शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

जलयुक्तच्या कामांसाठी युवकांना जलसमृद्धीची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 16:16 IST

जलयुक्तसह जल व मृद् संधारणाच्या कामांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी जलसमृद्धी योजनेच्या माध्यमातून १७.६० लाखांपर्यंतचे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे व त्यावरील व्याजाचे दायित्व शासन अदा करणार आहे.

 - गजानन मोहोडअमरावती - जलयुक्तसह जल व मृद् संधारणाच्या कामांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी जलसमृद्धी योजनेच्या माध्यमातून १७.६० लाखांपर्यंतचे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे व त्यावरील व्याजाचे दायित्व शासन अदा करणार आहे. यासाठी राज्यातील ३४ जिल्ह्यांना एक हजार, तर विदर्भात ३७० प्रस्तावांचा लक्ष्यांक देण्यात आलेला आहे. राज्यातील जलयुक्त शिवाराची कामे करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक, बेरोजगारांची सहकारी संस्था, नोंदणीकृत गटशेती, शेतकरी उत्पादन संस्था, विविध कार्यकारी संस्था यांना  मृद् व जल संधारण विभाग, सहकार विभाग व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून वित्तीय संस्थांकडून १७.६० लाखांच्या मर्यादेत अर्थसाहाय्य उपलब्ध करण्यात येणार आहे. पहिला टप्पा ३१ मार्च २०१८ या कालावधीत राहणार आहे, यासाठी राज्याला एक हजार, तर विदर्भाला ३७० प्रस्तावांचे लक्ष्यांक शासनाने दिले आहे. जलसमृद्धी (अर्थ मूव्हर्स) यंत्रसामग्री व्याज अर्थसाहाय्य योजनेतंर्गत सहकार विकास महामंडळ नोडल एजन्सी आहे.योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे जिल्हा उपनिबंधक हे सचिव आहेत. या तीन सदस्यीय समितीद्वारा अर्जांची छाननी होेणार आहे. वित्तीय संस्थांकडून उपलब्ध करण्यात येणाºया कर्जावर प्रचलित दरानुसार व्याजाची आकारणी करण्यात येणार आहे. हा व्याजाचा परतावा शासन अदा करेल, तर लाभार्थींना कर्जाचा परतावा करण्यासाठी पाच वर्षांचा अवधी देण्यात आला आहे. मात्र, यामध्ये लाभार्र्थीचा २० टक्के स्वहिस्सा राहणार आहे. तथापि, लाभार्थींकडून कोणताही हिस्सा थकल्यास विलंब शुल्कासह व्याज शासन देणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी आॅनलाइन अर्ज करण्यासाठी ३१ जानेवारी ही डेडलाइन देण्यात आली असून, १ ते ८ फेब्रुवारी दरम्यान अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.  या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.

 असा आहे जिल्हानिहाय लक्ष्यांकयोजनेसाठी राज्याला एक हजार प्रस्तावांचा लक्षांक देण्यात आलेला आहे. यामध्ये गडचिरोली, गोंदिया, नांदेड, अकोला, हिंगोली व यवतमाळ या जिल्ह्यांना प्रत्येकी ५०, परभणी, बुलडाणा, अमरावती, वर्धा, नंदुरबार व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना प्रत्येकी ४०, सांगली, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, भंडारा, बीड, लातूर, वाशिम, जळगाव, उस्मानाबाद, सोलापूर, जालना या जिल्ह्यांना प्रत्येकी २५, तर औरंगाबाद, अहमदनगर, पालघर, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, रायगड, पुणे व ठाणे या जिल्हांना प्रत्येकी १५ प्रस्तावांचा लक्ष्यांक देण्यात आला आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारAmravatiअमरावतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार