शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

साडेचार कोटींच्या रेतीमुळे अमरावती पोलिसांवरचा डाग पुसला जाणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 7:21 PM

अमरावती-यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवर चार दिवसांपूर्वी ९२ ट्रक व तीन पोकलँड पकडून चार कोटी ३८ लाखांचा मुद्देमाला अवैध रेतीसाठा जप्त करण्यात आला होता.

- चेतन घोगरेअमरावती : अमरावती-यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवर चार दिवसांपूर्वी ९२ ट्रक व तीन पोकलँड पकडून चार कोटी ३८ लाखांचा मुद्देमाला अवैध रेतीसाठा जप्त करण्यात आला होता. या कार्यवाहीमागील मुख्य कारण हे नांदेड जिल्ह्यात कार्यरत असलेले आयपीएस जि. विजयकृष्ण यादव यांनी अमरावती येथील रेती व्यवसायिकांकडून लाखो रूपयांची लाच घेतल्यामुळे अडकले होते. याचा वचपा काढण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी ही राज्यामधील सर्वात मोठी कार्यवाही केल्याचे बोलले जात आहे.काही महिन्यांपूर्वी अमरावती-नागपूर महामार्गावर असलेल्या तिवसा पोलीस स्टेशनमध्ये तीन महिन्यासाठी आलेले परीवेक्षाधीन आयपीएस अधिकारी जि. विजयकृष्ण यादव यांनी २७ मार्च ते २५ जून या कार्यकाळात ३० हून अधिक मोठ्या कारवाया केल्या. यामध्ये सर्वात मोठी कारवाई म्हणजे १८० जनावरे, ५४ आरोपी व २० ट्रक तसेच अवैध रेतीची वाहतूक करणारे १५ ट्रक, १५ आरोपी तसेच १ कोटी ५० लाखाचा मुद्देमालसुद्धा जप्त करण्यात आला होता. यामध्ये जिल्ह्यातील रेतीचा तस्कर म्हणून ओळख असलेल्या व्यक्तीचेसुद्धा रेतीचे ट्रक पकडण्यात आले होते. त्याच रेती तस्कराने आयपीएस यादव यांच्यावर लाचलुचपत विभागाचा सापळा रचून लाखो रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या सर्व प्रकरणांमध्ये अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिसांची प्रतिमा राज्यभरात मलीन झाली होती. या सर्व बाबींचा वचपा काढण्यासाठी सध्या अमरावती जिल्ह्याला लाभलेले परीविक्षाधीन आयपीएस अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने यवतमाळ जिल्ह्यातून होणा-या अवैध रेती घाटावरून होणा-या ३२ ट्रकवर धामणगाव रेल्वे तालुक्याच्या हद्दीमध्ये राज्यामधील सर्वात मोठी कार्यवाही केली व दोन कोटींच्यावर रेतीसाठा जप्त केला. तसेच त्याआधी परतवाड्यावरून जाणारा देशी दारूचा टि. पी. वाहतुकीचा माल हा रासेगावला न जाता रेतीघाट परिसरात अवैध वाटप करत असताना पकडला. त्यामुळे दारू व्यवसायिकांनी चांगलाच धसका घेतला होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या कार्यवाहीमुळे अमरावती ग्रामीण पोलिसांवर असलेला डाग पुसवून टाकल्याचे पोलीस विभागात बोलले जात आहे.रेतीवाल्यांकडून सावध राहा !याआधी आयपीएस अधिका-याने मोठी कारवाई केली म्हणून एसीबी विभागाने पोलीस अधिका-याची विकेट घेतली आहे तर आता राज्यामधली सर्वात मोठी कारवाई आहे. आता रेतीवले कोणाचा बळी घेणार, त्यामुळे रेतीवाल्यांकडून सावध राहण्याचा पोलीस विभागात या विषयाची चांगलीच चर्चा रंगत आहे.