केले. यावेळी मागील वर्षी शासकीय विदर्भ ज्ञान व विज्ञान संस्थेने उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल तेथील डॉ. सुधीर मोहोड व डॉ. विनोद गावंडे यांचा यावेळी शाल, श्रीफळ देऊन ना. केदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले, तर आभार डॉ. संजीव ईश्वरकर यांनी मानले.

टॅग्स :Educationशिक्षणSunil Kedarसुनील केदारStudentविद्यार्थी