शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

यशोमती ठाकूर पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसान भरपाई दिले आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 6:20 PM

गत काळातील अवेळी पाऊस आणि आताही गारपिटीने अमरावतीसह विदर्भातील कापूस, तूर आणि फळबागांचे नुकसान झाले आहे.

तिवसा (अमरावती) : कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी मतदारसंघात पोहोचताच तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथील शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. गुरुवारी पहाटे झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तालुक्यात ३३०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील शेतीपीक व संत्रा पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर ठाकूर यांनी बांधावर जाऊन शेतक-यांशी संवाद साधला. 

नुकसान भरपाई लवकरच मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांच्या समवेत महसूल व तहसील यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते. ठाकूर यांनी दीपक सावरकर यांच्या केळीच्या बागेत व राजू घरडे यांच्या कपाशीच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी केली. 

गत काळातील अवेळी पाऊस आणि आताही गारपिटीने अमरावतीसह विदर्भातील कापूस, तूर आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी दोन दिवसांत नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना यावेळी ना. यशोमती ठाकूर यांनी कृषि विभागाला दिल्या. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांना माहिती देण्यात आली आहे. शेतक-यांच्या मदतीचा प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मांडण्यात येईल. संबंधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे काम निश्चितपणे करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरAmravatiअमरावती