शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पश्चिम विदर्भात ११४० गावांमध्ये जलसंकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 16:57 IST

गतवर्षीच्या सरासरीपेक्षा कमी पावसामुळे सद्यस्थितीत पश्चिम विदर्भातील ४९ तालुक्यांच्या भूजलस्तरात कमी आलेली असल्याने एप्रिल अखेर ११४० गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे.

ठळक मुद्देसद्यस्थितीत पश्चिम विदर्भातील ४९ तालुक्यांच्या भूजलस्तरात कमी निवारणार्थ १७८९ उपाययोजनांना मंजुरी दिली आचारसंहितेमध्ये शिथिलता देण्यात आल्याने २ व ४ मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकांचा रतीब सुरू

गजानन मोहोड

अमरावती - गतवर्षीच्या सरासरीपेक्षा कमी पावसामुळे सद्यस्थितीत पश्चिम विदर्भातील ४९ तालुक्यांच्या भूजलस्तरात कमी आलेली असल्याने एप्रिल अखेर ११४० गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. निवारणार्थ १७८९ उपाययोजनांना मंजुरी दिली असली तरी सद्यस्थितीत १४५३ उपाययोजना पूर्ण झाल्या असल्याची प्रशासनाची माहिती आहे. आचारसंहितेमध्ये शिथिलता देण्यात आल्याने २ व ४ मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकांचा रतीब सुरू आहे, तर सचिवस्तरावर दोन वेळा व्हीसीद्वारे आढावा घेण्यात आला आहे.

आचारसंहितेच्या काळात निविदा प्रक्रिया न होऊ शकल्याने अनेक योजनांना कार्यारंभ आदेश प्रशासन देऊ न शकल्याने शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र, या प्रस्तावांना मान्यता मिळालेली नाही. विभागाचा मागील वर्षीचा २१ कोटी ५९ लाख ९३ हजारांचा निधी अखर्चिक राहिल्याने खर्च करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.

प्रशासनाच्या संयुक्त कृती आराखड्यानुसार अमरावती विभागात पाणीटंचाई निवारणार्थ ५९११ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २१६७, अमरावती १९३९, यवतमाळ ७५५, अकोला ५६९ व वाशिम जिल्ह्यात ४८१ उपाययोजनांचा समावेश आहे.मात्र, आरखड्यानुसार १७८९ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली. यावर १७ कोटी ८९ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ३१०, अकोला २२१, यवतमाळ ४३, बुलडाणा ११०५ व वाशीम जिल्ह्यातील ११० योजनांचा समावेश आहे. सद्यस्थितीत ३८० योजना प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये अमरावती जिल्ह्यात २३१, अकोला १३५ यवतमाळ ८१, बुलडाणा ८९० व वाशिम जिल्ह्यात ११६ उपाययोजनांचा समावेश आहे. यावर १४ कोटी ५३ लाखांचा निधी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. उन्हाची दाहकता वाढत असल्याने दिवसेंदिवस जलसंकट तीव्र होत असल्याचे वास्तव आहे.

२३६ टँकर सुरू, ८९१ विहिरी अधिग्रहीत

विभागात सद्यस्थितीत २३६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक १८८ टोंकर बुलडाणा जिल्ह्यात सुरू आहे. अमरावती व यवतमाळमध्ये प्रत्येकी १९, वाशीम ८ व अकोला जिल्ह्यात २ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सद्यस्थितीत ८९१ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक बुलडाण्यात ५५७ विहिरींचा समावेश आहे. अमरावती ११० अकोला ५४, यवतमाळ ६२ व वाशीम जिल्ह्यात १०८ विहिरींचा समावेश आहे.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीWaterपाणी