शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पश्चिम विदर्भात ११४० गावांमध्ये जलसंकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 16:57 IST

गतवर्षीच्या सरासरीपेक्षा कमी पावसामुळे सद्यस्थितीत पश्चिम विदर्भातील ४९ तालुक्यांच्या भूजलस्तरात कमी आलेली असल्याने एप्रिल अखेर ११४० गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे.

ठळक मुद्देसद्यस्थितीत पश्चिम विदर्भातील ४९ तालुक्यांच्या भूजलस्तरात कमी निवारणार्थ १७८९ उपाययोजनांना मंजुरी दिली आचारसंहितेमध्ये शिथिलता देण्यात आल्याने २ व ४ मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकांचा रतीब सुरू

गजानन मोहोड

अमरावती - गतवर्षीच्या सरासरीपेक्षा कमी पावसामुळे सद्यस्थितीत पश्चिम विदर्भातील ४९ तालुक्यांच्या भूजलस्तरात कमी आलेली असल्याने एप्रिल अखेर ११४० गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. निवारणार्थ १७८९ उपाययोजनांना मंजुरी दिली असली तरी सद्यस्थितीत १४५३ उपाययोजना पूर्ण झाल्या असल्याची प्रशासनाची माहिती आहे. आचारसंहितेमध्ये शिथिलता देण्यात आल्याने २ व ४ मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकांचा रतीब सुरू आहे, तर सचिवस्तरावर दोन वेळा व्हीसीद्वारे आढावा घेण्यात आला आहे.

आचारसंहितेच्या काळात निविदा प्रक्रिया न होऊ शकल्याने अनेक योजनांना कार्यारंभ आदेश प्रशासन देऊ न शकल्याने शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र, या प्रस्तावांना मान्यता मिळालेली नाही. विभागाचा मागील वर्षीचा २१ कोटी ५९ लाख ९३ हजारांचा निधी अखर्चिक राहिल्याने खर्च करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.

प्रशासनाच्या संयुक्त कृती आराखड्यानुसार अमरावती विभागात पाणीटंचाई निवारणार्थ ५९११ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २१६७, अमरावती १९३९, यवतमाळ ७५५, अकोला ५६९ व वाशिम जिल्ह्यात ४८१ उपाययोजनांचा समावेश आहे.मात्र, आरखड्यानुसार १७८९ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली. यावर १७ कोटी ८९ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ३१०, अकोला २२१, यवतमाळ ४३, बुलडाणा ११०५ व वाशीम जिल्ह्यातील ११० योजनांचा समावेश आहे. सद्यस्थितीत ३८० योजना प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये अमरावती जिल्ह्यात २३१, अकोला १३५ यवतमाळ ८१, बुलडाणा ८९० व वाशिम जिल्ह्यात ११६ उपाययोजनांचा समावेश आहे. यावर १४ कोटी ५३ लाखांचा निधी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. उन्हाची दाहकता वाढत असल्याने दिवसेंदिवस जलसंकट तीव्र होत असल्याचे वास्तव आहे.

२३६ टँकर सुरू, ८९१ विहिरी अधिग्रहीत

विभागात सद्यस्थितीत २३६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक १८८ टोंकर बुलडाणा जिल्ह्यात सुरू आहे. अमरावती व यवतमाळमध्ये प्रत्येकी १९, वाशीम ८ व अकोला जिल्ह्यात २ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सद्यस्थितीत ८९१ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक बुलडाण्यात ५५७ विहिरींचा समावेश आहे. अमरावती ११० अकोला ५४, यवतमाळ ६२ व वाशीम जिल्ह्यात १०८ विहिरींचा समावेश आहे.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीWaterपाणी