शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
3
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
4
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
5
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
6
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
7
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
8
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
9
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
10
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
11
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
12
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
13
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
14
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
15
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
16
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
17
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
18
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
19
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
20
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

वाहतुकीची कोंडी कधी सुटणार ?

By admin | Updated: December 28, 2015 00:18 IST

शहरात दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक बघता रस्त्यावर ‘ट्रॅफिक जाम’ ही नित्याचीच बाब झालेली आहे.

शहरवासीयांचा सवाल : रिंग रोड फक्त कागदावरचसुमित हरकुट चांदूरबाजारशहरात दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक बघता रस्त्यावर ‘ट्रॅफिक जाम’ ही नित्याचीच बाब झालेली आहे. त्यामुळे विस्कळीत वाहतुकीमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. ही वाहतुकीची कोंडी कधी सुटणार, असा प्रश्न नागरिकांतर्फे उपस्थित होत आहे. दररोज होत असलेली लोकसंख्या वाढ. त्यामुळे दुचाकी, चारचाकीची वाढत असलेली खरेदी त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मात्र वाढलेली आहे. गुदमरल्यासारखी होत आहे. ग्रामीण भागातून दररोज ७००० विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता शहरात येतात. यातच ग्रामीण भागात शिकविणारे शिक्षक, कर्मचारी अधिकारी हे फक्त कागदावरच कार्र्यालयीन मुक्कामी राहत असल्याचे दाखवितात. प्रत्यक्षात मात्र ते ये-जा करतात. तसेच आंध्रप्रदेश, तामीळनाडू येथून दररोज १०० ते १२५ ट्रक शहरात ये-जा करतात. तेसुध्दा मोठ्या प्रमाणात वाहतुकीत भर टाकतात. यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी नेहमीचीत झाली आहे. शहराला बायपास व्हावा याकरिता गेल्या १२-१५ वर्षांपासून फक्त सर्व्हेच सुरू आहे. हा सर्व्हे जवळजवळ ४-५ वेळा झाला. मात्र हा बायपास कोठून कुठपर्यंत तयार होणार व कधी तयार होणार याची स्पष्ट माहिती अद्याप कोणालाही नाही. शहरातील मुख्य रस्त्यावर ट्रॅफिक जाम लागणे नित्याचे झाले असले तरीही शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याकरिता वाहतूक पोलीस कधीच कर्तव्यावर आढळून येत नाहीत. स्थानिक वाहतूक पोलीस केवळ येथील व्यापारींना त्याच्या दुकानासमोर वाहणे उभे न करू देण्यासाठीच नेमलेले असल्याचे दिसते. तसेच हे वाहतूक पोलीस मोर्शी मार्गावरील लाणोरी फाट्यावर व परतवाडा मार्गावरील ब्राह्मणवाडा थडी टी पॉर्इंटवरच सर्वाधिक काळ दिसतात. शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस विस्कळीत होत चालली आहे. शहरातील वाहतूक वाढली आहे. अशातच शहराला बायपास हा अत्यंत आवश्यक पर्याय असल्याची शहरवासीयांची मागणी असून १२ वर्षांपासून केवळ कागदावरच असलेला बायपासचा शुभमुहूर्त कधी मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे अपघात हेसुध्दा नेहमीच होत असतात. यामध्ये जयस्तंभ चौकावर काहींना जीवसुध्दा गमवावा लागला. काहींचा थोडक्यात जीव बचावला. हे सर्व प्रकार होत असताना शहरातून होणारी जड वाहतूक बायपासमार्गे बाहेरूनच होऊ शकते. त्यामुळे शहरातील ५० टक्के अपघाताचे धोके टळणार, हे मात्र निश्चित.