शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे जिन सवार...त्याला झोपू द्या, ‘विज्ञान’ पदवीधर रितिक ठरला अघोरी विद्येचा बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 13:51 IST

त्याच्यावर जिन सवार आहे. त्यामुळे तो सध्या झोपी गेला, त्याला झोपू द्या. आम्ही पूजा करतो. तो बरा होईल, असे सांगत आर्वी येथील एका तथाकथित मांत्रिकाने अमरावती येथील एका निष्पाप तरुणाचा बळी घेतला.

ठळक मुद्देमांत्रिक बाप-लेकांविरुद्ध खुनाचा गुन्हा : अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचाही बडगा

अमरावती : स्थानिक बेलपुरा येथील विज्ञान पदवीधारक विद्यार्थी बळी ठरल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून, याप्रकरणी आर्वी पोलिसांनी एका मांत्रिकासह त्याच्या दोन मुलांविरुद्ध भादंविचे कलम ३०२, २०१ (पुरावा नष्ट करणे) व महाराष्ट्र बळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मूलन व काळा जादू नियम २०१३ अन्वये गुन्हा दाखल केला.

रितिक गणेश सोनकुसरे (२२, रा. बेलपुरा), असे मृताचे नाव आहे. १८ मे रोजी सकाळी आर्वी येथे आपल्या घरी रितिकचा मृत्यू झाल्याची माहिती मांत्रिक अब्दुल रहीम अ. मजीद याने मृताच्या पित्याला दिली होती. अब्दुल रहीम अ. मजीद व त्याची दोन मुले अ. जुनेद व अ. जमीर (तिघेही रा. विठ्ठल वार्ड, आर्वी, जि. वर्धा) यांनी रितिकवर उपचार करण्याचा बहाणा करून त्याला आर्वी येथे नेले. तेथे त्याचा तांत्रिक विद्येने इलाज करून त्याला जिवानिशी ठार मारले, अशी तक्रार रितिकच्या पित्याने नोंदविली.

१९ मे रोजी रात्री ८.५५ च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापूर्वी १८ मे रोजी रितिकचे पार्थिव अमरावतीत आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विज्ञान पदवीधर असलेल्या व मेडिकलमध्ये काम करणाऱ्या आपल्या मुलाचा आर्वीच्या त्या बाबाने अघोरी विद्येचा प्रयोग करून बळी घेतल्याचा आरोप रितिकच्या पित्याने ‘लोकमत’कडे केला. ‘टीम लोकमत’ने शुक्रवारी बेलपुरा येथील सोनकुसरे यांचे घर गाठून संपूर्ण वास्तव जाणून घेतले.

म्हणे, तुमच्या घरी दोन जीन!

१७ मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास मांत्रिक अ. रहीम हा त्याच्या दोन मुलांसह बेलपुरा येथे आला. घराची तपासणी करून तुमच्या घरी दोन जीन आहेत, घरी सहा खड्डे करून पूजा करून बंदोबस्त करतो, अशी बतावणी करून त्याने दोन हजार रुपये घेतले. काही साहित्यदेखील आणले. मात्र, एक साहित्य नागपूरला मिळते. त्यामुळे आपण ही पूजा शनिवारी करू, असे म्हणत मांत्रिक त्याच्या दोन मुलांसह रितिकलादेखील आर्वीला त्याच्या घरी घेऊन गेला.

माझ्यासोबत काही तरी दुर्घटना होणार

रितिकने१७ मे रोजी रात्री १०.४५ वाजता पित्याला फोन केला. आपल्याला कसेसे वाटत आहे, माझ्यासोबत काही तरी दुर्घटना होणार आहे, असे वाटत असल्याचे तो म्हणाला. १८ मे रोजी सकाळी ७ च्या सुमारास मांत्रिक अ. रहीमने रितिकचा मृत्यू झाला असून, त्याचे शव येथून घेऊन जा, असे फोन काॅलवर सांगितले. त्यावर सोनकुसरे हे पुतण्या व मित्रासमवेत आर्वीला पोहोचले. तेथे रितिक मृतावस्थेत पडला होता, तर त्याच्या गळ्यावर जखमांच्या खुणा दिसून आल्या.

अंगात मुंग्या येते अन् पोटात अग्निदाह

अंगात मुंग्या येते, पोटात जळल्यासारखे वाटते, तसेच अंगात सुया टोचल्यासारखे वाटते, अशी तक्रार रितिकने पित्याकडे चार महिन्यांपूर्वी केली होती. त्याच्यावर पीडीएमसीमध्ये उपचारदेखील करण्यात आला. ती बाब रितिकच्या पित्याने त्यांच्या मानस बहिणीकडे कथन केली. तिने आर्वी येथील अ. रहीम नामक मांत्रिकाचे नाव सांगून फोन नंबरदेखील दिला. तीन महिन्यांपूर्वी रितिकला घेऊन त्याचे वडील अ. रहीमकडे पोहोचले. तेथे त्याने ताबीज, लिंबू व बिबे दिले. उतारादेखील काढला. दिलेले अंडे शहराच्या चौरस्त्यावर फेकण्यास सांगितले.

असे पडले पितळ उघडे

आरोपींनी रितिक याची गळा आवळून हत्या केल्यावर रितिकला त्याच्या वडिलांच्या हवाली करण्यात आले. पण आपले पितळ उघडे पडू नये तसेच रितिक गतप्राण झाला याची कुठलीही शंका मृताच्या वडिलांना येऊ नये म्हणून आरोपींनी रितिकवर जीन सवार आहे. तो सध्या झोपून असून त्याला झोपू द्या. आम्ही पूजा करतो. तो बरा होईल असे सांगितले. मात्र, अमरावतीच्या दिशेने जात असलेल्या रितिकच्या वडिलांना त्याच्या गळ्यावर ओरबडल्याचे दिसल्याने त्यांनी अमरावतीतील इर्विन रुग्णालय गाठले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आल्याने गणेश सोनकुसरे यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAmravatiअमरावतीwardha-acवर्धा