शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीची कोंडी कधी सुटणार ?

By admin | Updated: December 28, 2015 00:18 IST

शहरात दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक बघता रस्त्यावर ‘ट्रॅफिक जाम’ ही नित्याचीच बाब झालेली आहे.

शहरवासीयांचा सवाल : रिंग रोड फक्त कागदावरचसुमित हरकुट चांदूरबाजारशहरात दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक बघता रस्त्यावर ‘ट्रॅफिक जाम’ ही नित्याचीच बाब झालेली आहे. त्यामुळे विस्कळीत वाहतुकीमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. ही वाहतुकीची कोंडी कधी सुटणार, असा प्रश्न नागरिकांतर्फे उपस्थित होत आहे. दररोज होत असलेली लोकसंख्या वाढ. त्यामुळे दुचाकी, चारचाकीची वाढत असलेली खरेदी त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मात्र वाढलेली आहे. गुदमरल्यासारखी होत आहे. ग्रामीण भागातून दररोज ७००० विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता शहरात येतात. यातच ग्रामीण भागात शिकविणारे शिक्षक, कर्मचारी अधिकारी हे फक्त कागदावरच कार्र्यालयीन मुक्कामी राहत असल्याचे दाखवितात. प्रत्यक्षात मात्र ते ये-जा करतात. तसेच आंध्रप्रदेश, तामीळनाडू येथून दररोज १०० ते १२५ ट्रक शहरात ये-जा करतात. तेसुध्दा मोठ्या प्रमाणात वाहतुकीत भर टाकतात. यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी नेहमीचीत झाली आहे. शहराला बायपास व्हावा याकरिता गेल्या १२-१५ वर्षांपासून फक्त सर्व्हेच सुरू आहे. हा सर्व्हे जवळजवळ ४-५ वेळा झाला. मात्र हा बायपास कोठून कुठपर्यंत तयार होणार व कधी तयार होणार याची स्पष्ट माहिती अद्याप कोणालाही नाही. शहरातील मुख्य रस्त्यावर ट्रॅफिक जाम लागणे नित्याचे झाले असले तरीही शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याकरिता वाहतूक पोलीस कधीच कर्तव्यावर आढळून येत नाहीत. स्थानिक वाहतूक पोलीस केवळ येथील व्यापारींना त्याच्या दुकानासमोर वाहणे उभे न करू देण्यासाठीच नेमलेले असल्याचे दिसते. तसेच हे वाहतूक पोलीस मोर्शी मार्गावरील लाणोरी फाट्यावर व परतवाडा मार्गावरील ब्राह्मणवाडा थडी टी पॉर्इंटवरच सर्वाधिक काळ दिसतात. शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस विस्कळीत होत चालली आहे. शहरातील वाहतूक वाढली आहे. अशातच शहराला बायपास हा अत्यंत आवश्यक पर्याय असल्याची शहरवासीयांची मागणी असून १२ वर्षांपासून केवळ कागदावरच असलेला बायपासचा शुभमुहूर्त कधी मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे अपघात हेसुध्दा नेहमीच होत असतात. यामध्ये जयस्तंभ चौकावर काहींना जीवसुध्दा गमवावा लागला. काहींचा थोडक्यात जीव बचावला. हे सर्व प्रकार होत असताना शहरातून होणारी जड वाहतूक बायपासमार्गे बाहेरूनच होऊ शकते. त्यामुळे शहरातील ५० टक्के अपघाताचे धोके टळणार, हे मात्र निश्चित.