शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील ५६ तालुक्यांच्या भूजलात घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 16:25 IST

विभागात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरण झालेच नाही. पाच वर्षांतील भूजलाचा तुलनात्मक सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील सर्वच ५६ तालुक्यांतील भूजल पातळीत सरासरी ० ते ३ मीटरपर्यंत कमी आलेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा ६८० निरीक्षण विहिरींच्या नोंदीनंतर धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

-  गजानन मोहोडअमरावती - विभागात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरण झालेच नाही. पाच वर्षांतील भूजलाचा तुलनात्मक सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील सर्वच ५६ तालुक्यांतील भूजल पातळीत सरासरी ० ते ३ मीटरपर्यंत कमी आलेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा ६८० निरीक्षण विहिरींच्या नोंदीनंतर धक्कादायक वास्तव समोर आले आहे.  राज्यातील भूगर्भीय स्थिती पाहता ८२ टक्के भूभाग हा ‘बेसाल्ट’ या कठीण खडकाने व्यापलेला आहे. यात पाणी साठविण्याची क्षमता फार कमी झालेली आहे. मात्र, यात भेगा व सांधे निर्माण झाल्याने या खडकात साठवण क्षमता निर्माण होते. भूपृष्ठीय रचना व भूगर्भीय स्थितीवर झालेल्या पर्जण्यमानाचे भूजलात रूपांतर होणे पूर्णपणे अवलंबून असते. दरवर्षी निर्माण झालेल्या भूजल साठ्यातून  सिंचनासाठी, औद्योगिक वापरासाठी,  तसेच  शहरीकरण व वाढती लोकसंख्येसाठी वाढत्या मागणीमुळे भुजलाचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे व याचा भूजल पातळीच्या स्थितीवर परिणाम होत आहे. पणिामी पुढील काळासाठी पाणीटंचार्ई निर्माण होत आहे.सद्यस्थितीत २१ तालुक्यांची ० ते १ मीटरपर्यंत भूजल पातळी कमी झाली, यात बुलडाणा जिल्ह्यातील सर्वाधिक १३ व अमरावती जिल्ह्यातील ६ तालुक्ये आहेत. १ ते २ मीटरपर्यंत २० तालुक्यांची भूजल पातळीत कमी आली. यात सर्वाधिक ९ तालुक्ये यवतमाळ, अमरावती व वाशिम जिल्ह्यातील प्रत्येकी पाच तालुक्यांचा समावेश आहे. २ ते ३ मीटरपर्यंत १३ तालुक्यांच्या भूजलात कमी आली. यात सर्वाधिक सात तालुक्ये यवतमाळ जिल्ह्यातील व अकोल्यातील चार व अमरावती जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश आहे तसेच तीन मीटरपेक्षा जास्त भूजलात कमी दोन तालुक्यात ााहे यात अकोला व अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी एक तालुक्याचा समावेश आहे.

राज्यातील २८ टक्के क्षेत्र पाणवहनराज्यातील मुख्य नद्यांच्या खोºयाची १,५३१ पाणलोट क्षेत्रात विभागणी करण्यात आली व याची देखील पुन्हा तीन क्षेत्रात विभागाणी करण्यात आली. यामध्ये २८ टक्के म्हणजेच ८६,१५३ चौ.किमी पाणवहन क्षेत्र आहे. ४४ टक्के  महणजेच १,३५,३८३ चौ.किमी पुनर्भरण क्षेत्र तर २८ टक्के म्हणजेच ८६,१५३ चौ.किमी हे साठवण क्षेत्र आहे. व यात ८२ टक्के बाग हा बेसाल्ट पाषाणाचा असल्याने त्यात पाणी साठवण क्षमता फारच कमी प्रमाणात आहे.

पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा किमी पाऊस झाल्याने पाहिजे त्या प्रमाणात भूजल पुनर्भरण झालेले नाहीत. भूजलाचा उपसा अधिक असल्याने भूजलातील पातळीत घट झालेली आहे.- डॉ. पी.व्ही. कथने,उपसंचालक, जीएसडीए

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र