शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात ११४० गावांमध्ये जलसंकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 16:57 IST

गतवर्षीच्या सरासरीपेक्षा कमी पावसामुळे सद्यस्थितीत पश्चिम विदर्भातील ४९ तालुक्यांच्या भूजलस्तरात कमी आलेली असल्याने एप्रिल अखेर ११४० गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे.

ठळक मुद्देसद्यस्थितीत पश्चिम विदर्भातील ४९ तालुक्यांच्या भूजलस्तरात कमी निवारणार्थ १७८९ उपाययोजनांना मंजुरी दिली आचारसंहितेमध्ये शिथिलता देण्यात आल्याने २ व ४ मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकांचा रतीब सुरू

गजानन मोहोड

अमरावती - गतवर्षीच्या सरासरीपेक्षा कमी पावसामुळे सद्यस्थितीत पश्चिम विदर्भातील ४९ तालुक्यांच्या भूजलस्तरात कमी आलेली असल्याने एप्रिल अखेर ११४० गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. निवारणार्थ १७८९ उपाययोजनांना मंजुरी दिली असली तरी सद्यस्थितीत १४५३ उपाययोजना पूर्ण झाल्या असल्याची प्रशासनाची माहिती आहे. आचारसंहितेमध्ये शिथिलता देण्यात आल्याने २ व ४ मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकांचा रतीब सुरू आहे, तर सचिवस्तरावर दोन वेळा व्हीसीद्वारे आढावा घेण्यात आला आहे.

आचारसंहितेच्या काळात निविदा प्रक्रिया न होऊ शकल्याने अनेक योजनांना कार्यारंभ आदेश प्रशासन देऊ न शकल्याने शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र, या प्रस्तावांना मान्यता मिळालेली नाही. विभागाचा मागील वर्षीचा २१ कोटी ५९ लाख ९३ हजारांचा निधी अखर्चिक राहिल्याने खर्च करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.

प्रशासनाच्या संयुक्त कृती आराखड्यानुसार अमरावती विभागात पाणीटंचाई निवारणार्थ ५९११ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २१६७, अमरावती १९३९, यवतमाळ ७५५, अकोला ५६९ व वाशिम जिल्ह्यात ४८१ उपाययोजनांचा समावेश आहे.मात्र, आरखड्यानुसार १७८९ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली. यावर १७ कोटी ८९ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ३१०, अकोला २२१, यवतमाळ ४३, बुलडाणा ११०५ व वाशीम जिल्ह्यातील ११० योजनांचा समावेश आहे. सद्यस्थितीत ३८० योजना प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये अमरावती जिल्ह्यात २३१, अकोला १३५ यवतमाळ ८१, बुलडाणा ८९० व वाशिम जिल्ह्यात ११६ उपाययोजनांचा समावेश आहे. यावर १४ कोटी ५३ लाखांचा निधी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. उन्हाची दाहकता वाढत असल्याने दिवसेंदिवस जलसंकट तीव्र होत असल्याचे वास्तव आहे.

२३६ टँकर सुरू, ८९१ विहिरी अधिग्रहीत

विभागात सद्यस्थितीत २३६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक १८८ टोंकर बुलडाणा जिल्ह्यात सुरू आहे. अमरावती व यवतमाळमध्ये प्रत्येकी १९, वाशीम ८ व अकोला जिल्ह्यात २ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सद्यस्थितीत ८९१ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक बुलडाण्यात ५५७ विहिरींचा समावेश आहे. अमरावती ११० अकोला ५४, यवतमाळ ६२ व वाशीम जिल्ह्यात १०८ विहिरींचा समावेश आहे.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीWaterपाणी