शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर-परतवाड्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:01 IST

जे काही पाणी येत आहे त्या पाण्याला फोर्सच नाही. पाण्याच्या टाक्या भरण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. तासंतास पाण्याची वाट बघितल्यानंतर दोन-चार बकेटा पाणी उपलब्ध होते. तेही पिण्यास अयोग्य, दूषित, गढूळ, तर काही भागात पाणीच पोहचत नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. देवगाव ते परतवाडा दरम्यान फातीमा कॉन्व्हेंटसमोर सार्वजनिक बांधकाम विभागासमोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या लिकिजेसमधून दररोज लाखो लिटर पाणी व्यर्थ जात आहे.

ठळक मुद्देनळाची धार बारीक । गळतीकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर - परतवाडा शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यात नळाची धार बारीक असून काही भागात नळातून पाणी येत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.अचलपूर नगर पालिकेकडून जुळ्या शहराला चंद्रभागात धरणावरून पाणी पुरवठा केला जातो. दरम्यान जुळ्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला लिकिजेसमुळे ठिकठिकाणी गळती लागली आहे. मात्र, नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. अनेक कारण पुढे करीत लिकिजेस, गळती थांबवायला नगरपालिका तयार नाही.जे काही पाणी येत आहे त्या पाण्याला फोर्सच नाही. पाण्याच्या टाक्या भरण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. तासंतास पाण्याची वाट बघितल्यानंतर दोन-चार बकेटा पाणी उपलब्ध होते. तेही पिण्यास अयोग्य, दूषित, गढूळ, तर काही भागात पाणीच पोहचत नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. देवगाव ते परतवाडा दरम्यान फातीमा कॉन्व्हेंटसमोर सार्वजनिक बांधकाम विभागासमोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या लिकिजेसमधून दररोज लाखो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. शहरांतर्गत असलेल्या पाण्याच्या पाईपलाईनवरही लिकिजेस आहेत. हे पाईप तुटल्याने शहरात सर्वत्र पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.दूषित पाणीपुरवठाअथक प्रयत्नानंतर नागरिकांना दोन चार बकेटा पाणी मिळते, तेही दूषित आहे. पाईप लाईनला गटारात लिकेजेस आहेत. त्यामुळे नाल्यातील, गटारातील, दूषित पाणी त्या पाईप लाईनमध्ये शिरून ते नागरिकांना नळाद्वारे मिळत आहे. चंद्रभागेच्या पाण्यासोबतच जवळपास १६ ट्यूबवेलचे थेट पाणी पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईनमधून सोडले जात आहे. या ट्युबवेलमधील पाण्यावर शुद्धीकरणाची कुठलीही प्रक्रिया केली जात नाही. दूषित पाणी शहरवासीयांना पुरविले जात आहे.अतिरिक्त पाण्याची उचलचंद्रभागा धरणातून पाणी घेताना ज्या मीटरद्वारे अचलपूर नगरपरिषद पाणी घेते ते मीटर अनेक दिवसांपासून बंद आहे. त्याची दुरुस्ती अद्याप नगरपरिषदेने केलेली नाही. बंद मीटर बदलविले नाही. नेमक्या या बंद मीटरचा फायदा घेत नगरपालिकेने त्या धरणातून मंजूर पाण्यापेक्षा अतिरिक्त पाण्याची उचल केली आहे. ही बाब पाटबंधारे विभागाने नगरपरिषदेच्या लक्षात आणून दिली असून, मीटर दुरुस्तीबाबत नगररिषदेला पत्रही दिले आहे. दरम्यान पाटबंधारे विभागाने या घटनेला गांभीर्याने घेतल्यास भविष्यात शहरातील पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई