शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी हिताशिवाय राजकारणात स्वारस्य नाही

By admin | Updated: March 28, 2017 00:01 IST

बदलत्या राजकीय समीकरणात दबावतंत्राचा वापर होत आहे. सभापती म्हणून शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर अशा राजकारणात स्वारस्य नाही.

सुनील वऱ्हाडे : अमरावती बाजार समिती सभापतीपदाचा राजीनामा अमरावती : बदलत्या राजकीय समीकरणात दबावतंत्राचा वापर होत आहे. सभापती म्हणून शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर अशा राजकारणात स्वारस्य नाही. सत्ता उपभोगासाठी नसून शेतकरी हितासाठी असते. यापुढे संचालक या नात्याने आपण शेतकऱ्यांच्या न्यायासाठी संघर्ष करू, याचसाठी सभापतीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सुनील वऱ्हाडे यांनी दिली. अमरावती बाजार समिती सभातीपदाच्या १७ महिन्यांच्या कारकिर्दीत शेतकरीहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचा आपल्याला अभिमान आहे, असेही वऱ्हाडे यांनी सांगितले. बाजार समितीमध्ये अवघ्या पाच रुपयांमध्ये शेतकऱ्यांना जेवणाची सोय करून दिली. मागील ५० वर्षांत बाजार समितीमधील अतिक्रमण काढण्यात आले नव्हते ते काढले. आजवर बाजार समितीबाहेर होणारा कापसाचा व्यापार मार्केट यार्डात आणला. असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती वऱ्हाडे यांनी दिली. सभापतीपदी विराजमान होताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व युवा स्वाभिमान असे राजकीय समीकरण होते. नंतरच्या काळात नवे राजकीय समीकरण उदयास आले. यामध्ये काँग्रेस व शिवसेना एकत्र आलेत. या बदलत्या राजकारणाचा शेतकरीहितावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांकडे राजीनामा सादर केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्यावर कोणी अविश्वास प्रस्ताव आणू शकत नाही. तोडफोडीच्या राजकारणात आपल्याला रस नाही व शेतकऱ्यांसाठी काम करताना दबावतंत्राचा वापर केला जात असेल तर अशा राजकारणात आल्याला स्वारस्य नसल्याचे वऱ्हाडे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला प्रमोद इंगोले, मिलिंद तायडे, बंडू वानखडे व विनोद गुहे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)