शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
12
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
13
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
14
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
15
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
16
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
17
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
18
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
19
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
20
'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 14:29 IST

ऑगस्टमध्ये शेतकरी आत्महत्यांची शंभरी पार ! : यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांत अस्मानी, सुलतानी संकटाचे सर्वाधिक बळी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पश्चिम विदर्भातशेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबलेले नाही. ऑगस्ट महिन्यात तब्बल १०१ शेतकरी अस्मानी, सुलतानी संकटाचे बळी ठरले आहेत. या ३१ दिवसांत यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ४४, अमरावतीत २३ शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या दोन जिल्ह्यांत होत असल्याचे धगधगते वास्तव आहे.

विभागात सन २००१ पासून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्यांची नोंद घेतली जाते, त्यानुसार आतापर्यंत २१,८५४ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. यामध्ये शासन मदतीसाठी १०,२५० प्रकरणे पात्र ठरली तर त्यापेक्षा जास्त ११,३२३ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. अद्याप २८१ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची विभागीय आयुक्त कार्यालयाची माहिती आहे.

नैसर्गिक आपत्ती, नापिकी, कर्जबाजारी, आजारपण यासह अन्य कारणांनी पश्चिम विदर्भातील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. अशा परिस्थितीत शासन योजनांचा लाभ त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. 'महाडीबीटी'मुळे गरजू शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळत नसल्याचे वास्तव आहे. समुपदेशनासह अन्य प्रकल्पही कुचकामी ठरले आहेत. एकाही शेतमालास हमीभाव नाही, शेतीचा उत्पादन खर्च वाढता असताना निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत असल्याचे चित्र आहे.

१४ जिल्ह्यांत आत्महत्यांचा ग्राफ वाढताच

राज्यात अमरावती विभागातील ५, मराठवाड्यातील ८ व नागपूर विभागातील वर्धा असे १४ जिल्हे शेतकरी आत्महत्याप्रवण म्हणून ओळखले जातात. या जिल्ह्यांमध्ये जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान आतापर्यंत ११८३ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात ५२० शेतकरी आत्महत्यांची नोंद झाल्याचा शेतकरी मिशन कार्यालयाचा अहवाल आहे.

११८३ शेतकरी आत्महत्या आठ महिन्यांत

  • अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यात १४३, अकोला १२४, यवतमाळ २३५, बुलढाणा १२२ व वाशिम जिल्ह्यात ८३ व वर्धा जिल्ह्यात १४४ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.
  • छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर १२८, जालना ५२, परभणी ७१, हिंगोली ४४, नांदेड १०४, बीड १७२, लातूर ५२, धाराशिव जिल्ह्यात ८५ शेतकरी आत्महत्या आहेत.
टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याMaharashtraमहाराष्ट्रVidarbhaविदर्भYavatmalयवतमाळAmravatiअमरावतीfarmingशेती