शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबईत चटणी, भाकरी, ठेच्याचा महापूर; उरलेल्या भाकऱ्या, पाणी बाटल्यांचे अनाथाश्रमात दान
2
"मी जर टॅरिफ लावला नसता, तर भारताने कधीच..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा टॅरिफची 'वकिली'
3
"आरक्षणाचा तिढा केंद्राच्या गळ्यात घालण्याचा धूर्त प्रयत्न हाणून पाडला"; भाजपने मानले CM फडणवीसांचे आभार
4
चीनची बाजी, परंतु भारतच खरा 'किंग'; 'या' दिग्गजाला आपल्यावर इतका का भरवसा?
5
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
6
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीचे व्रत पांडवांना कोणी सांगितले? काय लाभ झाला?
7
झोमॅटोचा झटका! सणासुदीत प्लॅटफॉर्म फीमध्ये २०% वाढ; आता प्रत्येक ऑर्डरवर इतके रुपये मोजावे लागणार
8
नवी कार घेण्याचा विचार करताय...? आज मॉडर्न फीचर्ससह लॉन्च होतेय मारुतीची नवी SUV Escudo, जाणून घ्या, किती असेल किंमत?
9
नवऱ्याला अनेकदा जीवे मारण्याच्या मिळतात धमक्या, पल्लवी जोशी म्हणाली, "मी आता..."
10
वामन जयंती २०२५: बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार, तीन पावलांत ब्रह्मांड व्यापले
11
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
12
केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!
13
Share Market News: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात
14
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
15
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
16
EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी
17
राणीला २६ वर्षाच्या बॉयफ्रेंडनेच संपवलं, हत्या केल्यानंतर अरुणने पोलिसांना काय सांगितलं?
18
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
19
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
20
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल

आदर्शचा मारेकरी कोण? हल्लेखोराचा चेहरा उलगडेना, एक ना अनेक प्रश्न अनुत्तरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2022 13:26 IST

बयाण नोंदविण्याची प्रक्रिया, गृहपालाला अटकही नाहीच

अमरावती : आदर्श कोगे या १२ वर्षीय मुलाच्या मृत्यूप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असला, तरी अविरत प्रयत्नानंतरही मारेकऱ्याचा चेहरा उघड करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. वसतिगृहाच्या ज्या गृहपालाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला, तो अधीक्षक केवळ चौकशीसाठी ताब्यात असल्याचे गाडगेनगर पोलिसांचे म्हणणे आहे. त्याला अद्यापही अटक करण्यात आली नसताना, दुसरीकडे ९६ तासांनंतर आदर्शचा गळा नेमका कुणी दाबला, श्वासावरोध नेमका कशामुळे झाला, अर्थात आदर्शचा खून नेमका कुणी केला, कुणाच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला, असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

येथील रामपुरी कॅम्प भागातील पत्रकार कॉलनीस्थित विद्याभारती मागासवर्गीय वसतिगृहातील हॉलमध्ये आदर्श कोगे (१२, जामलीवन, ता. चिखलदरा) याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. २१ जुलै रोजी सकाळी ७ च्या सुमारास ती घटना उघड झाली. मात्र, आपल्या मुलाचा मृत्यू नैसर्गिक नसून संशयास्पद असल्याचा जोरदार आक्षेप आदर्शच्या वडिलांनी केला. त्यामुळे पारदर्शक चाैकशीची ग्वाही देऊन आदर्शचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथे पाठविण्यात आला. तर दुसरीकडे पोलीस आयुक्तांसह उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त व ठाणेदारांनी वसतिगृह गाठून चौकशी आरंभली.

२२ जुलै रोजी प्राथमिक पीएम रिपोर्ट आला. नाक व तोंड दाबल्याने श्वासावरोध निर्माण झाला, त्यामुळे आदर्शचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष व आदर्शच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, २२ जुलै रोजी सायंकाळी ५.३५ च्या सुमारास गृहपाल रवींद्र पांडुरंग तिखाडे (५०, प्रियंका कॉलनी) याच्याविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाला गती आली. तिखाडे याला शुक्रवारीच ताब्यात घेण्यात आले, तर वसतिगृह व विद्यालयाशी संबंधित अनेकांचे बयाण नोंदविण्यात आले. मात्र, आदर्शशी नेमके कुणाचे भांडण झाले, हे सांगायला कुणीही तयार नाही. वसतिगृहातील मुलांशी बाचाबाची झाल्याने गृहपालाने आपल्याला मारले, असे २० जुलै रोजी रात्री ८ च्या सुमारास आदर्शने आपल्याला व्हिडीओ कॉल करून सांगितले. त्यामुळे आपला तिघाडेवर संशय असल्याची तक्रार आदर्शच्या वडिलांनी केली. त्याअनुषंगाने काही मुलांचे बयाणदेखील नोंदविण्यात आले, तर तिघाडे यांनी नकारघंटा कायम ठेवली आहे.

सीसीटीव्ही नसल्याने गुंता वाढला

ज्या हॉलमध्ये आदर्शचा मृत्यू झाला, त्या हॉलमध्ये सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्याबाबत संस्था चालकांनी देखील चकार शब्द काढलेला नाही. नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने ते बसविले नाही, बसविणारच होतो, अशी वेळकाढू थाप मारली गेली. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांमध्ये भयगंड निर्माण झाल्याने गेल्या चार दिवसांपासून वसतिगृहाला गळती लागली आहे. तेथील सर्व विद्यार्थी अवघ्या १२ ते १६ वयोगटातील असल्याने पोलिसांच्या ‘इंट्रागेशन’ला मर्यादा आल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थीDeathमृत्यूAmravatiअमरावती