शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

पश्चिम विदर्भातील ५६ तालुक्यांच्या भूजलात घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 16:25 IST

विभागात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरण झालेच नाही. पाच वर्षांतील भूजलाचा तुलनात्मक सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील सर्वच ५६ तालुक्यांतील भूजल पातळीत सरासरी ० ते ३ मीटरपर्यंत कमी आलेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा ६८० निरीक्षण विहिरींच्या नोंदीनंतर धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

-  गजानन मोहोडअमरावती - विभागात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरण झालेच नाही. पाच वर्षांतील भूजलाचा तुलनात्मक सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील सर्वच ५६ तालुक्यांतील भूजल पातळीत सरासरी ० ते ३ मीटरपर्यंत कमी आलेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा ६८० निरीक्षण विहिरींच्या नोंदीनंतर धक्कादायक वास्तव समोर आले आहे.  राज्यातील भूगर्भीय स्थिती पाहता ८२ टक्के भूभाग हा ‘बेसाल्ट’ या कठीण खडकाने व्यापलेला आहे. यात पाणी साठविण्याची क्षमता फार कमी झालेली आहे. मात्र, यात भेगा व सांधे निर्माण झाल्याने या खडकात साठवण क्षमता निर्माण होते. भूपृष्ठीय रचना व भूगर्भीय स्थितीवर झालेल्या पर्जण्यमानाचे भूजलात रूपांतर होणे पूर्णपणे अवलंबून असते. दरवर्षी निर्माण झालेल्या भूजल साठ्यातून  सिंचनासाठी, औद्योगिक वापरासाठी,  तसेच  शहरीकरण व वाढती लोकसंख्येसाठी वाढत्या मागणीमुळे भुजलाचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे व याचा भूजल पातळीच्या स्थितीवर परिणाम होत आहे. पणिामी पुढील काळासाठी पाणीटंचार्ई निर्माण होत आहे.सद्यस्थितीत २१ तालुक्यांची ० ते १ मीटरपर्यंत भूजल पातळी कमी झाली, यात बुलडाणा जिल्ह्यातील सर्वाधिक १३ व अमरावती जिल्ह्यातील ६ तालुक्ये आहेत. १ ते २ मीटरपर्यंत २० तालुक्यांची भूजल पातळीत कमी आली. यात सर्वाधिक ९ तालुक्ये यवतमाळ, अमरावती व वाशिम जिल्ह्यातील प्रत्येकी पाच तालुक्यांचा समावेश आहे. २ ते ३ मीटरपर्यंत १३ तालुक्यांच्या भूजलात कमी आली. यात सर्वाधिक सात तालुक्ये यवतमाळ जिल्ह्यातील व अकोल्यातील चार व अमरावती जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश आहे तसेच तीन मीटरपेक्षा जास्त भूजलात कमी दोन तालुक्यात ााहे यात अकोला व अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी एक तालुक्याचा समावेश आहे.

राज्यातील २८ टक्के क्षेत्र पाणवहनराज्यातील मुख्य नद्यांच्या खोºयाची १,५३१ पाणलोट क्षेत्रात विभागणी करण्यात आली व याची देखील पुन्हा तीन क्षेत्रात विभागाणी करण्यात आली. यामध्ये २८ टक्के म्हणजेच ८६,१५३ चौ.किमी पाणवहन क्षेत्र आहे. ४४ टक्के  महणजेच १,३५,३८३ चौ.किमी पुनर्भरण क्षेत्र तर २८ टक्के म्हणजेच ८६,१५३ चौ.किमी हे साठवण क्षेत्र आहे. व यात ८२ टक्के बाग हा बेसाल्ट पाषाणाचा असल्याने त्यात पाणी साठवण क्षमता फारच कमी प्रमाणात आहे.

पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा किमी पाऊस झाल्याने पाहिजे त्या प्रमाणात भूजल पुनर्भरण झालेले नाहीत. भूजलाचा उपसा अधिक असल्याने भूजलातील पातळीत घट झालेली आहे.- डॉ. पी.व्ही. कथने,उपसंचालक, जीएसडीए

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र