शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

खरिपाच्या बाधित पिकांचे सर्वेक्षण केव्हा? विभागातील पावसात २६ टक्क्यांची तूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 17:11 IST

पावसाळ्यात सलग १५ दिवसांचा खंड असल्यास एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे शेतक-यांना आपत्तीचा लाभ मिळायला हवा. यंदा विभागात पावसाची २६ टक्के तूट आहे. खरीप हंगामात १५ पेक्षा अधिक दिवस पावसाचा खंड अनेकदा पडल्याने शेतीपिके बाधित झाली आहेत.

 अमरावती - पावसाळ्यात सलग १५ दिवसांचा खंड असल्यास एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे शेतक-यांना आपत्तीचा लाभ मिळायला हवा. यंदा विभागात पावसाची २६ टक्के तूट आहे. खरीप हंगामात १५ पेक्षा अधिक दिवस पावसाचा खंड अनेकदा पडल्याने शेतीपिके बाधित झाली आहेत. त्यामुळे शासनाने मूग, उडदासह सोयाबीन पिकाचे सर्वेक्षण करून शेतक-यांना पीकविम्यासह नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतक-यांची मागणी आहे.अमरावती विभागातील काही तालुक्यांतसुद्धा यंदा पेरणीपासूनच पावसात सतत खंड पडल्यामुळे मूग, उडीद व सोयाबीनसारख्या अल्पकालावधीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसात खंड, दिवसाचे प्रचंड तापमान तर कधी ढगाळ वातावरण यामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात रोग व किडींचा प्रादुर्भाव झाला. परिणामी सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येणार आहे. पावसाच्या खंडामुळे तर मूग व उडीद उद्ध्वस्त झाले आहे. यामधून जे पीक वाचले त्याची बाजार समित्यांंमध्ये हमीपेक्षा कमी भावाने विक्री होत असल्याने शेतक-यांच्या पदरी उत्पादन खर्चदेखील निघाला नाही, हे वास्तव आहे.यंदाच्या खरिपात अमरावती विभागात ३१ लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली. यामध्ये ९५ हजार हेक्टरमध्ये मूग, ९६ हेक्टरमध्ये उडीद व सर्वाधिक १४ लाख हेक्टरमध्ये सोयाबीनचे क्षेत्र आहे. यामध्ये पावसाच्या तुटीमुळे सरासरी उत्पादनात ५० टक्क्यांवर घट येणार आहे. त्यामुळे शेतांमधील उभ्या पिकांचे सर्वेक्षण करावे, व शेतक-यांना शासन मदत द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.

सर्वेक्षणामुळे पीक विम्याचाही लाभ ?याच आठवड्यात खरिपाची नजरअंदाज पैसेवारी काढण्यात येणार आहे. त्यामुळे कापणी प्रयोगापेक्षा प्रत्यक्ष शेतामध्ये खरिपाच्या पिकांचे पावसाच्या तुटीमुळे झालेले नुकसान स्पष्ट होणार आहे व याच नुकसानीच्या सर्वेक्षणाचा खरिपाच्या पीकविम्यासाठीदेखील शेतक-यांना फायदा होऊन संकटकाळात नुकसान भरपाई मिळू शकते.

‘एनडीआरएफ ’मध्ये निकष अंतर्भूत केंद्र शासनाने एप्रिल २०१५ मध्ये ‘एनडीआरएफ’चे नवे निकष जाहीर केले आहेत. त्यामध्ये पावसाळ्यात सलग १५ दिवस पावसाची तूट असल्यास ‘नैसर्गिक आपत्ती’ यासदराखाली शासन मदत मिळू शकते. केंद्राचे आदेश राज्याला बंधनकारक आहेत. त्यामुळे यंदाच्या खरिपात पावसाच्या सलग खंडामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण होणे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीGovernmentसरकार