शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

आयुक्तांना घेराव, ६६ गावात पोहोचणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 1:21 AM

ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून सोडलेले पाणी गावांमध्ये पोहोचण्यापूर्वीच रोखण्याच्या खेळीनंतर यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी विभागीय आयुक्तालयात ठिय्या दिला. त्यांनी मागणी केलेल्या सर्व ६६ गावांमध्ये मंगळवारपासून पाणीपुरवठा सुरू करण्याचा आदेश अखेर विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी संबंधित यंत्रणेला दिला.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर यांच्या आंदोलनाला यश : रात्री ७.३० वाजता निर्णय; कलेक्टर, सीईओ उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून सोडलेले पाणी गावांमध्ये पोहोचण्यापूर्वीच रोखण्याच्या खेळीनंतर यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी विभागीय आयुक्तालयात ठिय्या दिला. त्यांनी मागणी केलेल्या सर्व ६६ गावांमध्ये मंगळवारपासून पाणीपुरवठा सुरू करण्याचा आदेश अखेर विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी संबंधित यंत्रणेला दिला. आंदोलनाच्या यशस्वीतेनंतर गावकऱ्यांनी जल्लोष केला.दुपारी ३ वाजता यशोमती ठाकूर १३ गावांतील गावकऱ्यांसह विभागीय आयुक्तालयात दाखल झाल्या. आयुक्तांसमोर पाण्यासाठी प्रभावी मागणी नोंदविली गेली. पाणी मिळेपर्यंत आम्ही हलणार नाही, हलू देणार नाही, असा पवित्रा आमदार ठाकूर यांनी घेतला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्तांनी सायंकाळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री, सिंचन खात्याचे कार्यकारी अभियंता, संबंधित बीडीओ, वीज अधिकारी, अशी संबंधित यंत्रणा पाचारण केली. पाणीपुरवठ्यात अडथळा ठरणाºया सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी समोरासमोर सोडविण्यासाठीचे आदेश देऊन त्यांनी आमदार यशोमती ठाकूर यांनी मागणी केलेल्या सर्व ६६ गावांमध्ये पाणीपुरवठ्याचा आदेश दिला. या आदेशानुसार, शक्य असेल तेथे नदीपत्रातून, नसेल तेथे टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे.या गावांना होणार पाणीपुरवठामोर्शी तालुका : तुळजापूर, निंभार्णी, शिरूळ, पिंपळखुटा, भांबोरा, येवती, कवठाळ, शिरलस, लेहगाव, लिहिदा, शिरखेड, नया वाठोडा, सावरखेड, काटपूर, नेरपिंगळाई, वाघोली, लेहगाव, राजूरवाडी.तिवसा तालुका : दापोरी, वरूडा, करजगाव, जावरा, फत्तेपूर, सातरगाव, इसापूर, काटपूर, नमस्कारी, वणी, ममदापूर, वरखेड, तारखेड, भारवाडी नवी, भारवाडी जुनी, ठाणाठुणी, आखतवाडा, धामंत्री, कौंडण्यपूर, कुºहा, उंबरखेड, निंभोरा, देलवाडी, डेहणी, तिवसा, गुरुदेवनगर, मोझरी, तळेगाव ठाकूर, मसदी, सुरवाडी, अनकवाडी, शिदवाडी, मार्डा, बोर्डा, जहागीरपूर, वºहा, चेनुष्टा, घोटा.अमरावती तालुका : डिगरगव्हाण, जळका शहापूर, शेवती जहागीर, गोपाळपूर, सालोरा, देवरा शहीद, देवरा पुनर्वसन, माहुली जहागीर, नांदुरा.पाणी सोडण्याचा निर्णय सिंचन खात्याचाचऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचे पाणी सोडण्याचा निर्णय सिंचन अधिकाºयांनीच घेतला. त्यासाठीची आवश्यक प्रक्रियाही पूर्ण केली गेली. पाणी किती सोडायचे, हेदेखील संबंधित अधिकाºयांनीच ठरविले, अशी माहिती सिंचन खात्याच्या कार्यकारी अभियंत्याने सभागृहात दिली. पाणी सोडण्याचा निर्णय कुणाचा होता, या आमदार यशोमती यांच्या प्रश्नावर ही माहिती दिली गेली.पीयूष सिंह म्हणाले, प्रॉमिस !पाणी पुरविण्याचा आदेश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी रात्री दिला. पुन्हा त्यात अडचण तर येणार नाही ना, याबाबत यशोमती ठाकूर खातरजमा करून घेत होत्या. विभागीय आयुक्त म्हणाले, तसे घडणार नाही. यशोमती ठाकूर त्यांना म्हणाल्या, प्रॉमिस? त्यावर पीयूष सिंह उत्तरले - प्रॉमिस!पुसदा, आमला,डिगरगव्हाणचे मुद्दे निकालीपुसदा येथील किरकोळ दुरुस्त्या त्वरित करा, डिगरगव्हाणचे बुडातून गंजलेले विजेचे खांब चार दिवसांत बदलवा, आमला येथील अपूर्ण पाइप लाइनच्या कामासंबंधीचे प्रशासकीय कामकाज सोमवारपर्यंत पूर्ण करा, असे आदेश पीयूष सिंह यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाºयांना दिले. आमदार यशोमती यांनी या तिन्ही गावांतील मुद्दे गावकºयांना सादर करण्यास सांगितले होते.पाणी वितरणाच्याबैठकीचे बोलावणे नाहीपाणी वितरणाची बैठक कोण घेते, ती कधी होते, असे प्रश्न आमदार ठाकूर यांनी जिल्हाधिकाºयांना केले. बैठक होत असून, आमदारांनाही त्यात बोलविले जाते, असे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले. परंतु, अशा कुठल्याही बैठकीत पाच वर्षांत मला कधीच बोलविले गेले नाही, असा मुद्दा ठाकूर यांनी मांडला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई