शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

धनी बी गेलं अन् पोरगं बी!

By admin | Updated: October 11, 2015 01:23 IST

‘‘चार वर्षापूर्वी धनी गेलं अन् यंदा तरणंताठं पोरगं.... साऱ्या संसाराची दारुमुळं माती झाली.

यवतमाळमधील महिलांचा आक्रोश : दारुने मोडला संसाराचा कणा अमरावती : ‘‘चार वर्षापूर्वी धनी गेलं अन् यंदा तरणंताठं पोरगं.... साऱ्या संसाराची दारुमुळं माती झाली. मोलमजुरी करून घर कसंबसं चालत असताना आता लहान पोरगं बी दारुले लागलं. काय करावं कायबी समजत नाही, हमाली, मोलमजुरी करुन जगणं सुरू आहे.’’घाटंजीच्या पंचफुला पेंदोर यांची ही करुण कहाणी. त्यांच्या संसाराचा कणा दारुच्या व्यसनामुळे मोडून पडला. यवतमाळ जिल्ह्याची ओळख सर्वाधिक आत्महत्येचा जिल्हा म्हणून असताना दारूच्या व्यसनाने शेकडो संसारही उद्धवस्त झालेत. पंचफुला पेंदोर, ललिता मुंगले, पार्वती करपती, अर्चना मोरे, पार्वता उईके, पल्लवी मंडवधरे ही फक्त प्रातिनिधीक उदाहरणे. सावजींच्या प्रयासमध्ये संवादअमरावती : अविनाश सावजी यांच्या प्रयास-सेवांकूर भवनामध्ये या महिलांनी त्यांचे संसार कसे उद्ध्वस्त झालेत, ही आपबिती कथन केली. त्यांचे मोडलेले संसार, दारुमुळे होणारे समाजविघातक परिणाम या ६ महिलांनी प्रातिनिधिक स्वरुपात जनतेसमोर मांडले. आम्ही आता समाजासाठी जगतो, आमचे संसार तर भरकटले मात्र इतरांचे नकोत, अशी प्रामाणिक भावना त्यांनी मांडली. अविनाश सावजी यांनी त्यांना बोलके केले.यवतमाळमध्ये काही वर्षांत शेतकरी आत्महत्येचा आकडा फुगत असताना दारुबळीने कहर केला आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. घाटंजीच्या अर्चना मोरे या २७ वर्षीय विवाहितेची कथाही वेगळी नाही. दोन लहान मुली पदरात असताना अर्चना आज माहेरी राहून संसार हाकते आहे. दोन वर्षापूर्वी कुर्ली येथे भाड्याने राहत असताना तिचा पती प्रदीपने तिच्या व दोन वर्षांच्या मुलीच्या गळ्याभोवती फास आवळला होता. मद्यधुंद अवस्थेत घरी पोहोचल्यानंतर त्याने अर्चनाला बेदम मारले. नवरा डॉक्टर आहे अशी ती सांगते, मात्र कुठला पॅथीचा, हे तिला माहिती नाही. औषधाने भरलेले बॅग घेऊन गावोगाव फिरायचे आणि आलेला पैसा दारुत गमवायचा हा त्याचा दिनक्रम. तो प्रत्येक ठिकाणी नाव बदलून राहायचा, असा गौप्यस्फोट तिने केला. मात्र कारण तिला माहीत नाही.सततची मारहाण सहन न झाल्याने अर्चनाने आज चिंचखेड हे माहेर गाठलं, नवरा कोठे आहे हे तिला माहित नाही.सारी भिस्त तिच्यावरपल्लवी मंडवधरे (१८) ही बीएसएसी प्रथम वर्षाला शिकतेय. आज कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर यऊन पडली आहे. ३० सप्टेंबरला तिचे वडील सुभाष मंडवधरे यांचा दारूने बळी गेला. रविवारी वडिलाची तेरवी असताना पल्लवीने आपल्या जीवनाची कशी कथा झाली आहे ही विदारक वस्तुस्थिती कथन केली. निरक्षर आई आणि लहान भावाची जबाबदारी तिच्यावर आहे. पांढरकवड्याच्या ललिता प्रभाकर मुंगले या महिनाभरापासून पतीपासून वेगळे राहत आहेत. १६ वर्षाचा मुलगा अन् १३ वर्षाची मुलगी घेऊन धुणीभांडी करून त्या संसार करताहेत. त्यांचा पती प्रभाकर गेल्या १७ वर्षांपासून दारू पितोय. मारहाण तर रोजचीच. ‘बाप रोज दारु पिऊन मायले मारते, हे रोजचं लेकरं पाह्यतं’ त्याईच्या मनावर काय परिणाम होईन, असा सवाल मलेच पडला व एवढ्या वर्षानंतर बाहेर पडली. ललिता मुंगले सांगत होत्या. कुणी नवऱ्याला सोडलं तर कुणाचा कुंकवाचा धनी दारुमुले गेला तर कुणी नवऱ्याचा त्रासापोटी जाळून घेतलं तर कुठे वडीलांची दारुने बळी गेल्यावर १८ वर्षांच्या विद्यार्थिनीवर संसाराचा भार आलाय. दारुने झालेले परिणाम वेगवेगळे असतील. मात्र संसार उध्वस्त होण्यास कारण आहे ते म्हणजे दारू!बायकोच्या व मुलीच्या मापाचे फाशाचे दोर तयार करून दारूकरिता पैशांची मागणी करणारा नवरा असलेली अर्चना मोरे, दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता दिले नाही म्हणून नवऱ्याने अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याच्या प्रयत्नातून वाचलेल्या पार्वती उईके, नवरा व दोन्ही मुलांची व्यसनाधीनता वाट्याला आलेल्या पार्वता करपते या व अशा सहा महिलांनी शनिवारी ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना’मध्ये हृदय हेलावून सोडणाऱ्या कहाण्या अमरावतीकरांशी शेअर केल्यात.तरूणाई एकवटलीदारूमुळे संसाराची कशी धुळधाण होती, हे विदारक सत्य जनतेपर्यंत पोहोचवून व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी यवतमाळमधील १७ हजार तरूण एकवटले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील ५०७ दारु दुकाने बंद व्हावेत, यासाठी येथे स्वामिनी जिल्हा दारुबंदी अभियान राबविले जात आहे. या सहा महिलासुद्धा या अभियानाशी जुळल्या आहेत. यवतमाळमधील महेश पवार हा तरूण या अभियानाचे नेतृत्व करीत आहे. अभियानाला अधिक व्यापकता मिळावी, यासाठी व्यसनाधिनतेला बळी पडलेल्या महिलांसोबत पवार आज प्रयास सेवांकुरमध्ये पोहोचले. दारूबंदी ही जादूची कांडी नाही, मात्र सुरुवात झाली पाहिजे. दारुने सर्वसामान्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. शेकडो-हजारो जण दारुचे बळी ठरतात. म्हणूनच व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला असल्याचे महेश पवार यांनी सांगितले. यवतमाळ जिल्हा दारुमुक्त व्हावा यासाठी स्वामिनी जिल्हा दारूमुक्त अभियानाच्या माध्यमातून सुमारे १७००० तरुण हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहेत.