शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
4
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
5
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
6
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
8
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
9
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
10
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
11
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
12
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
13
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
14
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
15
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
16
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
17
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
18
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
19
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
20
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक

अडीचशे फुटांवरही सापडेना पाण्याचा थेंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:51 IST

एकीकडे पावसाचे कमी होणारे प्रमाण, तर दुसरीकडे नागरिकांनी बोअर घेण्याचा बेसुमार सपाटा लावल्याने शहर व परिसरातील जमिनीची चाळणी झाली आहे. यंदा बुधवारा परिसरातील शंभर वर्षे जुन्या विहिरींनी तळ गाठला असताना शहरातील १०० पेक्षा अधिक बोअर कोरड्याठण्ण पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहेत.

ठळक मुद्देबोअर कोरड्या : शाळा, उद्यानांना फटका

प्रदीप भाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एकीकडे पावसाचे कमी होणारे प्रमाण, तर दुसरीकडे नागरिकांनी बोअर घेण्याचा बेसुमार सपाटा लावल्याने शहर व परिसरातील जमिनीची चाळणी झाली आहे. यंदा बुधवारा परिसरातील शंभर वर्षे जुन्या विहिरींनी तळ गाठला असताना शहरातील १०० पेक्षा अधिक बोअर कोरड्याठण्ण पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहेत. महापालिका प्रशासनाने या टंचाईला दुजोरा दिला आहे. अडीचशे फूट खोल खोदूनही बोअरला पाणी लागत नसल्याचे वास्तव यानिमित्ताने उघड झाले आहे.महापालिकांच्या शाळांसह उद्यान व सार्वजनिक स्वच्छतागृहांतील बोअर कोरडे पडल्याने चिंतेचा सूर उमटला आहे. शहरातील अनेक ठिकाणची बोअर आटल्याने उद्यान विकास व सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तब्बल २५० फूट खोदूनही पाण्याचा थेंब मिळत नसल्याने जमिनीत आणखी खोल छिद्रे पाडण्याची अहमहमिका लागली आहे. भूगर्भातील पाण्याचा अनिर्बंध उपसा होत असल्याने ही परिस्थिती ओढविली आहे.प्लॉट, घर घेतले की अगोदर सर्रास बोअर घेतले जाते. बोअर कुठे , केव्हा, कधी घ्यावे, यासाठी कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने मागील आठ ते दहा वर्षांत बोअर घेणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली. जमिनीत पाणीच नसल्याने अनेक भागात २०० फुटांवरसुद्धा धुराळाच बाहेर येत आहे. किमान पिणे आणि वापरण्यासाठी पाणी हवे असेल तर २०० ते ३०० फुटांपेक्षा जास्त खोल बोअर घ्यावा लागतो. तर काही भागात ३०० फुटांपर्यंतही पाण्याचा थेंब सापडेनासा झाला आहे. आठ ते दहा वर्षांपूर्वी शहरातील अनेक भागांत शंभर फुटांवर पाणी लागत होते. मात्र, ती खोली आता ३०० फुटांपर्यंत गेली आहे. शहरात हातपंप देणे बंद असल्याने त्याजागी बोअर घेऊन विद्युत मोटार बसविण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याने भूजल पातळी आणखी खोल जाऊ लागली आहे.उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर यांच्या माहितीनुसार, कस्तुरबाग आणि टॉवर लाईनसह मेहेरबाबा कॉलनी, व्यंकटेश कॉलनी येथील उद्यानातील बोअर आटल्या आहेत. तर म्हाडा कॉलनी, दस्तुरनगर मसानगंज येथील उद्यानातही पाणी नाही. त्यामुळे अनेक उद्यानांतील बोअरमधून अल्प प्रमाणात पाणी उपसा होत आहे.सांडपाण्याचा प्रश्नजयस्तंभ व गांधी चौकात महापालिका व खासगी संस्थांद्वारे पे अ‍ॅन्ड युज स्वच्छतागृहे चालविली जातात. या दोन्ही ठिकाणची बोअर महिनाभरापूर्वी कोरडे पडले. गांधी चौकात दोन दिवसांपूर्वी पुन्हा बोअर करण्यात आले. तेव्हा २२५ फुटांवर पाणी लागले. तसेच जयस्तंभ चौकस्थित बोअरला पाणी लागत नसल्याने तेथे टाउनहॉलमधून पाणीपुरवठा केला जात आहे. बोअर कोरड्या पडल्याने तेथील प्रसाधनगृहांसाठी लागणाºया पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पाण्याचा वापर वाढल्याने भूजल पातळी कमी होत आहे. विहिरी पावसाळ्यानंतर लवकर कोरड्या पडतात. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविली पाहिजे. यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याच्या दृष्टीने विहिरींची व बोअरवेलचे पुनर्भरण करण्याची सध्या गरज आहे.- एस. डब्ल्यू. कराड,वरिष्ठ भू-वैज्ञानिक (जीएसडीए)जयस्तंभ व गांधी चौकस्थित स्वच्छतागृहांना पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही बोअरवेल यंदा पहिल्यांदाच कोरड्या पडल्या. गांधी चौकात तब्बल २२५ फूट खोदल्यानंतर बोअरला पाणी लागले. याशिवाय शहरातील बऱ्याच उद्यानातील बोअरवेल कोरड्या पडल्या.- नरेंद्र वानखडे,उपायुक्त, महापालिका